शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

सरकार तूरडाळीवरील आयात शुल्क वाढवणार

By admin | Updated: April 25, 2017 00:37 IST

तूरडाळीवरील आयात शुल्क वाढवून १0 टक्क्यांवरून २५ टक्के करण्यास आपले मंत्रालय अनुकूल आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी केले.

नवी दिल्ली : तूरडाळीवरील आयात शुल्क वाढवून १0 टक्क्यांवरून २५ टक्के करण्यास आपले मंत्रालय अनुकूल आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी केले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पासवान यांची भेट घेतली. त्यानंतर पासवान यांनी हे वक्तव्य केले. तूरडाळीच्या किमतीत मोठी घसरण झाली असून, शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतही मिळेनाशी झाली आहे. या पार्श्वभूमीवर डाळीवरील सीमा शुल्कात वाढ करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी पासवान यांच्याकडे केली होती.दोघांच्या बैठकीनंतर पासवान यांनी पत्रकारांना सांगितले की,गेल्याच महिन्यात तूरडाळीच्या आयातीवर १0 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा कर २५ टक्के करण्याची मागणी केली आहे. तूरडाळीवर जास्त आयात शुल्क असावे, या मुद्द्याशी मी सहमत आहे. आम्ही त्यावर चर्चा करू आणि वित्त मंत्रालयाला शिफारस करू.पासवान यांनी सांगितले की, वास्तविक अन्न मंत्रालयानेही तूरडाळीवर २५ टक्के आयात शुल्क असावे असाच प्रस्ताव दिला होता. तथापि, ते १0 टक्के लावण्यात आले. कमी किमतीत डाळी आयात करून किमान आधारभूत किमतीत सरकारी संस्थांनाच विकल्या जाऊ नयेत, यासाठीही आयातीवर अधिक शुल्क असणे आवश्यक आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)तूर खरेदीला मुदतवाढ नाहीच-सरकारी संस्था शिलकी साठ्यासाठी डाळींची खरेदी करीत आहेत. किमान आधारभूत किमतीवर ही खरेदी सुरू आहे. खरीप हंगामाची तूर खरेदीची मुदत २२ एप्रिलपर्यंत होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या तूर खरेदीची मुदत वाढविण्याची मागणी केली होती. तथापि, ती केंद्राने फेटाळून लावली आहे. पासवान यांनी सांगितले की, तूर खरेदीची मुदत आता वाढविता येऊ शकत नाही. कारण आता शेतकऱ्यांकडील तूर संपली असून, बाजारात व्यापारी आणि आयातदारांचाच माल येत आहे. व्यापारी स्वस्त डाळ आयात करून किमान आधारभूत किमतीवर सरकारलाच विकत आहेत.