शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

गुलबर्ग नरसंहार; ११ जणांना जन्मठेप

By admin | Updated: June 18, 2016 05:05 IST

गुलबर्ग सोसायटी नरसंहार प्रकरण म्हणजे सभ्य समाजाच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस असल्याचे सांगत, विशेष एसआयटी न्यायालयाने या हत्याकांडातील २४ दोषींपैकी ११ जणांना

अहमदाबाद : गुलबर्ग सोसायटी नरसंहार प्रकरण म्हणजे सभ्य समाजाच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस असल्याचे सांगत, विशेष एसआयटी न्यायालयाने या हत्याकांडातील २४ दोषींपैकी ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने १२ आरोपींना सात वर्षे आणि एकाला दहा वर्षांची कैद दिली.सर्व दोषींना मृत्युदंड देण्याची मागणी फेटाळताना न्यायालयाने सांगितले की, राज्य सरकारने १४ वर्षांच्या कारावासानंतर शिक्षेत सवलत देण्याच्या अधिकाराचा वापर न केल्यास ११ दोषींची जन्मठेप त्यांच्या मृत्यूपर्यंत कायम राहील. त्यांना १४ वर्षांनंतर त्यांना शिक्षेत सवलत देण्याच्या आपल्या अधिकाराचा वापर सरकारने करू नये, अशी विनंती आहे. या प्रकरणातील १३ अन्य आरोपींना सातएक मांगीलाल जैनला न्यायालयाने १० वर्षांचा कारावास दिला आहे. गेल्या २ जूनला न्यायालयाने हत्या व इतर गुन्ह्यांमध्ये ११ जणांना दोषी ठरविले होते, तर विहिंप नेता अतुल वैद्यसह अन्य १३ जणांवर कमी गंभीर आरोप ठेवले होते. या प्रकरणातील एकूण ६६ आरोपींपैकी ३६ लोकांची न्यायालयाने पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली होती.खासदारासह ६९ लोकांना जिवंत जाळले होतेअहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटीत २८ फेब्रुवारी २००२ रोजी घडलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. गोधरा कांडानंतर झालेल्या या हिंसाचारात काँग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांच्यासह ६९ लोकांना जिवंत जाळण्यात आले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंगलीतील नऊ प्रकरणांच्या तपासाकरिता विशेष चौकशी पथक स्थापन केले होते. त्यामध्ये गुलबर्ग सोसायटीचा समावेश होता. (वृत्तसंस्था)मृत्युदंड का नाही?यापूर्वी अशी घटना घडल्याची नोंद नाही. घटनेनंतर ९० टक्के आरोपी जामिनावर होते. त्या काळात त्यांच्याविरुद्ध कुठलीही तक्रार नव्हती वा अथवा त्यांनी कोणता गुन्हा केला नाही. त्यामुळे दोषींना फाशीची शिक्षा देणे आम्हाला योग्य वाटत नाही, असे न्या. पी. बी. देसाई यांनी स्पष्ट केले.जन्मठेप : कैलाश धोबी, योगेंद्र शेखावत, जयेश जिंगार, कृष्णा कलाल, जयेश परमार, राजू तिवारी,भरत राजपूत, दिनेश शर्मा, नारायण टांक, लखनसिंग चुडासमा, भरत ताईली.सात वर्षे शिक्षा : अतुल वैद्य, मुकेश जिंगर, प्रकाश पाढियार, सुरेंद्रसिंग चौहान, दिलीप परमार, बाबू मारवाडी, मनीष जैन, धर्मेश शुक्ला, कपिल मिश्रा, सुरेश धोबी, अंबेश जिंगर आणि संदीप पंजाबी.