शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
4
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
5
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
6
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
9
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
10
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
11
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
12
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
13
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
14
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
15
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
16
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
17
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
18
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
19
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
20
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

‘मी खालच्या जातीचा’

By admin | Updated: May 7, 2014 07:08 IST

‘मी जाती-धर्माचे नाही तर विकासाचे राजकारण करतो,’ असे प्रत्येक प्रचारसभेत सांगणार्‍या नरेंद्र मोदी यांनी आता मुस्लीम-दलितांबद्दलच्या कळवळ्याची भाषा सुरू केली आहे.

मुस्लीम - दलितांचा मोदींना कळवळा

गजानन जानभोर, वाराणशी

‘मी जाती-धर्माचे नाही तर विकासाचे राजकारण करतो,’ असे प्रत्येक प्रचारसभेत सांगणार्‍या नरेंद्र मोदी यांनी आता मुस्लीम-दलितांबद्दलच्या कळवळ्याची भाषा सुरू केली आहे. आपण ‘खालच्या जाती’चे आहोत, हा साक्षात्कारही त्यांना पहिल्यांदाच झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात फैजाबादच्या सभेत रामनामाचा जप करणार्‍या मोदींनी त्यानंतर २४ तासांच्या आत मुस्लीमांप्रति असलेली ‘कडवट’ भूमिका सौम्य करीत जातीचेही कार्ड खेळले आहे. मंगळवारी उत्तर प्रदेशातील डुमरियागंज येथील प्रचारसभेत मोदी यांना अचानक दलित-मुस्लिमांची आठवण झाली. गरिबांना जात-धर्म नसतो. त्यामुळे आता हिंदू व मुसलमानांनी आपापसात लढण्यापेक्षा गरिबीच्या विरोधात एकत्र येऊन लढावे, असा उपदेश मोदी यांनी दिला. ‘मी खालच्या जातीचा असल्यामुळेच माझा अपमान होत आहे़ खालच्या जातीत जन्मास येणे गुन्हा आहे का?’ असा भावनिक सवाल करणार्‍या मोदींच्या या नव्या भूमिकेने अनेकांना बुचकळ्यात टाकले आहे. त्यास प्रियंका गांधी-वड्रा यांच्या ‘मोदी नीचले स्तर की राजनीति कर रहें है’, या टीकेचा संदर्भ असला तरी मोदींचा एकूण आविर्भाव ते जणू या संधीची वाटच पाहात असल्याजोगा होता. गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलींसाठी प्रायश्चित्त घेण्यास तयार नसलेले, त्यासाठी मुस्लीम समुदायाची माफी मागायला नकार देणारे मोदी मंगळवारी अचानक इतके ‘मवाळ’ झाले कसे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. उत्तर प्रदेशातील १५ जागांवर बुधवारी आणि १८ जागांवर १२ मे रोजी मतदान होत आहे. या सर्व मतदारसंघांत जातीचे समीकरण फार प्रभावी आहे. दलित-मुस्लिमांशिवाय इतर मागासवर्गीयांचीही मते या मतदारसंघांतील गणिते बिघडवू शकतात. मोदींना अचानक आलेल्या जातीच्या कळवळ्यामागे ते एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. फैजाबाद येथे सोमवारी रामनामाचा जप करीत ‘प्राण जाय पर वचन न जाए’या अयोध्येच्या संस्कृतीचा गजर केला होता. त्यामुळे आधीच भयग्रस्त असलेल्या मुस्लीम समाजात अस्वस्थता वाढू शकते, हे नंतर लक्षात आल्यामुळे मोदींनी ही सौम्य भूमिका घेतल्याचेही बोलले जात आहे. गरिबांना जात-धर्म नसतो. त्यामुळे आता हिंदू व मुसलमानांनी आपापसात लढण्यापेक्षा गरिबीच्या विरोधात एकत्र येऊन लढावे, असेही मोदी म्हणाले.