शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

सत्तेत आल्यास पंजाबमधील ड्रग्जची समस्या एका महिन्यात संपवणार - राहुल गांधी

By admin | Updated: June 13, 2016 14:38 IST

आम्ही सत्तेत आल्यास एका महिन्यात पंजाबमधील ड्रग्जची समस्या संपवू असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
जालंदर, दि. 13 - आम्ही सत्तेत आल्यास एका महिन्यात पंजाबमधील ड्रग्जची समस्या संपवू असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. पंजाबमध्ये ड्रग्जविरोधात काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि अकाली दल फायदा होत असल्याने ही समस्या सोडवत नसल्याचा आरोपही केला आहे. 
 
पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. 'सरकारला फायदा होत असल्याचे ड्रग्जवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न केले जात नाही आहेत. जर आम्ही सत्तेत आलो तर फक्त एका महिन्यात ही समस्या सोडवू शकतो. जास्त काही नाही फक्त पोलिसांचे हात मोकळे करावे लागतील. हे फक्त काँग्रेस करु शकत', असं राहुल गांधी बोलले आहेत. 
 
'जर पंजाबला उज्वल भविष्य हवं असेल तर राज्यात ड्रग्जचा वापर थांबवणे हा एकमेव पर्याय आहे. एकीकडे पंजाबमध्ये ड्रग्जची समस्या आहे आणि दुसरीकडे कायदा - सुव्यवस्था, बेरोजगारीची समस्या आहे. जर तुम्हाला ड्रग्जची समस्या सोडवायची असेल तर पोलिसांना मोकळीक द्यावी लागेल, हे काम अकाली दल करत नाही आहे', असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. 
 
राहुल गांधी 'उडता पंजाब' चित्रपटावरुन सुरु असलेल्या वादावरही बोलले आहेत. पंजाबमध्ये ड्रग्जची समस्या असताना चित्रपटांवर बंदी आणली जात आहे. अजूनही सत्यता स्विकारली जात नाही आहे असं राहुल गांधी बोलले आहेत.