शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

इखलाखने बचावासाठी हिंदू मित्राला केला शेवटचा फोन

By admin | Updated: October 5, 2015 14:34 IST

घरात गोमांस साठवून खाल्ल्याच्या अफवेनंतर गावक-यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या इखलाखने स्वत:च्या व कुटुंबाच्या बचावासाठी आपल्या जिवलग हिंदू मित्राला फोन केला होता.

ऑनलाइन लोकमत
बिसाहदा (दादरी), दि. ५ - घरात गोमांस साठवून खाल्ल्याच्या अफवेनंतर गावक-यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या मोहम्मद इखलाखने स्वत:ला व कुटुंबाला वाचवण्यासाठी आपल्या लहानपणापासूनचा जिवलग हिंदू मित्र असलेल्या मनोज सिसोदियाला फोन केला होता, अशी माहिती समोर आली आहे. इखलाखच्या फोननंतर मनोजन तातडीने पोलिसांना फोन करून इखलाखच्या घरी धाव घेतली खरी, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. गावक-यांच्या बेदम मारहाणीमुळे इखलाखने आपला जीव गमावला तर त्याचा तरूण मुलगा दानिश गंभीर जखमी झाला. 
इखलाख त्यांच्या कुटुंबीयांनी घरात गोमांस साठवून ठेवले असून ते खातही असल्याची अफवा गावात पसरली होती. त्यानंतर २०० लोकांच्या संतप्त जमावाने त्यांच्या घरावर हल्लाबोल करत दगडविटांनी घरातील लोकांना मारहाण सुरू केली. या हल्ल्यातून बचावासाठी इखलाखने मनोजला फोन केला, रात्री झोपायची तयारी करत असलेल्या मनोजने तत्काळ पोलिसांना पोन करत इखलाखच्या घरी पोहोचण्यास सांगितले व त्यांनीही इखलाखच्या घरी धाव घेतली. मात्र तोपर्यंत इखलाखचा मृत्यू झाला होता. 
' मी रात्री घरी झोपण्याची तयारी करत होतो, तेवढ्यात मला इखलाखचा फोन आला, तो खूप घाबरलेला होता. मनोज भाई, आम्ही खूप मोठ्या संकटात आहोत, कसही करून पोलिसांना फोन कर आणि फोर्स बोलावं' असे त्याने मला फोनवर सांगितले. तेच त्याचे शेवटचे शब्द होते. मी पोलिसांना फोन केला आणि माझ्या मित्राचा जीव धोक्यात असल्याचे सांगितले. त्यानंतर मी लगेच इखलाखच्या घरी धाव घेतली, पण मला त्याच्या घरी पोहोचायला काही मिनिटांचा उशीर झाला. जमावाच्या मारहाणीमुळे इखलाखचा मृत्यू झाला होता तर त्याचा मुलगा (दानिश) गंभीर जखमी झाला होता. मी जरा लवकर पोहोचलो असतो, तर मी माझ्या मित्राचा जीव वाचवू शकलो असतो. मी व इखलाख बालपणापासूनचे मित्र आहोत, मी कित्येक वेळेस त्याच्या घरी जेवलो आहे.आत्तापर्यंत सगळं सुरळीत होतं, पण आता सगळचं मोडलं आहे. दानिश सध्या रुग्णालयात असून त्याचा जीव वाचवण्यात तरी यश मिळाले, याचे मला समाधान आहे असे मनोज म्हणाले.