शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख मार्गांची झाली चाळणी

By admin | Updated: June 19, 2016 00:14 IST

दूध फेडरेशन परिसर

दूध फेडरेशन परिसर
पावसामुळे दूध फेडरेशनजवळील सुमारे १५० मीटर रस्ताही खराब झाला आहे. राजा ट्रॅक्टर्ससमोर तर मोठे खड्डे पडले आहेत. त्यात ठिकठिकाणी खड्ड्यांमध्ये माती व वेेस्ट मटेरियल टाकलेले असल्याने त्याचे चिखलात रुपांतर झाल्याचे दिसून आले. या रस्त्यावरून सकाळी व सायंकाळी मोठी वर्दळ असते.

पिंप्राळा रेल्वेगेटवळ पाणी तुंबले
पिंप्राळा रेल्वे गेटनजीक रस्त्यावर पाणी तुंबले. दोन्ही बाजूला पाणी तुंबलेले होते. पाणी तुंबल्याने वाहनधारकांना थोडे वळण घेऊन जावे लागत होते. फाटक बंद असताना या पाण्यात आपली वाहने उभे करण्याशिवाय वाहनधारकांना पर्याय नव्हता.
केसी पार्कनजीकही सर्कस
केसी पार्कनजीक पालिकेच्या हद्दीमधील सुमारे २०० मीटर रस्ता खराब झाल्याने या रस्त्यावरही ठिकठिकाणी पाणी साचले होते. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे. या रस्त्यावर मुरूम, इमारतींचे वेस्ट मटेरियल टाकलेले असल्याने हा रस्ता आता ओबडधोबड झाल्याचे दिसून आले. जकातनाकाजवळ तर अधिकच बिकट स्थिती होती. एका खड्ड्यात विटा टाकलेल्या होत्या. त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना प्रचंड सर्कस करावी लागत होती. या रस्त्यावरून केसी पार्क, त्रिभुवन कॉलनी भागातील नागरिकांसह कानळदा, आव्हाणे आदी ठिकाणचे ग्रामस्थ ये-जा करतात.

शिवाजीनगर पुलाखालीही साचले पाणी
शिवाजीनगर पूल पार केल्यानंतर भिकमचंद जैन शाळेसमोर मुख्य रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याच पाण्यात ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षा उभ्या होत्या. या रिक्षांपासून पुढे काही अंतरावर रेल्वे स्टेशनच्या भिंतीनजीकही पाणीच पाणी साचले होते.

नवीपेठेतही दाणादाण
नवीपेठेत जयप्रकाश नारायण चौकात सरस्वती डेअरीनजीकच्या सखल भागात पाणी साचले होते. गटारीचे पाणी काही प्रमाणात रस्त्यावर आले होते. या भागातील गटारी तुंबल्याने दुर्गंधी पसरल्याचे चित्र होते. अधिकचा पाऊस झाला तर या भागात मोठ्या प्रमाणात सांडपाणी व पावसाचे पाणी साचेल, अशी स्थिती आहे.

गोलाणी मार्केटजवळही तुंबले पाणी
गोलाणी मार्केटजवळ शिरपूर बँकेनजीक मुख्य रस्त्यावर पाणी तुंबले होते. रस्त्यावर सकाळी मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचला होता. त्याची दुर्गंधी परिसरात पसरली होती. दरवर्षी या भागात पाणी साचते. गटारीतून प्लास्टिकच्या पिशव्या बाहेर येतात, परंतु उपाययोजना केली जात नाही. ही समस्या कायम असल्याने या भागातील दुकानदार व इतर व्यावसायिक त्रस्त आहेत.