शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

...तर अर्ध्या तासात जम्मूहून पाकला जाणे शक्य

By admin | Updated: March 13, 2016 04:03 IST

अर्ध्या तासात जम्मू भागातून पाकिस्तानात जाणे शक्य झाले तर कसे वाटेल? अर्थात हे स्वप्न नाही. तसे होणे सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी जम्मू-सियालकोट मार्ग खुला होणे आवश्यक आहे.

सुरेश डुग्गर, सुचेतगढ (जम्मू फ्रंटियर)अर्ध्या तासात जम्मू भागातून पाकिस्तानात जाणे शक्य झाले तर कसे वाटेल? अर्थात हे स्वप्न नाही. तसे होणे सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी जम्मू-सियालकोट मार्ग खुला होणे आवश्यक आहे. तो खुला व्हावा, असे अनेकांना वाटते. पण त्यासाठी दरवेळी दोन देशांतील संबंध आडवे येतात.जम्मूहून सियालकोट अंतर आहे केवळ २५ किलोमीटर अंतरावर आणि दोन्ही देशातील सीमा आहे तेथून ११ किलोमीटर अंतरावर. जम्मू-सियालकोट मार्गामध्येच दोन देशांतील सीमा आणि चौकी येते. स्वातंत्र्यापूर्वी येथून ये -जा सततच होत असे. पण १९४७ साली दोन देश वेगळे झाले आणि श्रीनगर-रावळपिंडी मार्गाप्रमाणे हा मार्गही बंद झाला. जम्मू-सियालकोट सीमा ही कायम शांततेचे प्रतीक मानली गेली आहे. आतापर्यंत येथून ना कधी अतिरेकी कारवाया झाल्या, ना कधी दोन देशांतील सैन्यामध्ये तुंबळ युद्ध झाले. श्रीनगर-मुझफ्फराबाद आणि पुंछ-रावळकोट मार्ग व्यापारासाठी का होईना, पण याआधी खुले झाले. मात्र जम्मू-सियालकोट मार्ग मात्र बंदच राहिला. हा मार्ग खुला व्हावा, यासाठी माजी मुख्यमंत्री पै. मुफ्ती महमद सईद यांनी अनेकदा प्रयत्नही केला. पण त्यांनाही ते शक्य झाले नाही. भारत आणि पाकिस्तान यांना जोडणारा हा मार्ग अतिशय चांगल्या स्थितीत आहे. भारतीय जकात चौकी आणि पाकिस्तानची पिली चौकी याच मार्गावर आहे आणि दोन्ही देशांतील सैन्यांच्या संयुक्त बैठका याच ठिकाणी होतात. त्यामुळे हा मार्ग खुला व्हावा, असे जम्मू-काश्मीरमधील जनतेला वाटते. हा मार्ग खुला झाला, तर त्यांना २0 तास प्रवास करून वाघा बॉर्डरवर जावे लागणार नाही. सध्या तोच मार्ग प्रवासासाठी खुला आहे.