शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

घुमली नामाची गुरुवाणी

By admin | Updated: April 4, 2015 05:20 IST

आधुनिक कवी संतपरंपरेच्या जवळ जातो तेव्हाच त्याचे साहित्य श्रेष्ठ ठरते; मात्र मराठी साहित्य इंग्रजीच्या अनुकरणामुळे परंपरेपासून तुटले

अविनाश थोरात, घुमान (संत नामदेव नगरी)आधुनिक कवी संतपरंपरेच्या जवळ जातो तेव्हाच त्याचे साहित्य श्रेष्ठ ठरते; मात्र मराठी साहित्य इंग्रजीच्या अनुकरणामुळे परंपरेपासून तुटले, अशी टीका ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी केली. तब्बल १५ हजारांहून अधिक प्रेक्षकांनी भरलेल्या भव्य सभामंडपात महाराष्ट्र आणि पंजाबमधील अनुबंधाचा हा अनोखा सोहळा थाटात सुरू झाला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी व पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, स्वागताध्यक्ष भारत देसडला, संमेलनाचे संयोजक ‘सरहद’चे संजय नहार, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील आदी या वेळी उपस्थित होते. मावळते संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी मोरे यांच्याकडे संमेलनाची सूत्रे सुपुर्द केली. ‘पुंडलिक वरदा’, असे म्हणत मोरे यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यांनी घुमान, पंजाब व महाराष्ट्राचा अनुबंध विस्ताराने उलगडला. नाचणे व वाचण्यात भेद नाही. ज्ञान व आनंदात द्वंद्व नसते. त्यामुळे साहित्याचा उत्सव करण्यात गैर नाही. वारकरी संप्रदायाचे साहित्य हाच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह आहे. नामदेवांच्या नगरीत होत असलेले हे संमेलन गुणात्मकदृष्ट्या श्रेष्ठ आहे. हा मराठी अस्मितेचा उत्सवी आविष्कार आहे, त्यामध्ये काहीही गैर नाही, असे त्यांनी सांगितले.