शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

समलैंगिकतेला गुन्ह्याचा दर्जा दिला तर आपण १५व्या शतकात जाऊ - श्री श्री रवीशंकर

By admin | Updated: February 5, 2016 13:27 IST

समलैंगिक संबंधांना बेकायदेशीर ठरवलं तर आपण १५व्या शतकाइतक्या मागास व्यवस्थेत जाऊ असं स्पष्ट शब्दात सांगत श्री श्री रवीशंकर यांनी ३७७ कलम हटवण्याच्या मागणीचं समर्थन केलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - समलैंगिक संबंधांना बेकायदेशीर ठरवलं तर आपण १५व्या शतकाइतक्या मागास व्यवस्थेत जाऊ असं स्पष्ट शब्दात सांगत श्री श्री रवीशंकर यांनी ३७७ कलम हटवण्याच्या मागणीचं समर्थन केलं आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही स्तरावर महिला व पुरूष भेदभाव असता कामा नये असं सांगत शनीशिंगणापूरप्रकरणी पण चर्चेने हा प्रश्न सोडवला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.
नेटवर्क १८ शी बोलताना रवीशंकर म्हणाले की, रविवारी आपण शनीशिंगणापूरच्या विश्वस्तांना भेटणार आहोत. त्यांनी काशी विश्वनाथ आणि तिरुपती बालाजी या दोन मॉडेलप्रमाणे आचरण करावे असा सल्ला ते देणार आहेत. या दोन्ही ठिकाणी स्त्री-पुरूष भेदभाव नसल्याचे रवीशंकर म्हणाले.
हिंदू धर्मामध्ये असा भेदभाव नसून, गेल्या काही काळात तो तयार झाला असल्याचे त्यांनी सांगितले. शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेत स्त्री पुरूष समानता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अर्थात काही ठिकाणी काही शतके वेगळ्या परंपरा पाळल्या जात आहेत, आणि त्या मोडण्याचं धैर्य अनेकांमध्ये नाहीये. तुम्ही परंपरा मोडलीत तर काहीतरी वाईट घडेल अशी मानसिक भीती यामागे आहे.
आंदोलनं करून किंवा जोरजबरदस्ती करून हा तिढा सुटणार नाही तर चर्चा करून पटवून देऊन यावर मार्ग काढता येईल असे श्री श्री रवीशंकर म्हणाले. धर्म आणि अध्यात्म भीतीच्या पायावर नसावं, परंतु जगातल्या सगळ्या धर्मांमध्ये ही भीती आढळत असल्याचे त्यांनी सांगितले. 
धार्मिक नेत्यांना माझं सांगणं आहे की, उगाच भयग्रस्त होऊ नका, देव अजिबात रागावणार नाही
३७७ कलमाबाबत बोलताना रवीशंकर यांनी लैंगिकता हा वैयक्तिक निवडीचा प्रश्न असल्याचे सांगितले. जर समलैंगिकता हा गुन्हा ठरवला तर आपण शेकडो वर्षे मागं जाऊ असं सांगताना याबाबतीत सुधारणा करण्यासाठी धैर्य आणि बांधिलकीची गरज असल्याचे ते म्हणाले. सुधारकांनी लोकांमध्ये जागृती घडवायला हवी, त्यांना ज्ञान द्यायला हवं. शासक आणि सुधारक या दोघांनी एकत्र येऊन सामाजिक रोगांवर इलाज करायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.