शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

उसाचे क्षेत्र आले निम्म्यावर

By admin | Updated: March 11, 2016 22:24 IST

जळगाव- एकेकाळी ऊस उत्पादनात आघाडीवर राहीलेल्या जिल्ह्यात अलीकडे उसाचे क्षेत्र घटले आहे. मागील हंगामांच्या तुलनेत हे क्षेत्र निम्यावर आले आहे. यातच जेथे कारखाना नाही त्या चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक २२६६ हेक्टरवर ऊस आहे.

जळगाव- एकेकाळी ऊस उत्पादनात आघाडीवर राहीलेल्या जिल्ह्यात अलीकडे उसाचे क्षेत्र घटले आहे. मागील हंगामांच्या तुलनेत हे क्षेत्र निम्यावर आले आहे. यातच जेथे कारखाना नाही त्या चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक २२६६ हेक्टरवर ऊस आहे.
ऊस हे काही वर्षांपूर्वी महत्त्वाचे नगदी पीक म्हणून जिल्ह्यात घेतले जात होते. त्याचे सर्वसाधारण क्षेत्र १८ हजार हेक्टर होते. बेलगंगा, कासोदा, मधुकर चोपडा हे साखर कारखाने सुरू होते. आता फक्त मधुकर, मुक्ताई व चोपडा साखर कारखाना सुरू आहे. पैकी चोपडा कारखान्याची स्थिती जेमतेम आहे.

भाव अस्थिर
उसाला टनमागे १८५० पर्यंत भाव आहे. त्यातही पहिली उचल १५०० प्रति टन मिळते. त्यानंतर एक हप्ता २०० रुपयांचा व तिसरा आणि शेवटचा हप्ता १५० रुपयांचा असतो. हा पैसा मिळण्यास आठ ते १० महिन्यांचा कालावधी लागतो.

नियोजनाचा अभाव
ऊस तोडणीचे नियोजन व्यवस्थित नसते. तोडणी करणार्‍या मजुरांना तीन ते चार हजार रुपये द्यावे लागतात. शिवाय त्यांच्या भोजनाची व्यवस्था करावी लागते. यातच उसाची हिरवी पाने लागू नयेत यासाठी मजूर ऊस जाळतात. त्यात उसाचे वजन कमी होते. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होते.

पाण्याची गरज अधिक
ऊस केळीसारखेच नाजूक पीक आहे. ४० अंश सेल्सीअसपेक्षा अधिक तापमानात ते व्यवस्थितपणे येत नाही. त्याला केळीपेक्षा अधिक पाणी लागते. मागील तीन वर्षे पर्जन्यमान जेमतेम होते. भूजलपातळी घटल्याने अनेक शेतकर्‍यांनी ऊस लागवड टाळल्याची माहिती मिळाली.

तीन्ही कारखान्यांच्या क्षेत्रात जेमतेम लागवड
मधुकर, चोपडा व आणि मक्ताई कारखान्याच्या क्षेत्रात, लगतच्या भागात उसाची लागवड फारशी नाही. मधुकर कारखाना असलेल्या यावल तालुक्यात १४८६ हेक्टर लागवड आहे.

ऊस लागवडीची माहिती
(लागवड हेक्टरमध्ये)
भुसावळ- ९१
बोदवड- १९८
यावल- १४८६
रावेर- ९६
मुक्ताईनगर- ६७
भडगाव- ६००
अमळनेर- ०३
एरंडोल- ३४
धरणगाव- ०५
पारोळा- २४
चोपडा- २४२
पाचोरा- ५८
चाळीसगाव- २२६६
जामनेर- ४३

ऊस लागवडीत आडसालीचे क्षेत्र १३०२, सुरू ९४५, खोडवा १०६१ खोडवा आहे. त्यात सुरू उसाचे क्षेत्र आणखी वाढू शकते, अशी शक्यता कृषि उपसंचालक पी.के.पाटील यांनी व्यक्त केली.