शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेत जीएसटी मंजूर!

By admin | Updated: March 30, 2017 05:07 IST

करव्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडविणाऱ्या वस्तू व सेवा कर विधेयकावर सात तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर

नवी दिल्ली : करव्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडविणाऱ्या वस्तू व सेवा कर विधेयकावर सात तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर लोकसभेच्या मंजुरीची मोहर उमटली. हे वित्त विधेयक असल्याने याला राज्यसभेची मंजुरी लागणार नाही, वरिष्ठ सभागृहात यावर केवळ चर्चा होईल आणि त्यानंतर राष्ट्रपतींकडे हे विधेयक मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. १ जुलैपासून ही नवी कररचना लागू होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीशी संबंधीत चार विधेयके लोकसभेत मांडली आणि त्यानंतर त्यावर सात त्यावर घमासान चर्चा झाली. त्यानंतर केंद्रीय जीएसटी, एकिकृत जीएसटी, केंद्रशासित प्रदेश जीएसटी व राज्यांना मिळणाऱ्या जीएसटी नुकसान भरपाईचे विधेयक अशी चार विधेयके आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली. चर्चेला उत्तर देताना जेटली म्हणाले की, या नव्या करव्यवस्थेत राज्य सरकारे आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचे रक्षण केले जाईल, तसेच कृषी क्षेत्रावर कोणताही कर लावला जाणार नाही. सध्या वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांसाठी करांवर कर आहेत. नवीन करप्रणालीमुळे एकच कर असेल आणि त्यामुळे अनेक वस्तू काही अंशी स्वस्त होतील. वस्तू कोण वापरणार त्यानुसार त्यावर जीएसटी किती लावायचा हे ठरेल. ही कररचना लागू झाल्यानंतर व्यापारी-व्यावसायिकांची विविध अधिकाऱ्यांकडून होणारी गळचेपी पूर्णपणे बंद होईल आणि भारतात एक देश एक कर अशी प्रणाली कार्यरत होईल. या विधेयकांवर चर्चा सुरू असताना काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी (पान ११ वर)निर्णय घेण्याचे अधिकार जीएसटी कौन्सिलकडे वस्तू व सेवा कर देशाच्या अर्थकारणात क्रांतीकारी बदल घडवणारे महत्वाचे पाऊल आहे. केंद्र व राज्य सरकारांना या कराची अमलबजावणी करण्याचे अधिकार असून भारताच्या संघराज्य व्यवस्थेचा सन्मान करीत जीएसटीशी संबंधित सारे महत्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार जीएसटी कौन्सिलकडे सोपवण्यात आले आहेत. जीएसटी विधेयक अमलात आणल्यानंतर पहिल्या पाच वर्षात ज्या राज्य सरकारांना महसुली उत्पन्नात तोटा सहन करावा लागेल, त्यांना पुरेशी नुकसान भरपाई देण्याची तरतूद विधेयकात आहे.  जीएसटी विधेयकामुळे देशात चलनवाढीचा धोका निर्माण होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. भाजपाच्या विरोधामुळे देशाला १२ लाख कोटींचा फटकासंयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने हे विधेयक आणले त्यावेळी भाजपानेच विरोध केला होता. त्यांच्या विरोधामुळे भारताचे १२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. जीएसटी कायद्याची संकल्पना मूलत: युपीए सरकारची आहे.जीएसटी कराची नेमकी टक्केवारी किती? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. सरकारकडे वस्तू व सेवानिहाय भिन्न दरांचे प्रस्ताव आले आहेत. 0 टक्के, ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के व २८ टक्के असे त्याचे ठळक स्तर (स्लॅब) आहेत. जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या वस्तूंवर 0 टक्के जीएसटी तर चैनीच्या वस्तू व सेवांवर २८ टक्के जीएसटी आकारला जाईल.