शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

देशात राहायचे असल्यास गोमांस खाणे सोडावे

By admin | Updated: October 16, 2015 23:43 IST

मुस्लिम या देशात निश्चिंतपणे राहू शकतात; पण यासाठी त्यांनी गोमांस खाणे सोडावे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपशासित हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे.

चंदीगड : मुस्लिम या देशात निश्चिंतपणे राहू शकतात; पण यासाठी त्यांनी गोमांस खाणे सोडावे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपशासित हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केले आहे. अर्थात हा वाद अंगलट येण्याची चिन्हे दिसताच, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगून माफी मागण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.हरियाणातील खट्टर सरकारला महिनाअखेर एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत खट्टर यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. भारतात गाय ही पूज्य आहे. गायीला देशातील एक मोठा समाज पवित्र मानतो. याचाच विचार करून मुस्लिमांनी गोमांस खाणे सोडले पाहिजे. मुस्लिम या देशात निश्चिंतपणे राहू शकतात; पण त्यांनी गोमांस सोडावे, असे खट्टर या मुलाखतीत म्हणाले. उत्तर प्रदेशातील दादरी हत्याकांडाचा उल्लेख करून, दादरीत जे काही घडले ते चुकीचे होते. केवळ गैरसमजातून ही घटना घडली, असेही खट्टर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर खट्टर सावरासावर करताना दिसले. शुक्रवारी याबाबत बोलताना माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मी असे बोललोच नाही. मात्र याउपरही माझ्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागण्यास तयार आहे, असे खट्टर म्हणाले.>>हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फोडले असतानाच भाजपने मात्र यापासून स्वत:ला नामानिराळे केले. खट्टर जे काही बोलले, ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. भाजपची ही भूमिका नाही. मी त्यांच्याशी यासंदर्भात बोलेन. आपल्या वक्तव्याने दुसऱ्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याचे प्रत्येकाने भान राखायला हवे.>>>>>विरोधकांकडून तीव्र शब्दांत सरकारची निंदानवी दिल्ली/ श्रीनगर : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या वक्तव्याचे शुक्रवारी देशभर तीव्र पडसाद उमटले. हा देशाच्या लोकशाहीतील सर्वात दु:खद दिवस आहे. आता हरियाणाचे मुख्यमंत्री भारतीय नागरिकत्वासाठीची पात्रता ठरवणार का? हे मोदी शासनाचे नवे मॉडेल आहे का? असा खरपूस सवाल काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.काँग्रेसचे अन्य एक नेते राशीद अल्वी यांनीही खट्टर यांचे विधान घटनाबाह्य असल्याचे सांगत त्यांना मुख्यमंत्रिपदी राहण्याचा कुठलाही अधिकार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया दिली. (वृत्तसंस्था)