शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

कोरफडीची शेती करुन 'तो' झाला करोडपती

By admin | Updated: July 12, 2016 13:05 IST

सरकारी नोकरी मिळाल्यानंतर माणूस आत्मसंतुष्ट होतो. आयुष्यभरासाठी आर्थिक सुरक्षितता मिळाल्याची त्याची भावना असते. 'त्याच्याकडे'ही सरकारी नोकरी होती. पण त्यात तो समाधानी नव्हता.

ऑनलाइन लोकमत

जैसलमेर, दि. १२ - सरकारी नोकरी मिळाल्यानंतर माणूस आत्मसंतुष्ट होतो. आयुष्यभरासाठी आर्थिक सुरक्षितता मिळाल्याची त्याची भावना असते. 'त्याच्याकडे'ही सरकारी नोकरी होती. पण त्यात तो समाधानी नव्हता. त्याची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबाची होती. त्याला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करायचे होते. एकदा त्याने दिल्लीत भरलेल्या कृषी प्रदर्शनाला भेट दिली आणि ही भेट त्याच्या आयुष्याला एक वेगळे वळण देऊन गेली. ही गोष्ट आहे राजस्थानच्या हरीश धनदेवची. 
 
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार कृषी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर हरीशने त्याच्या १२० एकर शेतजमिनीत कोरफड आणि अन्य पिकांची शेती सुरु केली. आता शेतीमधून हरीशला वर्षाला दीड ते दोन कोटी रुपयांची कमाई होते. जैसलमेरपासून ४५ कि.मी. अंतरावर दहीसर येथे हरीशने स्वत:ची कंपनी सुरु केली आहे. थारच्या जमिनीत मोठया प्रमाणात लागवड केली जाणारी कोरफड पतांजली फुड प्रोडक्टसला पाठवली जाते. पंतांजलीमध्ये त्यापासून कोरफडीचा ज्यूस बनवला जातो. 
 
थारच्या वाळवंटात पिकवल्या जाणा-या कोरफडीचा दर्जा उत्तम असल्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कोरफडीला मोठी मागणी आहे. धनदेवने जो धोका पत्करला आज त्याचा त्याला फायदा होत आहे. तो जैसलमेर महापालिकेत ज्यूनियर इंजिनीयरपदावर नोकरीला होता. धनदेवकडे जमीन आणि पाणी होते पण काय करावे हे त्याला माहित नव्हते. 
 
मागच्यावर्षी त्याने कृषी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर त्याला कोरफड, आमला आणि गुंडाची शेती करण्याची कल्पना मिळाली. वाळवंटात बाजरी, गहू, मूंग ही पिके घेतली जातात. ब्राझील, हॉंगकॉंग आणि अमेरिकेत कोरफडीला मोठी मागणी आहे. सुरुवातीला हरीशने ८० हजार रोपटी लावली होती. आता त्याने ही संख्या वाढवून सात लाख केली आहे.