शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

मूर्दापूर धरणाची उंची वाढल्यास नशिराबादला पाणीच पाणी

By admin | Updated: May 8, 2016 23:08 IST

नशिराबाद- गेल्या ३-४ वर्षापासून भूसंपादनाचा नावाखाली मूर्दापूर धरणाची उंची वाढ करण्याचा प्रकल्प रखडत असून त्यामुळे पाण्याचे साठवण क्षमता अल्पच होत असल्याने नशिराबादकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी धरणाच्या सांडव्याचे बांधकाम तातडीने पूर्ण व्हावे, व उंची वाढीत बुडीत क्षेत्रातील शेतजमीनींचा मोबदला मिळावा आणि पाठपुरावा व्हावा, असा ठराव नुकताच ग्रामसभेत झाला आहे. त्यासंदर्भात लघुपाटबंधार्‍याचे अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.

नशिराबाद- गेल्या ३-४ वर्षापासून भूसंपादनाचा नावाखाली मूर्दापूर धरणाची उंची वाढ करण्याचा प्रकल्प रखडत असून त्यामुळे पाण्याचे साठवण क्षमता अल्पच होत असल्याने नशिराबादकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी धरणाच्या सांडव्याचे बांधकाम तातडीने पूर्ण व्हावे, व उंची वाढीत बुडीत क्षेत्रातील शेतजमीनींचा मोबदला मिळावा आणि पाठपुरावा व्हावा, असा ठराव नुकताच ग्रामसभेत झाला आहे. त्यासंदर्भात लघुपाटबंधार्‍याचे अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.
येथून जवळच मूर्दापूर धरण आहे. मूर्दापूर धरणाची उंची वाढवावी, असा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी काम अपूर्णच असल्याने पावसाळ्यात लाखो लिटर पाणी वाहून जाते. परिणामी उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागत असून एमआयडीसचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. धरणाची उंची तीन मिटरने वाढवावी, अशी मागणी गेल्याच महिन्यात पालकमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. धरणाचीपाणी साठवण क्षमता ११० दशलक्ष घनफुट आहे. शेतकर्‍यांच्या मागणीमुळे शासनाने उंची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यात भराव्याचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. मात्र बुडीत क्षेत्रातील जाणार्‍या शेतीचे भूसंपादनाचा मोबदला त्वरित मिळावा अशी मागणी होत आहे. उंची वाढ झाल्यास धरणाची साठवण क्षमता २३९ दशलक्ष घनफुट होणार आहे. त्यामुळे नशिराबादला मुबलक पाणी मिळणार आहे. एमआयडीसीकडे धाव घ्यावी लागणार नाही.
उंची वाढीमुळे शेतीला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. पावसाळ्यापूर्वीच वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी उंची वाढ व्हावी, अशी मागणी ग्रामसभेत करुन ठराव करण्यात आला आहे. विजय भानुदास सरोदे हे सूचक असून सदस्य लालचंद प्रभाकर पाटील, अनुमोदक आहे. ग्रामसभेत सर्वांनी या ठरावास सर्वानुमते मंजुरी मिळाली असून लघुपाटबंधारे विभागाकडे निवेदन देण्यात आले आहे.