शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

'घर वापसी' सुरुच, गुजरातमध्ये ५०० ख्रिश्चनांनी केले धर्मांतर

By admin | Updated: December 21, 2014 11:51 IST

धर्मांतरावरुन देशभरात गदारोळ सुरु असूनही विश्व हिंदू परिषदेने 'घर वापसी'ची मोहीम सुरुच ठेवली आहे.

ऑनलाइन लोकमत

बलसाड, दि. २१ - धर्मांतरावरुन देशभरात गदारोळ सुरु असूनही विश्व हिंदू परिषदेने 'घर वापसी'ची मोहीम सुरुच ठेवली आहे. गुजरातमधील वलसाड येथे अरनाई येथे ख्रिस्ती समुदायातील सुमारे ५०० जणांचे धर्मपरिवर्तन करण्यात आले आहे.  बळ किंवा लालूच दाखवून हे धर्मांतर करण्यात आलेले नाही असा दावाही विहिंपने केला आहे.

अरनाई या गावात शनिवारी विहिंपने घर वापसीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये सुमारे ५०० ख्रिश्चन आदिवासींनी हिंदू धर्म स्वीकारला. हे सर्व जण आधी हिंदूच होते. मात्र त्यानंतर या सर्वांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. आता या सर्वांना पुन्हा हिंदू धर्मात आणल्याचा दावा विहिंपचे स्थानिक नेते नातू पटेल यांनी केला. या कार्यक्रमात महायज्ञाचे आयोजनही करण्यात आले. घर वासपी करणा-या १०० कुटुंबातील सुमारे ५०० जणांनी यज्ञ केले व त्यानंतर प्रभू रामाचे चित्र व रुद्राक्षची माळ देऊन त्यांना हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला.  

विहिंपच्या घर वापसी कार्यक्रमावरुन गुजरातमध्ये वाद निर्माण झाला आहे. वलसाडच्या जिल्हाधिका-यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. धर्मांतराचा कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे गरजेचे असते. विहिंपने जिल्हाधिका-यांकडे कार्यक्रमाची परवानगी घेतली होती का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.