शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकमान्यतेने मिळालेल्या पुरस्कारांचा सन्मान राखा- राष्ट्रपतींचा सबुरीचा सल्ला

By admin | Updated: November 16, 2015 20:43 IST

लोकमान्यतेने मिळालेल्या पुरस्कारांचा आदर,सन्मान राखला पाहिजे असा सल्ला प्रणव पुरस्कार वापसी करणा-या मान्यवरांना मुखर्जींनी दिला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली दि. १६ - एखाद्या गोष्टीशी, विचाराशी असहमत असाल तरी चर्चा करून वा संवाद साधून व्यक्त व्हा, पुरस्कार परत करणे हा योग्य मार्ग नव्हे असे सांगत लोकमान्यतेने मिळालेल्या पुरस्कारांचा सन्मान राखला पाहिजे असा सबुरीचा सल्ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी असहिष्णू वातावरणाविरोधात पुरस्कार वापसी करणा-या मान्यवरांना दिला.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुरस्कार प्राप्त  पत्रकार व फोटो जर्नटलिस्ट्सचे अभिनंदन केले. 
देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात निषेध नोंदवत सध्या अनेक नामवंत लेखक, दिग्दर्शक, विचारवंत, वैज्ञानिक आपले पुरस्कार परत करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी पुरस्कार परत करणे हा योग्य मार्ग नसल्याचे स्पष्ट केले. 'मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे तुमची बुद्धी, कलागुण, परिश्रम, कष्ट यांना मिळालेली पावती, लोकमान्यता असते. त्यामुळे या सन्मानाचा आदर राखून त्यांचा सांभाळ करायला हवा, असे ते म्हणाले.
समाजातील काही घटनांमुळे संवेदशनशील लोकं अस्वस्थ होतात, पण त्यावरील प्रतिक्रिया ही संयमी असायला हवी. एखाद्या गोष्टीवरील आपली असहमती चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून पुढे यायला हवी, असे राष्ट्रपतींनी सांगितले. तसेच वादांवर तोडगा निघू शकेल अशा अनेक तरतूदी आपल्या राज्यघटनेत आहेत. त्यांच्या वापरातून सामाजिक संतुलन अबाधित राखले गेले पाहिजे, असा सूचक इशारा राष्ट्रपती मुखर्जी यांनी सरकारला दिला.