शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

रोजंदारीवर टाच!

By admin | Updated: June 16, 2016 04:30 IST

नियमित कामगारांना मिळणाऱ्या सर्व सोयी-सवलती रोजंदारी/कंत्राटी कामगारांनाही देण्यात याव्यात, या न्यायालये आणि लवादांनी केंद्र सरकारला नुकत्याच दिलेल्या निर्देशानंतर त्याची अंमलबजावणी

- हरीश गुप्ता, नवी दिल्ली

नियमित कामगारांना मिळणाऱ्या सर्व सोयी-सवलती रोजंदारी/कंत्राटी कामगारांनाही देण्यात याव्यात, या न्यायालये आणि लवादांनी केंद्र सरकारला नुकत्याच दिलेल्या निर्देशानंतर त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी मोदी सरकारने आता रोजंदारी व कंत्राटी कामगारांना कामावर घेण्याची पद्धतच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकार आपल्या सेवेत कंत्राटी वा रोजंदारीवर कामगार/कर्मचारी घेऊ शकणार नाही. ही बंदी सर्वच श्रेणीतील पदांसाठी आहे. यामुळे नियमित कर्मचाऱ्यांवरील कामाचा बोजा वाढेल.या निर्णयाचा फटका सध्या केंद्रात कंत्राटी वा रोजंदारीवर असलेल्या कामगारांना लगेच बसणार नसला तरी संबंधित कामे संपल्यावर त्यांना नव्या कामांसाठी रोजगार दिला जाणार नाही.30% होणार बेरोजगार...- सरकारमध्ये सध्या कामावर घेण्यात आलेल्या रोजंदारी/ कंत्राटी कामगारांची नेमकी संख्या किती आहे, हे समजू शकले नाही. - तथापि ५० लाख कर्मचाऱ्यांमध्ये किमान ३० टक्के कर्मचारी हे रोजंदारी कामगार आहेत, असे कार्मिक मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. - सध्याच्या कामगारांवर या बंदीचा काय परिणाम होईल आणि त्यांना रिक्त पदे भरताना सामावून घेण्यात येईल का, हे कळू शकले नाही. तसेच हे परिपत्रक सार्वजनिक उपक्रम व स्वायत्त संस्थांनाही लागू आहे किंवा काय हेही स्पष्ट नाही.हाताला काम मिळणार का?- या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या विविध सेवांमध्ये काम करणारे १५ लाख लोक काही काळात बेरोजगार होतील, असे दिसत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक बेरोजगार झाल्यास खासगी क्षेत्रांत त्यांना कामे मिळतील का, हा प्रश्न आहे. तसेच खासगी क्षेत्रात आणखी कमी रोजंदारीवर त्यांना काम करावे लागेल. - सुमारे १५ लाख लोक केंद्राच्या विविध सेवांत कंत्राटी वा रोजंदारी पद्धतीने काम करीत आहेत. हा निर्णय केंद्र सरकारपुरताच असला तरी राज्य सरकारांनीही तो लागू केल्यास बेरोजगारांच्या संख्येत खूपच मोठी वाढ होईल, अशी भीती आहे....तर शिस्तभंगाची कारवाई...‘रोजंदारी कामगारांची भरती करणे तत्काळ बंद करा,’ असा आदेश असलेले परिपत्रक पंतप्रधानांकडे असलेल्या कार्मिक विभागाने सर्व मंत्रालये आणि विभागांसाठी मंगळवारी रात्री जारी केले. या आदेशाचा भंग केल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या परिपत्रकात दिला आहे.मागण्या बाजूलाच...कामगार संघटनांकडून रोजंदारी/कंत्राटी कामगारांना नियमित करण्याची मागणी करण्यात येत असल्यानेही केंद्र सरकारची चिंता वाढली होती. अस्थायी वा रोजंदारी कामगारांच्या भरतीबद्दल कडक मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिलेली असतानाही विविध मंत्रालय व विभागांनी मोठ्या प्रमाणावर रोजंदारी कामगारांची भरती केली आहे. रोजंदारी कामगारही साप्ताहिक सुटी, वैद्यकीय सवलती आणि अन्य लाभ मिळावे, अशी मागणी करीत असल्यानेही त्यांच्या नोकरीवरच गदा आणली असल्याचे समजते. - ताज्या सरकारी अहवालानुसार केंद्राच्या विविध विभागांमध्ये ८ लाख पदे रिक्त आहेत.