शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

समान पाणी वाटपाच्या मुद्यावर आमदार ठाम मुंबईला सुनावणी : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने निकाल ठेवला राखीव

By admin | Updated: December 1, 2015 23:36 IST

मुख्य १ साठी

मुख्य १ साठी

जळगाव : गिरणा धरणावर अवलंबून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील नगरपालिका आणि पाणी योजनांचा विचार करता समान पाणी वाटपाचे तत्व लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातील पाच धरणांमधून गिरणा धरणात २५ टक्के पाणी सोडण्यात यावे या विषयावर जळगाव जिल्ह्यातील आमदारांनी ठामपणे बाजू मांडली.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण समितीसमोर मुंबई येथे मंगळवारी दुपारी १२ ते साडे तीन यावेळेत ही सुनावणी झाली. या सुनावणीला चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील, पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील, जळगाव ग्रामीण मतदार संघाचे आमदार गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, नाशिक जिल्ह्यातील आमदार व सहकार राज्यमंत्री दादा भुसे, आमदार राहुल अहेर, आमदार शेख, आमदार जे.पी.गावित, आमदार दीपिका चव्हाण यांच्यासह नाशिकचे महापौर, नाशिकचे मनपा आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील नागासाक्या, केळझर, हरणबारी, पुनोद, चणकापूर हे पाचही धरण शंभर टक्के भरलेले आहेत. या धरणातून २५ टक्के पाणी गिरणा धरणात पाणी सोडल्यास जळगाव जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यातील पाचही धरणांमधून पाणी सोडण्यास सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी विरोध केला. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दोन्ही बाजूचा निर्णय ऐकून घेत निकाल राखीव ठेवला आहे. आठवडाभरात निर्णय होण्याची या प्रकरणी शक्यता आहे.