शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

समान पाणी वाटपाच्या मुद्यावर आमदार ठाम मुंबईला सुनावणी : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने निकाल ठेवला राखीव

By admin | Updated: December 1, 2015 23:36 IST

मुख्य १ साठी

मुख्य १ साठी

जळगाव : गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका आणि पाणी योजनांचा विचार करता समान पाणी वाटपाचे तत्व लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातील पाच धरणांमधून गिरणा धरणात २५ टक्के पाणी सोडण्यात यावे या विषयावर जळगाव जिल्ह्यातील आमदारांनी ठामपणे बाजू मांडली.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण समितीसमोर मुंबई येथे मंगळवारी दुपारी १२ ते साडे तीन यावेळेत ही सुनावणी झाली. या सुनावणीला चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील, पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील, जळगाव ग्रामीण मतदार संघाचे आमदार गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, नाशिक जिल्ह्यातील आमदार व सहकार राज्यमंत्री दादा भुसे, आमदार राहुल अहेर, आमदार शेख, आमदार जे.पी.गावित, आमदार दीपिका चव्हाण यांच्यासह नाशिकचे महापौर, नाशिकचे मनपा आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील नागासाक्या, केळझर, हरणबारी, पुनोद, चणकापूर हे पाचही धरण शंभर टक्के भरलेले आहेत. या धरणातून २५ टक्के पाणी गिरणा धरणात पाणी सोडल्यास जळगाव जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील पाचही धरणांमधून पाणी सोडण्यास सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी विरोध केला. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दोन्ही बाजूचा निर्णय ऐकून घेत निकाल राखीव ठेवला आहे. आठवडाभरात निर्णय होण्याची या प्रकरणी शक्यता आहे.