शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
5
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
6
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
9
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
10
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
11
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
12
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
13
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
14
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
15
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
16
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
17
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
18
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
19
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
20
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा

राजकारणी म्हणून मी अपयशी - अमिताभ बच्चन

By admin | Updated: September 16, 2016 13:04 IST

राजकारणात असताना लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही याचं शल्य अजूनही जाणवत असल्याचं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - राजकारणात असताना लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही याचं शल्य अजूनही जाणवत असल्याचं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांची अलाहाबादचा खासदार अशी एक छोटीशी राजकीय कारकिर्द झाली. मात्र, अलाहाबादच्या जनतेच्या अपेक्षा खासदार म्हणून आपण पूर्ण करू शकलो नाही याची खंत अजूनही मनातून जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अत्यंत जुने मित्र असलेल्या राजीव गांधींच्या प्रेमाखातर बच्चन यांनी निवडणूक लढवली. प्रचंड मताधिक्याने ते निवडूनही आले. मात्र, तीनच वर्षांत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. निवडणूक लढवताना तुम्ही जनतेला खूप आश्वासनं देता आणि आता मागे वळून बघताना, ती आश्वासनं मी पूर्ण करू शकलो नाही हे आठवतं, असं ते म्हणाले आहेत.
मी साजाजिक जीवनात शक्य तेवढं काम केलं आहे, परंतु अलाहाबादच्या जनतेच्या मनात मात्र मी न केलेलं काम राहील असं ते म्हणाल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. मला राजकारणी म्हणून राहणं शक्य नव्हतं, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं शक्य नव्हतं म्हणून मी राजकारण सोडलं असं त्यांनी सांगितलं आहे. 
माझं काम कॅमेऱ्यासमोर जाणं, आणि उत्कृष्ट आहे ते सादर करणं हे आहे, आणि मला त्यावरून लक्ष विकेंद्रीत करायचं नाहीये असं बच्चन म्हणाले. अमेरिकेमध्ये हॉलीवूडमधले कलाकार उघड उघड राजकीय भूमिका घेतात, ते तसं करू शकतात कारण अमेरिकेतले प्रेक्षक हे जास्त प्रगल्भ आहेत, असं मत त्यांनी नोंदवलं आहे. हॉलीवूडचे प्रेक्षक खूप प्रगल्भ आहेत, आपल्याकडे थोडी मर्यादा आहे. मी काँग्रेसचा प्रचार करत असताना, चुकून विरोधकांच्या कार्यक्रमस्थळी गेलो तर तिथल्या तरूणांनी मला सांगितलं की आम्ही तुमचे चाहते आहोत, परंतु तुम्ही ताबडतोब इथून निघून जा. लोकांनी कलाकारांवर प्रेम केलं म्हणजे त्यांच्या राजकारणावरही प्रेम करायला पाहिजे असं नाही, अशी पुस्तीही बच्चन यांनी जोडली.