शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

घुमली नामाची गुरुवाणी

By admin | Updated: April 4, 2015 05:20 IST

आधुनिक कवी संतपरंपरेच्या जवळ जातो तेव्हाच त्याचे साहित्य श्रेष्ठ ठरते; मात्र मराठी साहित्य इंग्रजीच्या अनुकरणामुळे परंपरेपासून तुटले

अविनाश थोरात, घुमान (संत नामदेव नगरी)आधुनिक कवी संतपरंपरेच्या जवळ जातो तेव्हाच त्याचे साहित्य श्रेष्ठ ठरते; मात्र मराठी साहित्य इंग्रजीच्या अनुकरणामुळे परंपरेपासून तुटले, अशी टीका ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी केली. तब्बल १५ हजारांहून अधिक प्रेक्षकांनी भरलेल्या भव्य सभामंडपात महाराष्ट्र आणि पंजाबमधील अनुबंधाचा हा अनोखा सोहळा थाटात सुरू झाला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी व पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, स्वागताध्यक्ष भारत देसडला, संमेलनाचे संयोजक ‘सरहद’चे संजय नहार, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील आदी या वेळी उपस्थित होते. मावळते संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी मोरे यांच्याकडे संमेलनाची सूत्रे सुपुर्द केली. ‘पुंडलिक वरदा’, असे म्हणत मोरे यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यांनी घुमान, पंजाब व महाराष्ट्राचा अनुबंध विस्ताराने उलगडला. नाचणे व वाचण्यात भेद नाही. ज्ञान व आनंदात द्वंद्व नसते. त्यामुळे साहित्याचा उत्सव करण्यात गैर नाही. वारकरी संप्रदायाचे साहित्य हाच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह आहे. नामदेवांच्या नगरीत होत असलेले हे संमेलन गुणात्मकदृष्ट्या श्रेष्ठ आहे. हा मराठी अस्मितेचा उत्सवी आविष्कार आहे, त्यामध्ये काहीही गैर नाही, असे त्यांनी सांगितले.