शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जियोग्लोबलमध्ये कुणासाठी खर्च?

By admin | Updated: April 9, 2016 03:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी तिजोरीतील किमान १३५ कोटी रुपये खर्च केले आणि त्यातील एक छदामही सरकारला परत मिळाला नाही.

शीलेश शर्मा, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी तिजोरीतील किमान १३५ कोटी रुपये खर्च केले आणि त्यातील एक छदामही सरकारला परत मिळाला नाही. मोदींनी आपल्या काही निवडक उद्योगपतींला फायदा पोहोचविण्यासाठी हा खर्च केला, असा स्पष्ट आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने भ्रष्टाचारासाठी थेट पंतप्रधान मोदी यांना दोषी ठरविण्याची ही पहिलीच वेळ आहे. नियंत्रक व महालेखाकारांच्या (कॅग) अहवालाच्या आधारावर आणि गुजरात राज्य पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा (जीएसपीसी) हवाला देत काँग्रेसने सरकारी तिजोरीची लूट करण्यासाठी थेट मोदींना जबाबदार धरले. या संपूर्ण प्रकरणातील सत्य उघड करण्यासाठी जीएसपीसीने जियोग्लोबल रिसोर्सेससोबत केलेल्या कराराशी संबंधित सर्व दस्तऐवज सार्वजनिक करण्यात आले पाहिजे, अशी जोरदार मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी केली. या कराराअंतर्गत केजी बेसिन गॅस ब्लॉकमधून एका खासगी क्षेत्रातील कंपनीला १० टक्के शेअर मोफत देण्यात आले होते.‘कॅग’च्या अहवालाच्या आधारावर जर कोळसा खाणपट्टे वाटपात घोटाळा झाला असेल, २-जी स्पेक्ट्रम घोटाळा झाला असेल तर मग हा घोटाळा ठरत नाही का? यात सार्वजनिक क्षेत्रातील एका कंपनीने केवळ दोनच लोक काम करीत असलेल्या आणि एकूण भांडवल फक्त ३००० रुपये असणाऱ्या एका खासगी कंपनीत किमान १७३५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, असे रमेश म्हणाले. अखेर मोदी कुणाला फायदा पोहोचवू इच्छित होते, असा सवालही त्यांनी केला.‘कॅग’च्या अहवालाचा हवाला देऊन जयराम रमेश पुढे म्हणाले, ‘मार्च २००२ मध्ये जीएसपीसीने जियोग्लोबल रिसोर्सेससोबत एक करार केला होता. परंतु केजी बेसिनच्या परिचालनासाठी (आॅपरेशन) आवश्यक असलेले भांडवल जीएसपीसीने लावले. त्यातून होणाऱ्या नफ्यात १० टक्के वाटा जियोग्लबल रिसोर्सेससाठी राखून ठेवण्यात आला होता. याचा अर्थ कसलीही गुंतवणूक न करता नफा मिळवा! नुकसान झालेच तर ते सार्वजनिक क्षेत्रातील जीएसपीसीचे आणि नफा झाला तर जियोग्लोबल रिसोर्सेसचा.’ मोदींनी सरकारी तिजोरीतील किमान १३५ कोटी रुपये सर्च केले आणि त्यातील एक छदामही परत मिळाला नाही, असा आरोप रमेश यांनी केला. रमेश यांनी जियोग्लोबल रिसोर्सेसची जन्मपत्रिकाच जाहीर केली. ‘ज्या कंपनीचे शेअर केवळ .००१ अमेरिकी डॉलर म्हणजे एका सेंटचा दहावा भाग होते, त्या कंपनीच्या शेअरचा दर १५ डॉलरपर्यतं वाढला. या व्यवहाराचे लाभार्थी कोण असा सवाल रमेश यांनी केला.