शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

नाव फुटकी असल्यास पाण्यामध्ये बुडणारच!

By admin | Updated: July 20, 2016 05:26 IST

लोकनियुक्त सरकारे पाडण्यात भाजप व त्याच्या केंद्रातील सरकारचा हात असल्याचा काँग्रेसचा आरोप गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी फेटाळून लावला.

शीलेश शर्मा,

नवी दिल्ली- उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशातील लोकनियुक्त सरकारे पाडण्यात भाजप व त्याच्या केंद्रातील सरकारचा हात असल्याचा काँग्रेसचा आरोप गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी फेटाळून लावला. नावेला छिद्र असेल, तर ती पाण्यात बुडणारच. पाण्याला दोष देणे बरोबर नाही, अशा शब्दांत राजनाथ यांनी उत्तराखंड व अरुणाचलमधील संकटाचे माप काँग्रेसच्या पदरात टाकले. काँग्रेसमधील अंतर्गत कलहातून हा प्रकार घडल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी, काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, काँग्रेसमुक्त भारताची घोषणा घेऊन सत्तेचा दुरुपयोग करीत लोकनियुक्त सरकारे पाडली जात आहेत. मणिपूर, हिमाचल प्रदेश येथील सरकारेही पाडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. राज्यघटना व लोकशाही तत्त्वाला फाटा देऊन जेथे बहुमत नाही तेथेही तोडफोड करून सरकार बनविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला असूनही सरकार बोध घ्यायला तयार नाही. या मुद्यावर काँग्रेसने स्थगन प्रस्ताव दिला होता. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी तो फेटाळत शून्य प्रहरात खरगे यांना म्हणणे मांडण्याची मुभा दिली. खरगे सरकारवर हल्ला करीत असताना सभागृहात अनेकदा गोंधळ झाला. खरगे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलताना राजनाथसिंह यांनी सरकारचा भक्कमपणे बचाव केला. या प्रकरणात केंद्राची काहीही भूमिका नाही. त्यामुळे याबाबत केंद्रावर आरोप करणे ठीक नाही. काँग्रेस सरकारने आतापर्यंत १०५ वेळा कलम ३५६ चा वापर करून राज्य सरकारे पाडली आहेत. गृहमंत्र्यांच्या या निवेदनाला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे सदस्य गौरव गोगाई म्हणाले की, येथे कलम ३५६ चा वापर करून सरकार पाडण्याच्या मुद्यावर चर्चा सुरू नसून केंद्राने राज्य सरकारे पाडण्यास राज्यपालांसारख्या घटनात्मक पदाचा कसा दुरुपयोग केला यावर चर्चा सुरू आहे. >केरळच्या २१ बेपत्ता लोकांचा मुद्दा लोकसभेतकेरळमधून बेपत्ता झालेल्या व दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटमध्ये (आयएस) सहभागी झाल्याचा संशय असलेल्या २१ जणांचा मुद्दा मंगळवारी लोकसभेत राज्यातील सदस्यांनी उपस्थित केला. हे बेपत्ता लोक बंदी असलेल्या कोणत्याही संघटनेत दाखल झाले आहेत का याची खातरजमा सरकारने करावी, अशी मागणी त्यांनी केली. काही दहशतवादी संघटनांमध्ये हे बेपत्ता लोक सामील झाल्याची खात्री न मिळालेली वृत्ते प्रसारमाध्यमांत आली आहेत. त्यामुळे सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडूनच त्याला दुजोरा मिळवून घ्यावा, असे काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल म्हणाले. इस्लामची भीती घालण्याचा हेतुत: प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.