शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

भारतात दहशतीसाठी हिज्बुलला ८ वर्षात ८० कोटी

By admin | Updated: November 20, 2015 03:54 IST

भारताने दहशतवाद्यांना अर्थपुरवठा आणि लाँडरिंगच्या आरोपात तीन डझनावर संस्थांच्या तीन लाख युरो (सुमारे २.१२ कोटी रुपये) एवढ्या संपत्तीच्या हस्तांतरणावर बंदी आणली आहे.

नवी दिल्ली : भारताने दहशतवाद्यांना अर्थपुरवठा आणि लाँडरिंगच्या आरोपात तीन डझनावर संस्थांच्या तीन लाख युरो (सुमारे २.१२ कोटी रुपये) एवढ्या संपत्तीच्या हस्तांतरणावर बंदी आणली आहे. दरम्यान, भारतात दहशत माजविण्याकरिता हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला गेल्या आठ वर्षात पाकिस्तानातून ८० कोटी रुपये मिळाले असल्याची धक्कादायक माहिती आहे.दहशतवादाला आर्थिक मदतीवर नियंत्रणासाठी जागतिक स्तरावर कार्यरत वित्तीय कारवाई कार्यदलाच्या (एमएटीएफ) अलीकडेच जाहीर झालेल्या एका अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. धोकादायक दहशतवादी गट आणि इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अँड सिरियाच्या (इसिस) वाढत्या कारवाया लक्षात घेता दहशतवाद्यांना मिळणाऱ्या पैशाचा पुरवठा रोखण्यासाठी जगभरातील विविध देश आणि आर्थिक शक्तींनी केलेल्या उपाययोजनांचा आढावा एमएटीएफतर्फे घेण्यात आला.इसिसने पॅरिसवरील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून यात १२९ लोक ठार, तर शेकडो जखमी झाले होते. दहशवाद्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर अंकुश घालण्याकरिता भारताच्या प्रयत्नांबाबत या अहवालात सविस्तर माहिती आहे. त्यानुसार देशाने यावर्षी १५ आॅगस्टपासून आतापर्यंत ३७ संस्थांची खाती गोठविली असून त्यात ३ लाख युरो जमा आहेत. भारत एमएटीएफचा पूर्ण सदस्य आहे. अमेरिका, फ्रान्स,जर्मनी आणि इंग्लंडसारखे अन्य देशही त्यात सहभागी आहेत.एफएटीएफच्या अहवालानुसार हिज्बुल मुजाहिदीनला गेल्या आठ वर्षात भारतात दहशतवादी कारवायांकरिता पाकिस्तानातून विविध मार्गे तब्बल ८० कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती भारताच्या तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.हिज्बुलला पैसे पुरविण्यासाठी बँंिकंग क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या गटाने काश्मीर खोऱ्यासह भारतात अनेक ठिकाणी हल्ले आणि हिंसाचार माजविला आहे.हिज्बुल मुजाहिदीन भारतात दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात सक्रिय आहे. या पैशाचा वापर शस्त्रास्त्रे, कपडे, इतर साहित्य आणि दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी केला जातो. भारत, अमेरिका आणि युरोपने हिज्बुल मुजाहिदीनला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.