शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

जीएसटीला येत्या अधिवेशनाचा मुहूर्त?

By admin | Updated: May 22, 2016 02:51 IST

जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान बहुप्रलंबित जीएसटी विधेयकावर मान्यतेची मोहोर लागण्याची शक्यता आहे

हरीश गुप्ता, नवी दिल्लीजुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान बहुप्रलंबित जीएसटी विधेयकावर मान्यतेची मोहोर लागण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये चार राज्यांत दारुण पराभव वाट्याला आल्यामुळे काँग्रेसमध्ये नैराश्य पसरले असतानाच दुसरीकडे भाजपाचे कमळ फुलले आहे. शिवाय सर्व प्रादेशिक पक्षांनी या विधेयकाला समर्थन दिले असल्यामुळे आता जीएसटी विधेयक प्रत्यक्षात उतरू शकेल.या विधेयकाच्या मार्गातील अडसर दूर करताना काही तरतुदींवर आक्षेप घेणाऱ्या पक्षांचे मन वळविण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नव्याने पुढाकार घेत अनौपचारिक चर्चा सुरू केली आहे. चेन्नईत २३ मे रोजी अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांच्या शपथविधीला जेटली उपस्थित राहतील. जयललिता यांचा जीएसटीला असलेला विरोध सर्वज्ञात असून अद्याप त्यांनी संसदेत पक्षाच्या सहकार्याबद्दल अधिकृतरीत्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अण्णा द्रमुककडे राज्यसभेत १२ सदस्य असून पुढील महिन्यातील निवडणुकीत आणखी एका जागेची भर पडेल.निवडणूक जिंकल्यानंतर लगेच प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जीएसटी विधेयकाला समर्थन जाहीर केले आहे. तेलंगणच्या सत्ताधारी टीआरएस तसेच बिजद आणि समाजवादी पक्षाने या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. जीएसटी घटनादुरुस्ती विधेयक पारित करण्यासाठी २४५ सदस्यीय राज्यसभेतील दोन तृतीयांश सदस्यांचे समर्थन आवश्यक आहे.>हे विधेयक हाणून पाडायचे झाल्यास काँग्रेस आणि डाव्या पक्षांना अन्य छोट्या पक्षांच्या मदतीने ८२ मते मिळविणे आवश्यक ठरेल. आजवर काँग्रेसने संख्याबळाच्या आधारावर विधेयक फेटाळण्यासाठी (व्हेटो पॉवर) शस्त्र उपसले होते. ११ जून रोजी राज्यसभेची द्विवार्षिक निवडणूक होत असून पक्षाचे संख्याबळ ६५ वरून ५८ वर येऊन या पक्षाने नकाराधिकार गमावलेला असेल. डाव्यांकडे ९ तर राजद आणि संजदकडे (जेडीयू) एकत्रितरीत्या १३ खासदार आहेत, मात्र बिहारचे हित ध्यानी घेऊन हे दोन्ही पक्ष जीएसटीला विरोध करणार नाहीत. झामुमो, जद (सेक्युलर), केसी (एम), आययूएमएल या एकेक खासदार असलेल्या पक्षांचा काँग्रेसकडे कल असला तरी सद्यस्थितीत त्यांच्याकडून जीएसटीला विरोध शक्य नाही. त्यामुळेच हे विधेयक फेटाळण्यासाठी आवश्यक ८२ हा जादुई आकडा गाठणे काँग्रेससाठी खडतर ठरेल.