शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
8
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
9
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
10
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
11
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
12
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
13
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
14
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
15
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
17
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
18
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
19
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
20
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास

घुमली नामाची गुरुवाणी

By admin | Updated: April 4, 2015 05:20 IST

आधुनिक कवी संतपरंपरेच्या जवळ जातो तेव्हाच त्याचे साहित्य श्रेष्ठ ठरते; मात्र मराठी साहित्य इंग्रजीच्या अनुकरणामुळे परंपरेपासून तुटले

अविनाश थोरात, घुमान (संत नामदेव नगरी)आधुनिक कवी संतपरंपरेच्या जवळ जातो तेव्हाच त्याचे साहित्य श्रेष्ठ ठरते; मात्र मराठी साहित्य इंग्रजीच्या अनुकरणामुळे परंपरेपासून तुटले, अशी टीका ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी केली. तब्बल १५ हजारांहून अधिक प्रेक्षकांनी भरलेल्या भव्य सभामंडपात महाराष्ट्र आणि पंजाबमधील अनुबंधाचा हा अनोखा सोहळा थाटात सुरू झाला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी व पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, स्वागताध्यक्ष भारत देसडला, संमेलनाचे संयोजक ‘सरहद’चे संजय नहार, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील आदी या वेळी उपस्थित होते. मावळते संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी मोरे यांच्याकडे संमेलनाची सूत्रे सुपुर्द केली. ‘पुंडलिक वरदा’, असे म्हणत मोरे यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यांनी घुमान, पंजाब व महाराष्ट्राचा अनुबंध विस्ताराने उलगडला. नाचणे व वाचण्यात भेद नाही. ज्ञान व आनंदात द्वंद्व नसते. त्यामुळे साहित्याचा उत्सव करण्यात गैर नाही. वारकरी संप्रदायाचे साहित्य हाच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह आहे. नामदेवांच्या नगरीत होत असलेले हे संमेलन गुणात्मकदृष्ट्या श्रेष्ठ आहे. हा मराठी अस्मितेचा उत्सवी आविष्कार आहे, त्यामध्ये काहीही गैर नाही, असे त्यांनी सांगितले.