शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

भारतात दहशतीसाठी हिज्बुलला ८ वर्षात ८० कोटी

By admin | Updated: November 20, 2015 03:54 IST

भारताने दहशतवाद्यांना अर्थपुरवठा आणि लाँडरिंगच्या आरोपात तीन डझनावर संस्थांच्या तीन लाख युरो (सुमारे २.१२ कोटी रुपये) एवढ्या संपत्तीच्या हस्तांतरणावर बंदी आणली आहे.

नवी दिल्ली : भारताने दहशतवाद्यांना अर्थपुरवठा आणि लाँडरिंगच्या आरोपात तीन डझनावर संस्थांच्या तीन लाख युरो (सुमारे २.१२ कोटी रुपये) एवढ्या संपत्तीच्या हस्तांतरणावर बंदी आणली आहे. दरम्यान, भारतात दहशत माजविण्याकरिता हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला गेल्या आठ वर्षात पाकिस्तानातून ८० कोटी रुपये मिळाले असल्याची धक्कादायक माहिती आहे.दहशतवादाला आर्थिक मदतीवर नियंत्रणासाठी जागतिक स्तरावर कार्यरत वित्तीय कारवाई कार्यदलाच्या (एमएटीएफ) अलीकडेच जाहीर झालेल्या एका अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. धोकादायक दहशतवादी गट आणि इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अँड सिरियाच्या (इसिस) वाढत्या कारवाया लक्षात घेता दहशतवाद्यांना मिळणाऱ्या पैशाचा पुरवठा रोखण्यासाठी जगभरातील विविध देश आणि आर्थिक शक्तींनी केलेल्या उपाययोजनांचा आढावा एमएटीएफतर्फे घेण्यात आला.इसिसने पॅरिसवरील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून यात १२९ लोक ठार, तर शेकडो जखमी झाले होते. दहशवाद्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर अंकुश घालण्याकरिता भारताच्या प्रयत्नांबाबत या अहवालात सविस्तर माहिती आहे. त्यानुसार देशाने यावर्षी १५ आॅगस्टपासून आतापर्यंत ३७ संस्थांची खाती गोठविली असून त्यात ३ लाख युरो जमा आहेत. भारत एमएटीएफचा पूर्ण सदस्य आहे. अमेरिका, फ्रान्स,जर्मनी आणि इंग्लंडसारखे अन्य देशही त्यात सहभागी आहेत.एफएटीएफच्या अहवालानुसार हिज्बुल मुजाहिदीनला गेल्या आठ वर्षात भारतात दहशतवादी कारवायांकरिता पाकिस्तानातून विविध मार्गे तब्बल ८० कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती भारताच्या तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.हिज्बुलला पैसे पुरविण्यासाठी बँंिकंग क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या गटाने काश्मीर खोऱ्यासह भारतात अनेक ठिकाणी हल्ले आणि हिंसाचार माजविला आहे.हिज्बुल मुजाहिदीन भारतात दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात सक्रिय आहे. या पैशाचा वापर शस्त्रास्त्रे, कपडे, इतर साहित्य आणि दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी केला जातो. भारत, अमेरिका आणि युरोपने हिज्बुल मुजाहिदीनला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.