शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

हडप्पा संस्कृती ५५०० वर्षे जुनी नसून ८००० वर्षे जुनी

By admin | Updated: May 29, 2016 17:21 IST

आयआयटी-खड़गपुर मधील शास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी मिळून केलेल्या संशोधनात सिंधू संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृती ही ५५०० वर्षे जुनी नसून कमीत कमी ८००० वर्षे जुनी

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २९ : आयआयटी-खड़गपुर मधील शास्त्रज्ञ आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी मिळून केलेल्या संशोधनात सिंधू संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृती ही ५५०० वर्षे जुनी नसून कमीत कमी ८००० वर्षे जुनी असल्याचे पुरावे मिळाले आहेत. म्हणजेच हडप्पा संस्कृती ही इजिप्त (इ.स.पूर्व ७००० ते इ.स.पूर्व ३०००) आणि मेसोपोटेमिया (इ.स.पूर्व ६५०० ते इ.स.पूर्व ३१००) या जगातील सर्वात जुन्या असलेल्या संस्कृतींच्या आधीच्या कालखंडात अस्तित्त्वात होती. याबरोबरच शास्त्रज्ञांना हडप्पा संस्कृतीच्याही पूर्वी सुमारे एक हजार वर्षे अस्तिवात असलेल्या संस्कृतीचे पुरावे मिळाले आहेत.
 
हे संशोधन प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या नेचर जर्नल मध्ये २५ मे रोजी समाविष्टकरण्यात आले आहे. यामुळे जगात विविध मानवी संस्कृतींचा उदय आणि त्यांचा कार्यकाळ याबाबत नव्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले जात आहे. हवामानात होणारे बदल आणि क्रमाक्रमाने कमी होत जाणारा पाऊस यामुळे ही संस्कृती सुमारे ३००० वर्षांपूर्वी लोप पावली असावी असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. हडप्पा संस्कृती ही पाकिस्तानातील मोहेंजोदाडो आणि हडप्पा तर भारतातील लोथल, धोलावीरा आणि काली बंगा या पलीकडे देखील वाढली होती आणि हरियाणा मधील भिर्दाना आणि राखीगाढी या आतील भागांपर्यंत परसली होती हे सिद्ध करण्यासाठी हे संशोधन करण्यात आले होते. यात शास्त्रज्ञांना प्राण्यांच्या हाडांचे तसेच दातांचे अवशेष मिळाले आहेत.
दुष्काळसदृश्य स्थितीतही हडप्पा संस्कृती वाढली 
 
हडप्पा संस्कृतीच्या शेवटचा कालखंड हा मोठ्या प्रमाणावर स्थलांतर, लोकसंख्येतील घट, हिंसा आणि हडप्पा कालीन लिपीचा अस्त अशा अनेकसामाजिक बदलांचा साक्षीदार होता असे एका शास्त्रज्ञाने सांगितले. संशोधनातील निरीक्षणानुसार पाऊस कमी हा सात हजार वर्षापासून होत गेला पण संकृती लोप पावली नाही. या कालखंडातील लोक हे बदलत्या हवामानाशी जुळवून घेणारे होते. त्यांनी हवामांतील बदलांनुसार पिकं घेण्याच्या पद्धतीत बदल देखील केले होते. पिक टंचाईशी कसा सामना करायचा हे हडप्पा संस्कृतीतील सापडलेले पिकांच्या साठवणीचे सुसंघटित तंत्राचे पुरावे दाखवून देतात. तसेच यावरून त्याकाळातील पिक प्रक्रिया ही अधिक वैयक्तिक व घरगुती आधारित पीक प्रक्रिया होती असे दिसून येते. हे बदलत्या हवामानाबरोबरच स्थलांतर होण्याचे आणि परिणामी संस्कृती नामशेष होण्याचे प्रमुख कारण असावे असे शास्त्रज्ञांचे मत आहे.