शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘मी खालच्या जातीचा’

By admin | Updated: May 7, 2014 07:08 IST

‘मी जाती-धर्माचे नाही तर विकासाचे राजकारण करतो,’ असे प्रत्येक प्रचारसभेत सांगणार्‍या नरेंद्र मोदी यांनी आता मुस्लीम-दलितांबद्दलच्या कळवळ्याची भाषा सुरू केली आहे.

मुस्लीम - दलितांचा मोदींना कळवळा

गजानन जानभोर, वाराणशी

‘मी जाती-धर्माचे नाही तर विकासाचे राजकारण करतो,’ असे प्रत्येक प्रचारसभेत सांगणार्‍या नरेंद्र मोदी यांनी आता मुस्लीम-दलितांबद्दलच्या कळवळ्याची भाषा सुरू केली आहे. आपण ‘खालच्या जाती’चे आहोत, हा साक्षात्कारही त्यांना पहिल्यांदाच झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात फैजाबादच्या सभेत रामनामाचा जप करणार्‍या मोदींनी त्यानंतर २४ तासांच्या आत मुस्लीमांप्रति असलेली ‘कडवट’ भूमिका सौम्य करीत जातीचेही कार्ड खेळले आहे. मंगळवारी उत्तर प्रदेशातील डुमरियागंज येथील प्रचारसभेत मोदी यांना अचानक दलित-मुस्लिमांची आठवण झाली. गरिबांना जात-धर्म नसतो. त्यामुळे आता हिंदू व मुसलमानांनी आपापसात लढण्यापेक्षा गरिबीच्या विरोधात एकत्र येऊन लढावे, असा उपदेश मोदी यांनी दिला. ‘मी खालच्या जातीचा असल्यामुळेच माझा अपमान होत आहे़ खालच्या जातीत जन्मास येणे गुन्हा आहे का?’ असा भावनिक सवाल करणार्‍या मोदींच्या या नव्या भूमिकेने अनेकांना बुचकळ्यात टाकले आहे. त्यास प्रियंका गांधी-वड्रा यांच्या ‘मोदी नीचले स्तर की राजनीति कर रहें है’, या टीकेचा संदर्भ असला तरी मोदींचा एकूण आविर्भाव ते जणू या संधीची वाटच पाहात असल्याजोगा होता. गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलींसाठी प्रायश्चित्त घेण्यास तयार नसलेले, त्यासाठी मुस्लीम समुदायाची माफी मागायला नकार देणारे मोदी मंगळवारी अचानक इतके ‘मवाळ’ झाले कसे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. उत्तर प्रदेशातील १५ जागांवर बुधवारी आणि १८ जागांवर १२ मे रोजी मतदान होत आहे. या सर्व मतदारसंघांत जातीचे समीकरण फार प्रभावी आहे. दलित-मुस्लिमांशिवाय इतर मागासवर्गीयांचीही मते या मतदारसंघांतील गणिते बिघडवू शकतात. मोदींना अचानक आलेल्या जातीच्या कळवळ्यामागे ते एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. फैजाबाद येथे सोमवारी रामनामाचा जप करीत ‘प्राण जाय पर वचन न जाए’या अयोध्येच्या संस्कृतीचा गजर केला होता. त्यामुळे आधीच भयग्रस्त असलेल्या मुस्लीम समाजात अस्वस्थता वाढू शकते, हे नंतर लक्षात आल्यामुळे मोदींनी ही सौम्य भूमिका घेतल्याचेही बोलले जात आहे. गरिबांना जात-धर्म नसतो. त्यामुळे आता हिंदू व मुसलमानांनी आपापसात लढण्यापेक्षा गरिबीच्या विरोधात एकत्र येऊन लढावे, असेही मोदी म्हणाले.