शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

कमी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना अनुदान

By admin | Updated: June 5, 2015 23:53 IST

कमी पावसाचा परिणाम पिकांवर झाल्यास सरकार शेतकऱ्यांना डिझेल, वीज आणि बियाणांसाठी अनुदान देईल.

नवी दिल्ली : कमी पावसाचा परिणाम पिकांवर झाल्यास सरकार शेतकऱ्यांना डिझेल, वीज आणि बियाणांसाठी अनुदान देईल. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शुक्रवारी भारतीय हवामान विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या विभागाने मान्सूनबद्दल गेल्या आठवड्यात केलेल्या सुधारित भाकितानुसार तो अपुरा असेल. या भाकितानंतर दुष्काळाची भीती व्यक्त होत आहे. बैठकीला वीज, जलस्रोत, ग्रामीण विकास, अन्न आणि खते मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. दुष्काळसदृश परिस्थितीला गेल्यावर्षी ज्या पद्धतीने तोंड दिले त्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांना डिझेल, बियाणे व विजेसाठी अनुदान देऊ, असे बैठकीनंतर सिंह यांनी सांगितले.दुष्काळसदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज आहे. अपुरा पाऊस पडल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रत्येक विभागात संपर्क अधिकारी नेमण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षीही एक लिटर डिझेलमागे १० रुपयांचे अनुदान दिले जाऊ शकते. वेगवेगळ््या योजनांखाली बियाणांवर ५० टक्के अनुदान व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज दिली जाईल.दुष्काळ परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारची ५८० जिल्ह्यांसाठी योजना तयार असल्याचे सिंह यांनी नुकतेच सांगितले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न अबाधित राहावे यासाठी यावर्षी नवी विमा योजना आणली जाईल. देशातील डाळींच्या पुरवठ्यात अडथळे येऊ नयेत व त्यांच्या किमतीही नियंत्रणात असाव्यात यासाठी डाळींची आयात केली जाईल. हवामान खात्याने २ जून रोजी केलेल्या भाकितानुसार दीर्घ कालावधीच्या सरासरीत पाऊस ९३ टक्क्यांवरून ८८ टक्के होईल, असे म्हटले होते. उत्तर-पश्चिम भारताला पावसाचा मोठा फटका बसेल. ४गेल्या वर्षी १२ टक्के पाऊस कमी झाल्यामुळे तेलबिया, कापूस व धान्याला फटका बसला होता. २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात कृषी आणि त्याच्याशी संबंधित विभागांची वाढ केवळ ०.२ टक्केच झाली होती.४अन्नधान्याचे उत्पादन २०१४-२०१५ या पीक वर्षात (जुलै-जून) २५१.१२ दशलक्ष टन झाले होते. ते त्या आधीच्या वर्षात विक्रमी २६५.०४ दशलक्ष टन होते.