शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

...तो दहशतवादी बु-हान आहे माहिती असतं तर मारलं नसतं - मेहबुबा मुफ्ती

By admin | Updated: July 29, 2016 11:29 IST

भारतीय सुरक्षा जवानांना दहशतवादी बु-हान वनीची माहिती नसल्याने त्याला ठार केल्याचं मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितलं आहे

 
ऑनलाइन लोकमत - 
श्रीनगर, दि. 29 - भारतीय सुरक्षा जवानांना दहशतवादी बु-हान वनीची माहिती नसल्याने त्याला ठार केल्याचं मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितलं आहे. '8 जुलै रोजी झालेल्या चकमकीत जवानांना त्या घरात हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बु-हान वनी आहे माहिती असंत तर त्यांनी त्याला मारलं नसतं, इतकंच नाही तर त्याला दुसरी संधी दिली असती', असा दावा मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. बु-हान वनीला ठार मारल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार उसळला होता, ज्यामधे 47 लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत. 
 
पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मेहबूबा मुफ्ती यांनी गुरुवारी पत्रकारांशी बातचीत केली. 'पोलीस आणि लष्कराने मला कोकेरनागच्या बेमदूरा गावातील एका घरात 3 दहशतवादी लपले असल्याची माहिती दिली होती. जर लष्कर आणि पोलिसांना माहिती असतं की लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये बु-हानदेखील आहे, तर त्याला ठार न मारता दुसरी संधी दिली असती', असं मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितलं आहे. 
 
 
दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र त्यांनी नकार दिला होता असं जवानांचं म्हणणं आहे. अफजल गुरुला फासावर लटवकण्याआधी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी कशाप्रकारे पुर्वतयारी केली होती याबद्दलही मेहबुबा मुफ्ती बोलल्या आहेत. 'नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस सरकारने पहिल्यापासूनच सगळी तयारी केली होती, पण आम्हाला बेमदूरा येथे बु-हान असल्याची काहीच माहिती नव्हती', असं मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितलं आहे. 
 
 
मेहबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होत आहे की, जर त्यांच्या सरकारकडे बु-हान वनीच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये उद्भवणा-या परिस्थितीची माहिती असती तर त्यांनी पुर्वतयारी केली असती. काश्मीरमध्ये सर्व व्यवस्थित सुरु असताना अशा घटना का घडतात ? याचा लोकांनी विचार करण्याची गरज आहे. जाणुनबुजून हे केलं जात आहे जेणेकरुन काश्मीरमधील सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था ढासळावी असा आरोप मेहबूबा मुफ्ती यांनी केला आहे. 
 
याअगोदरही पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) बु-हान वनीच्या हत्येवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत हत्या करण्याची काय गरज होती ? असा उलट सवाल सरकारला विचारला होता. बु-हान वनी जर गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होता, तर मग त्याला अगोदर अटक का करण्यात आली नाही ? असा सवाल पीडीपीचे खासदार मुझफ्फर बेग यांनी उपस्थित केला होता. सरकारने लष्करी अधिकाराऐवजी नैतिक अधिकाराचा वापर करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं होतं.