शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

मदत स्वेच्छेने आली पाहिजे, बळजबरीने नाही - मनोहर पर्रीकर

By admin | Updated: October 25, 2016 13:43 IST

एखाद्याच्या मानगुटीवर बसून बळजबरीने वसूल केलेल्या देणगीची भारतीय लष्कराला गरज नाही, मदत स्वच्छेने आली पाहिजे असं म्हणत मनोहर पर्रीकरांनी खडे बोल सुनावले आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चित्रपट निर्मात्यांसमोर सैनिक कल्याण निधीत पाच कोटी भरण्याची अट ठेवल्यावरुन राजकीय टीकास्त्र सुरु असताना केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीदेखील आपलं मत व्यक्त केलं आहे. 'एखाद्याच्या मानगुटीवर बसून बळजबरीने वसूल केलेल्या देणगीची भारतीय लष्कराला गरज नाही, मदत स्वच्छेने आली पाहिजे,' असं म्हणत मनोहर पर्रीकरांनी खडे बोल सुनावले आहेत. भारतीय नौदलाच्या कमांडर कॉन्फरनसचं उद्घाटनावेळी पर्रिकर पत्रकार परिषदेत बोलत होते. 
 
(करणची 'मुश्किल' दूर, मनसेची 'सशर्त' माघार)
 
'उद्या एखाद्याला सैन्यासाठी निधी द्यायचा असेल, तर देऊ शकतो. मात्र, मदत ही ऐच्छिक असावी, कोणाच्या मानगुटीवर बसून जबरदस्तीने घेतलेल्या देणगीची सैन्याला गरज नाही,' असं मनोहर पर्रीकर बोलले आहेत. यावेळी बोलताना पर्रीकरांनी पाकिस्तानमधील क्वेटा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर दुख: व्यक्त केलं. तसंच दहशतवाद्यांचं समर्थन केल्यास दहशतवाद तुमच्यावर पलटू शकतो असं पाकिस्तानला सुनावलं आहे. 
 
('ए दिल है मुश्किलचा मार्ग मोकळा? करणसाठी सलमानची राज ठाकरेंकडे मध्यस्थी)
(इम्पाची पाकिस्तानी कलाकारांना नो एंट्री, 'रईस' आणि 'ए दिल है मुश्किल' चित्रपट अडचणीत)
 
'ऐ दिल है मुश्किल' चित्रपट प्रदर्शित होऊ देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लष्कराला 5 कोटींची मदत देण्याच्या अट घातली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी निर्माते आणि राज ठाकरे यांच्यात मध्यस्थी केल्यामुळे त्यांच्याकडे वारंवार स्पष्टीकरण मागितल जात होतं. मात्र आपला ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपट प्रदर्शनाच्या मोबदल्यात 5 कोटींची मदत सैनिक कल्याण निधीला देण्याच्या प्रस्तावाला विरोध होता असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 
 
 
मदत ऐच्छिक असावी तडजोडीसाठी नव्हे असंच माझं मत होतं. त्याबद्दलचं माझं मत मी राज ठाकरे यांच्यासमोरच व्यक्त केलं होतं. पण चित्रपट निर्मात्यांनी 5 कोटींची मदत देण्यास उत्सुक असल्याचं सांगितल्यानेच अखेर हा तोडगा काढला. शिवाय या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी विनंती केल्यानेच मी या वादात मध्यस्थी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
 
 उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना मनसेने विरोध केला होता. पाकिस्तानी कलाकार असलेला एकही चित्रपट रिलीज होऊ न देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळेच फवाद खान असलेल्या दिग्दर्शक करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाला मनसेने विरोध करत रिलीज होऊ न देण्याची धमकीच दिली होती. पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या वादावर तोडगा काढण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी मांडवली केल्याची टीका करण्यात येत होती.