शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारीवर टाच!

By admin | Updated: June 16, 2016 04:30 IST

नियमित कामगारांना मिळणाऱ्या सर्व सोयी-सवलती रोजंदारी/कंत्राटी कामगारांनाही देण्यात याव्यात, या न्यायालये आणि लवादांनी केंद्र सरकारला नुकत्याच दिलेल्या निर्देशानंतर त्याची अंमलबजावणी

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली

नियमित कामगारांना मिळणाऱ्या सर्व सोयी-सवलती रोजंदारी/कंत्राटी कामगारांनाही देण्यात याव्यात, या न्यायालये आणि लवादांनी केंद्र सरकारला नुकत्याच दिलेल्या निर्देशानंतर त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी मोदी सरकारने आता रोजंदारी व कंत्राटी कामगारांना कामावर घेण्याची पद्धतच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकार आपल्या सेवेत कंत्राटी वा रोजंदारीवर कामगार/कर्मचारी घेऊ शकणार नाही. ही बंदी सर्वच श्रेणीतील पदांसाठी आहे. यामुळे नियमित कर्मचाऱ्यांवरील कामाचा बोजा वाढेल.या निर्णयाचा फटका सध्या केंद्रात कंत्राटी वा रोजंदारीवर असलेल्या कामगारांना लगेच बसणार नसला तरी संबंधित कामे संपल्यावर त्यांना नव्या कामांसाठी रोजगार दिला जाणार नाही.30% होणार बेरोजगार...- सरकारमध्ये सध्या कामावर घेण्यात आलेल्या रोजंदारी/ कंत्राटी कामगारांची नेमकी संख्या किती आहे, हे समजू शकले नाही. - तथापि ५० लाख कर्मचाऱ्यांमध्ये किमान ३० टक्के कर्मचारी हे रोजंदारी कामगार आहेत, असे कार्मिक मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. - सध्याच्या कामगारांवर या बंदीचा काय परिणाम होईल आणि त्यांना रिक्त पदे भरताना सामावून घेण्यात येईल का, हे कळू शकले नाही. तसेच हे परिपत्रक सार्वजनिक उपक्रम व स्वायत्त संस्थांनाही लागू आहे किंवा काय हेही स्पष्ट नाही.हाताला काम मिळणार का?- या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या विविध सेवांमध्ये काम करणारे १५ लाख लोक काही काळात बेरोजगार होतील, असे दिसत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक बेरोजगार झाल्यास खासगी क्षेत्रांत त्यांना कामे मिळतील का, हा प्रश्न आहे. तसेच खासगी क्षेत्रात आणखी कमी रोजंदारीवर त्यांना काम करावे लागेल. - सुमारे १५ लाख लोक केंद्राच्या विविध सेवांत कंत्राटी वा रोजंदारी पद्धतीने काम करीत आहेत. हा निर्णय केंद्र सरकारपुरताच असला तरी राज्य सरकारांनीही तो लागू केल्यास बेरोजगारांच्या संख्येत खूपच मोठी वाढ होईल, अशी भीती आहे....तर शिस्तभंगाची कारवाई...‘रोजंदारी कामगारांची भरती करणे तत्काळ बंद करा,’ असा आदेश असलेले परिपत्रक पंतप्रधानांकडे असलेल्या कार्मिक विभागाने सर्व मंत्रालये आणि विभागांसाठी मंगळवारी रात्री जारी केले. या आदेशाचा भंग केल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या परिपत्रकात दिला आहे.मागण्या बाजूलाच...कामगार संघटनांकडून रोजंदारी/कंत्राटी कामगारांना नियमित करण्याची मागणी करण्यात येत असल्यानेही केंद्र सरकारची चिंता वाढली होती. अस्थायी वा रोजंदारी कामगारांच्या भरतीबद्दल कडक मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिलेली असतानाही विविध मंत्रालय व विभागांनी मोठ्या प्रमाणावर रोजंदारी कामगारांची भरती केली आहे. रोजंदारी कामगारही साप्ताहिक सुटी, वैद्यकीय सवलती आणि अन्य लाभ मिळावे, अशी मागणी करीत असल्यानेही त्यांच्या नोकरीवरच गदा आणली असल्याचे समजते. - ताज्या सरकारी अहवालानुसार केंद्राच्या विविध विभागांमध्ये ८ लाख पदे रिक्त आहेत.