शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मूर्दापूर धरणाची उंची वाढल्यास नशिराबादला पाणीच पाणी

By admin | Updated: May 8, 2016 23:08 IST

नशिराबाद- गेल्या ३-४ वर्षापासून भूसंपादनाचा नावाखाली मूर्दापूर धरणाची उंची वाढ करण्याचा प्रकल्प रखडत असून त्यामुळे पाण्याचे साठवण क्षमता अल्पच होत असल्याने नशिराबादकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी धरणाच्या सांडव्याचे बांधकाम तातडीने पूर्ण व्हावे, व उंची वाढीत बुडीत क्षेत्रातील शेतजमीनींचा मोबदला मिळावा आणि पाठपुरावा व्हावा, असा ठराव नुकताच ग्रामसभेत झाला आहे. त्यासंदर्भात लघुपाटबंधार्‍याचे अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.

नशिराबाद- गेल्या ३-४ वर्षापासून भूसंपादनाचा नावाखाली मूर्दापूर धरणाची उंची वाढ करण्याचा प्रकल्प रखडत असून त्यामुळे पाण्याचे साठवण क्षमता अल्पच होत असल्याने नशिराबादकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी पावसाळ्यापूर्वी धरणाच्या सांडव्याचे बांधकाम तातडीने पूर्ण व्हावे, व उंची वाढीत बुडीत क्षेत्रातील शेतजमीनींचा मोबदला मिळावा आणि पाठपुरावा व्हावा, असा ठराव नुकताच ग्रामसभेत झाला आहे. त्यासंदर्भात लघुपाटबंधार्‍याचे अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.
येथून जवळच मूर्दापूर धरण आहे. मूर्दापूर धरणाची उंची वाढवावी, असा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी काम अपूर्णच असल्याने पावसाळ्यात लाखो लिटर पाणी वाहून जाते. परिणामी उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागत असून एमआयडीसचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. धरणाची उंची तीन मिटरने वाढवावी, अशी मागणी गेल्याच महिन्यात पालकमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. धरणाचीपाणी साठवण क्षमता ११० दशलक्ष घनफुट आहे. शेतकर्‍यांच्या मागणीमुळे शासनाने उंची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यात भराव्याचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. मात्र बुडीत क्षेत्रातील जाणार्‍या शेतीचे भूसंपादनाचा मोबदला त्वरित मिळावा अशी मागणी होत आहे. उंची वाढ झाल्यास धरणाची साठवण क्षमता २३९ दशलक्ष घनफुट होणार आहे. त्यामुळे नशिराबादला मुबलक पाणी मिळणार आहे. एमआयडीसीकडे धाव घ्यावी लागणार नाही.
उंची वाढीमुळे शेतीला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. पावसाळ्यापूर्वीच वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी उंची वाढ व्हावी, अशी मागणी ग्रामसभेत करुन ठराव करण्यात आला आहे. विजय भानुदास सरोदे हे सूचक असून सदस्य लालचंद प्रभाकर पाटील, अनुमोदक आहे. ग्रामसभेत सर्वांनी या ठरावास सर्वानुमते मंजुरी मिळाली असून लघुपाटबंधारे विभागाकडे निवेदन देण्यात आले आहे.