शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सरकार तूरडाळीवरील आयात शुल्क वाढवणार

By admin | Updated: April 25, 2017 00:37 IST

तूरडाळीवरील आयात शुल्क वाढवून १0 टक्क्यांवरून २५ टक्के करण्यास आपले मंत्रालय अनुकूल आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी केले.

नवी दिल्ली : तूरडाळीवरील आयात शुल्क वाढवून १0 टक्क्यांवरून २५ टक्के करण्यास आपले मंत्रालय अनुकूल आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी केले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पासवान यांची भेट घेतली. त्यानंतर पासवान यांनी हे वक्तव्य केले. तूरडाळीच्या किमतीत मोठी घसरण झाली असून, शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतही मिळेनाशी झाली आहे. या पार्श्वभूमीवर डाळीवरील सीमा शुल्कात वाढ करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी पासवान यांच्याकडे केली होती.दोघांच्या बैठकीनंतर पासवान यांनी पत्रकारांना सांगितले की,गेल्याच महिन्यात तूरडाळीच्या आयातीवर १0 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा कर २५ टक्के करण्याची मागणी केली आहे. तूरडाळीवर जास्त आयात शुल्क असावे, या मुद्द्याशी मी सहमत आहे. आम्ही त्यावर चर्चा करू आणि वित्त मंत्रालयाला शिफारस करू.पासवान यांनी सांगितले की, वास्तविक अन्न मंत्रालयानेही तूरडाळीवर २५ टक्के आयात शुल्क असावे असाच प्रस्ताव दिला होता. तथापि, ते १0 टक्के लावण्यात आले. कमी किमतीत डाळी आयात करून किमान आधारभूत किमतीत सरकारी संस्थांनाच विकल्या जाऊ नयेत, यासाठीही आयातीवर अधिक शुल्क असणे आवश्यक आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)तूर खरेदीला मुदतवाढ नाहीच-सरकारी संस्था शिलकी साठ्यासाठी डाळींची खरेदी करीत आहेत. किमान आधारभूत किमतीवर ही खरेदी सुरू आहे. खरीप हंगामाची तूर खरेदीची मुदत २२ एप्रिलपर्यंत होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या तूर खरेदीची मुदत वाढविण्याची मागणी केली होती. तथापि, ती केंद्राने फेटाळून लावली आहे. पासवान यांनी सांगितले की, तूर खरेदीची मुदत आता वाढविता येऊ शकत नाही. कारण आता शेतकऱ्यांकडील तूर संपली असून, बाजारात व्यापारी आणि आयातदारांचाच माल येत आहे. व्यापारी स्वस्त डाळ आयात करून किमान आधारभूत किमतीवर सरकारलाच विकत आहेत.