शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मदत स्वेच्छेने आली पाहिजे, बळजबरीने नाही - मनोहर पर्रीकर

By admin | Updated: October 25, 2016 13:43 IST

एखाद्याच्या मानगुटीवर बसून बळजबरीने वसूल केलेल्या देणगीची भारतीय लष्कराला गरज नाही, मदत स्वच्छेने आली पाहिजे असं म्हणत मनोहर पर्रीकरांनी खडे बोल सुनावले आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चित्रपट निर्मात्यांसमोर सैनिक कल्याण निधीत पाच कोटी भरण्याची अट ठेवल्यावरुन राजकीय टीकास्त्र सुरु असताना केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीदेखील आपलं मत व्यक्त केलं आहे. 'एखाद्याच्या मानगुटीवर बसून बळजबरीने वसूल केलेल्या देणगीची भारतीय लष्कराला गरज नाही, मदत स्वच्छेने आली पाहिजे,' असं म्हणत मनोहर पर्रीकरांनी खडे बोल सुनावले आहेत. भारतीय नौदलाच्या कमांडर कॉन्फरनसचं उद्घाटनावेळी पर्रिकर पत्रकार परिषदेत बोलत होते. 
 
(करणची 'मुश्किल' दूर, मनसेची 'सशर्त' माघार)
 
'उद्या एखाद्याला सैन्यासाठी निधी द्यायचा असेल, तर देऊ शकतो. मात्र, मदत ही ऐच्छिक असावी, कोणाच्या मानगुटीवर बसून जबरदस्तीने घेतलेल्या देणगीची सैन्याला गरज नाही,' असं मनोहर पर्रीकर बोलले आहेत. यावेळी बोलताना पर्रीकरांनी पाकिस्तानमधील क्वेटा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर दुख: व्यक्त केलं. तसंच दहशतवाद्यांचं समर्थन केल्यास दहशतवाद तुमच्यावर पलटू शकतो असं पाकिस्तानला सुनावलं आहे. 
 
('ए दिल है मुश्किलचा मार्ग मोकळा? करणसाठी सलमानची राज ठाकरेंकडे मध्यस्थी)
(इम्पाची पाकिस्तानी कलाकारांना नो एंट्री, 'रईस' आणि 'ए दिल है मुश्किल' चित्रपट अडचणीत)
 
'ऐ दिल है मुश्किल' चित्रपट प्रदर्शित होऊ देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लष्कराला 5 कोटींची मदत देण्याच्या अट घातली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी निर्माते आणि राज ठाकरे यांच्यात मध्यस्थी केल्यामुळे त्यांच्याकडे वारंवार स्पष्टीकरण मागितल जात होतं. मात्र आपला ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपट प्रदर्शनाच्या मोबदल्यात 5 कोटींची मदत सैनिक कल्याण निधीला देण्याच्या प्रस्तावाला विरोध होता असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 
 
 
मदत ऐच्छिक असावी तडजोडीसाठी नव्हे असंच माझं मत होतं. त्याबद्दलचं माझं मत मी राज ठाकरे यांच्यासमोरच व्यक्त केलं होतं. पण चित्रपट निर्मात्यांनी 5 कोटींची मदत देण्यास उत्सुक असल्याचं सांगितल्यानेच अखेर हा तोडगा काढला. शिवाय या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी विनंती केल्यानेच मी या वादात मध्यस्थी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
 
 उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना मनसेने विरोध केला होता. पाकिस्तानी कलाकार असलेला एकही चित्रपट रिलीज होऊ न देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळेच फवाद खान असलेल्या दिग्दर्शक करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाला मनसेने विरोध करत रिलीज होऊ न देण्याची धमकीच दिली होती. पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या वादावर तोडगा काढण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी मांडवली केल्याची टीका करण्यात येत होती.