शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

वेतन आयोगाचे ओझे पेलण्यासाठी रेल्वेने मागितली वित्तमंत्र्यांकडे मदत

By admin | Updated: January 2, 2016 08:35 IST

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमुळे पडणाऱ्या वित्तीय ओझ्याचा मुकाबला करण्यासाठी रेल्वेने वित्त मंत्रालयाकडे जवळपास ३२ हजार कोटी रुपयांच्या वित्तीय अनुदानाची मागणी केली आहे.

नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमुळे पडणाऱ्या वित्तीय ओझ्याचा मुकाबला करण्यासाठी रेल्वेने वित्त मंत्रालयाकडे जवळपास ३२ हजार कोटी रुपयांच्या वित्तीय अनुदानाची मागणी केली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यासंदर्भात वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी रेल्वेची विद्यमान परिस्थिती, खर्चात कपात करण्याचे प्रयत्न आणि वेतन आयोगामुळे पडणारे ओझे सहन करण्यासाठी भाड्यातील संभाव्य फेरबदल आणि अन्य करबाह्य दराद्वारे मिळणारा महसूल यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी सरकारी अर्थसाह्याच्या मदतीचा आग्रह धरला आहे. रेल्वेमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी अर्थमंत्रालयाच्या सहकार्याची गरज आहे. त्याचबरोबर २०१३-१४ मध्ये कोचिंग सेवेसाठी ३१,७२७ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई किंवा महसुली मदतीच्या स्वरूपात आणि पुढील तीन-चार वर्षात देयकांची पूर्तता करण्यासाठी म्हणून ही मदत केली जाऊ शकते. अशी मदत केल्यास आगामी तीन-चार वर्षात रेल्वे आपल्या संसाधनाद्वारे वेतन आयोगामुळे वाढणारे वेतन देण्यासाठी सक्षम होईल. त्यादृष्टीने भाड्यात फेरबदल आणि अन्य उपायांबाबत पावले उचलण्यात येत आहेत. असे असले तरीही रेल्वेमंत्र्यांनी सध्याच्या स्थितीत भाड्यात वाढ करण्यास विरोध दर्शविला आहे. आताच भाडे वाढविल्यास त्याचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल, असे त्यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केल्यास रेल्वेवर २८,४५० कोटी रुपयांचे वार्षिक ओझे पडणार आहे. २०१६-१७ च्या रेल्वे अर्थसंकल्पात करावयाच्या उपाययोजनेपेक्षा या शिफारशींचा स्वतंत्र परिणाम होईल. सरकार वेतनावर जेवढा खर्च करते त्यापैकी ३५.६ टक्के खर्च एकट्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांवर होतो. याचा सातव्या वेतन आयोगाच्या एकूण ओझ्यापैकी एक तृतीयांश ओझे रेल्वेवर पडते, याकडे प्रभू यांनी लक्ष वेधले आहे.वेतनामुळे १०,८६१ कोटी रुपयांच्या ओझ्याची अपेक्षा होती, पण ती वास्तविक ३०,०३१ कोटी रुपयांपेक्षा अधिक असेल, असेही प्रभू यांनी स्पष्ट केले आहे. या पत्रात त्यांनी खर्चात कपात करण्यासाठी रेल्वेने योजलेल्या पावलांचाही उल्लेख केला आहे.