शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

स्वदेशी सहा आण्विक पाणबुड्यांना मंजुरी सरकारचा निर्णय : सात स्टिल्थ युद्धनौकांची निर्मितीही करणार

By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नौदलाला सक्षम करण्याकडे दमदार पाऊल टाकताना स्वदेशी सहा आण्विक पाणबुड्यांसह सात स्टिल्थ(रडारची नजर चुकवणाऱ्या) युद्धनौकांच्या निर्मितीला हिरवी झेंडी दाखविली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नौदलाला सक्षम करण्याकडे दमदार पाऊल टाकताना स्वदेशी सहा आण्विक पाणबुड्यांसह सात स्टिल्थ(रडारची नजर चुकवणाऱ्या) युद्धनौकांच्या निर्मितीला हिरवी झेंडी दाखविली आहे.
संपूर्ण भारतीय सागरी हद्दीत विशेषत: सामरिक डावपेचांच्यादृष्टीने मोक्याच्या अशा पर्शियन आखात ते मलाक्का पट्ट्यांपर्यंत एकूणच प्रतिकार क्षमता बळकट करण्याच्या उद्देशाने सुरक्षेसंबंधी मंत्रिमंडळ समितीने(सीसीएस) हा निर्णय घेतला आहे. मुंबईतील माझगाव गोदीत ५० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्प-१७ ए अंतर्गत चार स्टिल्थ युद्धनौकांची तर कोलकात्याच्या गार्डन रिच जहाजबांधणी आणि अभियांत्रिकी केंद्रात तीन युद्धनौकांची निर्मिती केली जाईल. एमडीएल आणि जीआरएसईदरम्यान या महिन्यात करारावर स्वाक्षरी केली जाणार असून त्यासाठी प्रारंभी चार हजार कोटींची रक्कम दिली जाईल.
या दोन्ही गोदींमध्ये प्रकल्पाच्या कामांना गती देण्यात आली आहे. माझगाव गोदीत यापूर्वी आयएनएस शिवालिक, आयएनएस सातपुडा आणि आयएनएस सह्याद्री या ६,१०० टन वजनाच्या युद्धनौकांची निर्मिती करण्यात आली असून २०१०-१२ या काळात त्यांचा नौदलात समावेश करण्यात आला आहे.
---------------------
नव्या युद्धनौका अधिक वेगवान
नव्या बहुउद्देशीय युद्धनौका ह्या आकाराने मोठ्या, अधिक वेगवान आणि गनिमी डावपेचांमध्ये त्या शिवालिकपेक्षा अधिक सरस राहतील. त्यांच्यावर अधिक शस्त्रे आणि सेन्सर्स लावण्यात येणार असून त्यांची वातावरणातील विविध प्रकारच्या संकटांना तोंड देण्याची क्षमता असेल, तथापि या सात युद्धनौकांच्या बांधणीसाठी एक दशकाचा कालावधी लागू शकतो, असे सूत्रांनी म्हटले.