शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याची सांगता

By admin | Updated: April 20, 2015 13:10 IST

तालुक्यातील सुलतापूर येथील हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याची सांगता कृष्णाजी नवले यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

नेवासा : तालुक्यातील सुलतापूर येथील हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याची सांगता कृष्णाजी नवले यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. गोशाळेचे उद्घाटनही यावेळी झाले. सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने नामवंतांची प्रवचने, कीर्तने झाली.विकासप्रश्नी चर्चाकरंजी : पाथर्डी तालुक्यातील विविध रस्ते व इतर प्रश्नी तालुक्यातील शिष्टमंडळाने राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री, अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन चर्चा केली. शिष्टमंडळात जि.प. सदस्या उषा कराळे, सेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल कराळे, देविदास वांढेकर, सरपंच शिवाजी मचे व इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश होता.अध्यक्षपदी खाटीकनेवासा : तालुक्यातील सुलतानपूर सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी शिवाजी नारायण खाटीक यांची तर उपाध्यक्षपदी प्रमोद काशिनाथ शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी संजय आगळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित संचालकांच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.भाविकांची गर्दीपाथर्डी : शनि अमावस्येनिमित्त मायंबा येथे शनिवारी भाविकांनी गर्दी केली होती. नाथांचा जयघोष करीत मढी, मायंबा येथे संजीवन समाधीसह वृध्देश्वरच्या स्वयंभू शिवपिंडीचे भाविकांनी दर्शन घेतले. यानिमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.खंडित वीज पुरवठापाथर्डी : तालुक्यातील धारवाडीसह गितेवाडी, डोंगरवाडी येथील वीज पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वीज पुरवठा करणार्‍या मुख्य लाईनच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.शाळेला पुरस्कारटाकळीढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील बेटवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरावर व्दितीय क्रमांक मिळाला, अशी माहिती पोपट ठाणगे यांनी दिली.,टाकळीत सप्ताहटाकळीढोकेश्वर : येथील दत्त मंदिरात १९ ते २६ एप्रिल याकालावधीत डॉ.नारायण महाराज जाधव व बाळासाहेब महाराज पायमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहात नामवंतांची प्रवचने व कीर्तने होणार आहेत.,बससेवा सुरुढवळपुरी : सुतारवाडी-भगवानगड या सुरु करण्यात आलेल्या बससेवेचा शुभारंभ श्री क्षेत्र भगवानगड येथे मठाधिपती, न्यायाचार्य डॉ. नामदेवशास्त्री सानप महाराज यांच्या हस्ते झाला. बससेवा सुरु झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले.