शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

समलैंगिकतेला गुन्ह्याचा दर्जा दिला तर आपण १५व्या शतकात जाऊ - श्री श्री रवीशंकर

By admin | Updated: February 5, 2016 13:27 IST

समलैंगिक संबंधांना बेकायदेशीर ठरवलं तर आपण १५व्या शतकाइतक्या मागास व्यवस्थेत जाऊ असं स्पष्ट शब्दात सांगत श्री श्री रवीशंकर यांनी ३७७ कलम हटवण्याच्या मागणीचं समर्थन केलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - समलैंगिक संबंधांना बेकायदेशीर ठरवलं तर आपण १५व्या शतकाइतक्या मागास व्यवस्थेत जाऊ असं स्पष्ट शब्दात सांगत श्री श्री रवीशंकर यांनी ३७७ कलम हटवण्याच्या मागणीचं समर्थन केलं आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही स्तरावर महिला व पुरूष भेदभाव असता कामा नये असं सांगत शनीशिंगणापूरप्रकरणी पण चर्चेने हा प्रश्न सोडवला पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे.
नेटवर्क १८ शी बोलताना रवीशंकर म्हणाले की, रविवारी आपण शनीशिंगणापूरच्या विश्वस्तांना भेटणार आहोत. त्यांनी काशी विश्वनाथ आणि तिरुपती बालाजी या दोन मॉडेलप्रमाणे आचरण करावे असा सल्ला ते देणार आहेत. या दोन्ही ठिकाणी स्त्री-पुरूष भेदभाव नसल्याचे रवीशंकर म्हणाले.
हिंदू धर्मामध्ये असा भेदभाव नसून, गेल्या काही काळात तो तयार झाला असल्याचे त्यांनी सांगितले. शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेत स्त्री पुरूष समानता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अर्थात काही ठिकाणी काही शतके वेगळ्या परंपरा पाळल्या जात आहेत, आणि त्या मोडण्याचं धैर्य अनेकांमध्ये नाहीये. तुम्ही परंपरा मोडलीत तर काहीतरी वाईट घडेल अशी मानसिक भीती यामागे आहे.
आंदोलनं करून किंवा जोरजबरदस्ती करून हा तिढा सुटणार नाही तर चर्चा करून पटवून देऊन यावर मार्ग काढता येईल असे श्री श्री रवीशंकर म्हणाले. धर्म आणि अध्यात्म भीतीच्या पायावर नसावं, परंतु जगातल्या सगळ्या धर्मांमध्ये ही भीती आढळत असल्याचे त्यांनी सांगितले. 
धार्मिक नेत्यांना माझं सांगणं आहे की, उगाच भयग्रस्त होऊ नका, देव अजिबात रागावणार नाही
३७७ कलमाबाबत बोलताना रवीशंकर यांनी लैंगिकता हा वैयक्तिक निवडीचा प्रश्न असल्याचे सांगितले. जर समलैंगिकता हा गुन्हा ठरवला तर आपण शेकडो वर्षे मागं जाऊ असं सांगताना याबाबतीत सुधारणा करण्यासाठी धैर्य आणि बांधिलकीची गरज असल्याचे ते म्हणाले. सुधारकांनी लोकांमध्ये जागृती घडवायला हवी, त्यांना ज्ञान द्यायला हवं. शासक आणि सुधारक या दोघांनी एकत्र येऊन सामाजिक रोगांवर इलाज करायला हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.