सुधारित अफगाण- हल्ला
By admin | Updated: March 3, 2016 01:57 IST
देश-परदेश-सुधारित...अफगाण-आत्मघाती हल्ला; २ मार्च २०१६
सुधारित अफगाण- हल्ला
देश-परदेश-सुधारित...अफगाण-आत्मघाती हल्ला; २ मार्च २०१६अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर आत्मघाती हल्ला९ ठार : सर्व भारतीय सुखरूप; सहा दहशतवाद्यांचा खात्माजलालाबाद : आत्मघाती हल्लेखोरासोबत सशस्त्र दहशतवाद्यांनी जलालाबादस्थित भारतीय वाणिज्य दूतावासावर केलेल्या हल्ल्यात ९ जण ठार झाले असून मृतांमध्ये अफगाणिस्तान सुरक्षा दलाच्या एका कर्मचार्याचा समावेश आहे. या हल्ल्यात दूतावासाच्या इमारतीचे नुकसान झाले आहे. २००७ नंतरचा हा चौथा दहशतवादी हल्ला होय.दूतावासातील सर्व भारतीय सुखरूप असून सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दोन आत्मघाती हल्लेखोरांनी स्वत:ला स्फोटकांनी उडवून दिले, तर अफगाण राष्ट्रीय पोलिसांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले की, जलालाबाद येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला करण्यात आला असून सर्व भारतीय सुखरूप आहेत; परंतु या हल्ल्यात अफगाण राष्ट्रीय पोलीस दलाचा एक अधिकारी चकमकीत ठार झाला. एका आत्मघाती हल्लेखोराने दूतावासासमोर स्वत:ला स्फोटाने उडवून दिले, तर दुसर्या आत्मघाती हल्लखोराने कारसह स्वत:ला उडवून दिले. या हल्ल्यात इमारतीचे नुकसान झाले आहे. अफगाणी लष्कराकडून विदेश मंत्रालयाला या घटनेची माहिती मिळाली, असेही स्वरूप यांनी सांगितले.घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले की, या चकमकीत ८ नागरिक ठार झाले. दोन तास दोन्ही बाजूने चकमक उडाली. सुरुवातीला भारत-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा मुकाबला केला. त्यानंतर त्यांच्या सोबतीला अफगाणचे सुरक्षा सैनिक मैदानात उतरले.एका आत्मघाती हल्लेखोराने वाणिज्य दूतावासाच्या मुख्य प्रवेशद्वावर स्वत:ला उडवून दिले, असे प्रांतीय पोलीस प्रमुख फजल अहमद शिरजाद यांनी सांगितले. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास जलालाबादस्थित भारतीय वाणिज्य दूतावास संकुलनात काही संशयास्पद हालचालीसोबत गोळीबार झाल्याचे दिसताच भारत-तिबेट सीमा सुरक्षा पोलिसांनी शिताफीने उलट गोळीबार केला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.३ जानेवारी रोजी दहशतवाद्यांनी मजार-ए-शरीफ येथील भारतीय दूतावासावर हल्ला केला होता. यावेळी दहशतवादी आणि अफगाण सुरक्षा दलादरम्यान २५ तास चकमक चालली होती. जानेवारीतच जलालाबादस्थित पाकिस्तान वाणिज्य दूतावासावर हल्ला झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली होती.