शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बळीरामपेठेतील हॉकर्सचा मनपात तीन तास ठिय्या आयुक्तांनी नाकारले निवेदन: सुनावणीकडे पाठ फिरविल्याने कोर्टात बाजू मांडण्याचा दिला सल्ला

By admin | Updated: July 8, 2016 21:17 IST

जळगाव: बळीरामपेठेतील हॉकर्सची ५ रोजी सुनावणी घेऊन त्यांना ओटे ताब्यात देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ४ रोजी झालेल्या सुनावणीप्रसंगी दिले होते. मात्र त्या सुनावणीकडे पाठ फिरविणार्‍या २००च्या आसपास हॉकर्सनी शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनपात ९व्या मजल्यावर ठिय्या देत सुनावणी घेण्याची मागणी केली. मात्र तब्बल तीन तास ठिय्या दिल्यानंतर आयुक्तांनी दोन मिनिटे या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यात हॉकर्सचे निवेदन घेण्याचे नाकारत त्यांना कोर्टातच याबाबत आता बाजू मांडण्याची सूचना आयुक्तांनी केली.

जळगाव: बळीरामपेठेतील हॉकर्सची ५ रोजी सुनावणी घेऊन त्यांना ओटे ताब्यात देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ४ रोजी झालेल्या सुनावणीप्रसंगी दिले होते. मात्र त्या सुनावणीकडे पाठ फिरविणार्‍या २००च्या आसपास हॉकर्सनी शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनपात ९व्या मजल्यावर ठिय्या देत सुनावणी घेण्याची मागणी केली. मात्र तब्बल तीन तास ठिय्या दिल्यानंतर आयुक्तांनी दोन मिनिटे या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यात हॉकर्सचे निवेदन घेण्याचे नाकारत त्यांना कोर्टातच याबाबत आता बाजू मांडण्याची सूचना आयुक्तांनी केली.
मनपाने शहरातील सर्व प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावरील हॉकर्सचे सवार्ेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थलांतर करून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शिवाजीरोड, गोलाणी मार्केटसमोरील रस्ता, सुभाष चौक रस्ता आदी प्रमुख रस्त्यांवरील हॉकर्सचे स्थलांतर करण्यात आले. मात्र बळीरामपेठेतील हॉकर्सचे गोलाणीतील ओट्यांवर स्थलांतर करण्यात येणार असताना या हॉकर्सनी त्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. जिल्हा न्यायालयाने दावा फेटाळल्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपिल केले. त्यात ४ जुलै रोजी झालेल्या सुनावणी खंडपीठाने मनपाला ५ रोजी या हॉकर्सची सुनावणी घेऊन मनपाने आधी पाडलेल्या लॉटनुसार या हॉकर्सला गोलाणीतील ओटे ताब्यात देण्याचे व त्याचा अहवाल १३ जुलै रोजी न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपाने तातडीने ५रोजी शहर अभियंतांना प्राधिकृत करीत त्यांच्या ९व्या मजल्यावरील दालनात सकाळी ११ ते २ या वेळात या हॉकर्सची सुनावणी ठेवण्यात आली होती. त्याबाबत हॉकर्सला लाऊडस्पीकरवरून आवाहनही करण्यात आले होते. मात्र त्याकडे हॉकर्सने पाठ फिरविली.
जमावबंदी असल्याने फिरविली पाठ
याबाबत हॉकर्स असोसिएशनचे खजिनदार रवी महाजन यांनी सांगितले की, ४ रोजी रात्रीपर्यंत जळगावात आल्यानंतर ५ रोजीच्या सुनावणीसाठी सर्व हॉकर्सला निरोप देणे शक्य नव्हते. तरीही ५रोजी सकाळी १० वाजता पदाधिकारी मनपात आले. मात्र त्यांना पावत्या व नोटरी आदी कागदपत्रे आणण्याचे सांगण्यात आले. त्यातच ईदमुळे जमावबंदी आदेश होता. त्यामुळे ८रोजी हॉकर्स मनपात येईल, असे सांगितले होते, असा दावा महाजन यांनी केला.
हॉकर्सचा दावा खोटा
शहर अभियंता दिलीप थोरात यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी हॉकर्सचा दावा खोटा असल्याचे सांगितले. ५ रोजीची सुनावणी न्यायालयाच्या आदेशाने घेण्यात आली. त्यास हॉकर्सने एकेक करून यायचे होते. त्यामुळे जमावबंदीचा विषयच नव्हता,असे स्पष्ट केले.