शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

लोकमान्यतेने मिळालेल्या पुरस्कारांचा सन्मान राखा- राष्ट्रपतींचा सबुरीचा सल्ला

By admin | Updated: November 16, 2015 20:43 IST

लोकमान्यतेने मिळालेल्या पुरस्कारांचा आदर,सन्मान राखला पाहिजे असा सल्ला प्रणव पुरस्कार वापसी करणा-या मान्यवरांना मुखर्जींनी दिला.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली दि. १६ - एखाद्या गोष्टीशी, विचाराशी असहमत असाल तरी चर्चा करून वा संवाद साधून व्यक्त व्हा, पुरस्कार परत करणे हा योग्य मार्ग नव्हे असे सांगत लोकमान्यतेने मिळालेल्या पुरस्कारांचा सन्मान राखला पाहिजे असा सबुरीचा सल्ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी असहिष्णू वातावरणाविरोधात पुरस्कार वापसी करणा-या मान्यवरांना दिला.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुरस्कार प्राप्त  पत्रकार व फोटो जर्नटलिस्ट्सचे अभिनंदन केले. 
देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात निषेध नोंदवत सध्या अनेक नामवंत लेखक, दिग्दर्शक, विचारवंत, वैज्ञानिक आपले पुरस्कार परत करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी पुरस्कार परत करणे हा योग्य मार्ग नसल्याचे स्पष्ट केले. 'मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे तुमची बुद्धी, कलागुण, परिश्रम, कष्ट यांना मिळालेली पावती, लोकमान्यता असते. त्यामुळे या सन्मानाचा आदर राखून त्यांचा सांभाळ करायला हवा, असे ते म्हणाले.
समाजातील काही घटनांमुळे संवेदशनशील लोकं अस्वस्थ होतात, पण त्यावरील प्रतिक्रिया ही संयमी असायला हवी. एखाद्या गोष्टीवरील आपली असहमती चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून पुढे यायला हवी, असे राष्ट्रपतींनी सांगितले. तसेच वादांवर तोडगा निघू शकेल अशा अनेक तरतूदी आपल्या राज्यघटनेत आहेत. त्यांच्या वापरातून सामाजिक संतुलन अबाधित राखले गेले पाहिजे, असा सूचक इशारा राष्ट्रपती मुखर्जी यांनी सरकारला दिला.