शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

...तर अर्ध्या तासात जम्मूहून पाकला जाणे शक्य

By admin | Updated: March 13, 2016 04:03 IST

अर्ध्या तासात जम्मू भागातून पाकिस्तानात जाणे शक्य झाले तर कसे वाटेल? अर्थात हे स्वप्न नाही. तसे होणे सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी जम्मू-सियालकोट मार्ग खुला होणे आवश्यक आहे.

सुरेश डुग्गर, सुचेतगढ (जम्मू फ्रंटियर)अर्ध्या तासात जम्मू भागातून पाकिस्तानात जाणे शक्य झाले तर कसे वाटेल? अर्थात हे स्वप्न नाही. तसे होणे सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी जम्मू-सियालकोट मार्ग खुला होणे आवश्यक आहे. तो खुला व्हावा, असे अनेकांना वाटते. पण त्यासाठी दरवेळी दोन देशांतील संबंध आडवे येतात.जम्मूहून सियालकोट अंतर आहे केवळ २५ किलोमीटर अंतरावर आणि दोन्ही देशातील सीमा आहे तेथून ११ किलोमीटर अंतरावर. जम्मू-सियालकोट मार्गामध्येच दोन देशांतील सीमा आणि चौकी येते. स्वातंत्र्यापूर्वी येथून ये -जा सततच होत असे. पण १९४७ साली दोन देश वेगळे झाले आणि श्रीनगर-रावळपिंडी मार्गाप्रमाणे हा मार्गही बंद झाला. जम्मू-सियालकोट सीमा ही कायम शांततेचे प्रतीक मानली गेली आहे. आतापर्यंत येथून ना कधी अतिरेकी कारवाया झाल्या, ना कधी दोन देशांतील सैन्यामध्ये तुंबळ युद्ध झाले. श्रीनगर-मुझफ्फराबाद आणि पुंछ-रावळकोट मार्ग व्यापारासाठी का होईना, पण याआधी खुले झाले. मात्र जम्मू-सियालकोट मार्ग मात्र बंदच राहिला. हा मार्ग खुला व्हावा, यासाठी माजी मुख्यमंत्री पै. मुफ्ती महमद सईद यांनी अनेकदा प्रयत्नही केला. पण त्यांनाही ते शक्य झाले नाही. भारत आणि पाकिस्तान यांना जोडणारा हा मार्ग अतिशय चांगल्या स्थितीत आहे. भारतीय जकात चौकी आणि पाकिस्तानची पिली चौकी याच मार्गावर आहे आणि दोन्ही देशांतील सैन्यांच्या संयुक्त बैठका याच ठिकाणी होतात. त्यामुळे हा मार्ग खुला व्हावा, असे जम्मू-काश्मीरमधील जनतेला वाटते. हा मार्ग खुला झाला, तर त्यांना २0 तास प्रवास करून वाघा बॉर्डरवर जावे लागणार नाही. सध्या तोच मार्ग प्रवासासाठी खुला आहे.