शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर ! केंद्र सरकारकडून लवकरच 2.8 लाख कर्मचा-यांची भरती

By admin | Updated: March 2, 2017 10:15 IST

केंद्र सरकार फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार 2 लाख 80 हजार कर्मचा-यांची भरती करणार आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 2 - केंद्र सरकार फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार 2 लाख 80 हजार कर्मचा-यांची भरती करणार आहे. यापैकी 1लाख 80 हजार कर्मचारी पोलीस आणि आयकर विभागात मेगा भरती केले जाणार आहेत. 
मार्च 2016 पर्यंतच्या आकडेवारीनुसार केंद्राकडे असणा-या विविध 55 खात्यांमध्ये आणि मंत्रालयामध्ये 32 लाख 84 हजार कर्मचारी आहेत.
(एलपीजीच्या दरात ८६ रुपयांची वाढ)
यामध्ये रेल्वेच्या 13 लाख 31 हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. लष्करातील मनुष्यबळाचा यात समावेश नाही. त्यामुळे प्रस्तावित भरती केल्यास एकूण कर्मचाऱ्यांची संख्या मार्च 2018 पर्यंत 35 लाख 67 हजार एवढी होईल. आयकर खात्याचे मनुष्यबळ सध्या 46 हजार एवढे असून ते मार्च 2018 पर्यंत 80 हजार केलं जाईल. तर सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाला मार्च 2018 पर्यंत अतिरिक्त 41 हजार एवढे कर्मचा-यांची भरती केली जाईल.  
 
दिल्ली पोलीस आणि पॅरामिलिटरीचे मनुष्यबळ 10 कोटी 7 लाखांवरुन मार्च 2018 पर्यंत 11 लाख 13 हजार एवढे करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे.  दरम्यान रेल्वे खात्यात मात्र कर्मचारी भरतीबाबत सध्या कोणतीही तरतूद नसल्याची माहिती समोर येत आहे.