शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

इखलाखने बचावासाठी हिंदू मित्राला केला शेवटचा फोन

By admin | Updated: October 5, 2015 14:34 IST

घरात गोमांस साठवून खाल्ल्याच्या अफवेनंतर गावक-यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या इखलाखने स्वत:च्या व कुटुंबाच्या बचावासाठी आपल्या जिवलग हिंदू मित्राला फोन केला होता.

ऑनलाइन लोकमत
बिसाहदा (दादरी), दि. ५ - घरात गोमांस साठवून खाल्ल्याच्या अफवेनंतर गावक-यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मोहम्मद इखलाखने स्वत:ला व कुटुंबाला वाचवण्यासाठी आपल्या लहानपणापासूनचा जिवलग हिंदू मित्र असलेल्या मनोज सिसोदियाला फोन केला होता, अशी माहिती समोर आली आहे. इखलाखच्या फोननंतर मनोजन तातडीने पोलिसांना फोन करून इखलाखच्या घरी धाव घेतली खरी, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गावक-यांच्या बेदम मारहाणीमुळे इखलाखने आपला जीव गमावला तर त्याचा तरूण मुलगा दानिश गंभीर जखमी झाला. 
इखलाख त्यांच्या कुटुंबीयांनी घरात गोमांस साठवून ठेवले असून ते खातही असल्याची अफवा गावात पसरली होती. त्यानंतर २०० लोकांच्या संतप्त जमावाने त्यांच्या घरावर हल्लाबोल करत दगडविटांनी घरातील लोकांना मारहाण सुरू केली. या हल्ल्यातून बचावासाठी इखलाखने मनोजला फोन केला, रात्री झोपायची तयारी करत असलेल्या मनोजने तत्काळ पोलिसांना पोन करत इखलाखच्या घरी पोहोचण्यास सांगितले व त्यांनीही इखलाखच्या घरी धाव घेतली. मात्र तोपर्यंत इखलाखचा मृत्यू झाला होता. 
' मी रात्री घरी झोपण्याची तयारी करत होतो, तेवढ्यात मला इखलाखचा फोन आला, तो खूप घाबरलेला होता. मनोज भाई, आम्ही खूप मोठ्या संकटात आहोत, कसही करून पोलिसांना फोन कर आणि फोर्स बोलावं' असे त्याने मला फोनवर सांगितले. तेच त्याचे शेवटचे शब्द होते. मी पोलिसांना फोन केला आणि माझ्या मित्राचा जीव धोक्यात असल्याचे सांगितले. त्यानंतर मी लगेच इखलाखच्या घरी धाव घेतली, पण मला त्याच्या घरी पोहोचायला काही मिनिटांचा उशीर झाला. जमावाच्या मारहाणीमुळे इखलाखचा मृत्यू झाला होता तर त्याचा मुलगा (दानिश) गंभीर जखमी झाला होता. मी जरा लवकर पोहोचलो असतो, तर मी माझ्या मित्राचा जीव वाचवू शकलो असतो. मी व इखलाख बालपणापासूनचे मित्र आहोत, मी कित्येक वेळेस त्याच्या घरी जेवलो आहे.आत्तापर्यंत सगळं सुरळीत होतं, पण आता सगळचं मोडलं आहे. दानिश सध्या रुग्णालयात असून त्याचा जीव वाचवण्यात तरी यश मिळाले, याचे मला समाधान आहे असे मनोज म्हणाले.