शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

निवडणुकीमुळे चार राज्यांत आमदारांसाठी ‘अच्छे दिन’

By admin | Updated: June 2, 2016 03:09 IST

राज्यसभेच्या ४ जागांसाठी वाढलेली चुरस पाहता, चार राज्यांमधील आमदारांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. आमदारांना वळते करण्यासाठी मोठी बोली लावली जाण्याचे संकेत मिळाले आहेत.

हरीश गुप्ता,  नवी दिल्लीराज्यसभेच्या ४ जागांसाठी वाढलेली चुरस पाहता, चार राज्यांमधील आमदारांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. आमदारांना वळते करण्यासाठी मोठी बोली लावली जाण्याचे संकेत मिळाले आहेत. या निवडणुकीत विविध पक्ष आणि राजकीय वर्तुळात असलेले संबंध, तसेच आमदारांच्या संख्याबळावरून लावले जाणारे डावपेच कसोटीला उतरणार असे दिसते.नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी हरियाणा, झारखंड, उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये हे चित्र दिसत असून, निवडणुकीची रंगत वाढली आहे. भाजपाने हरियाणा, झारखंड आणि उत्तराखंडमध्ये संख्याबळाच्या तुलनेत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा जुगार खेळला आहे. काँग्रेसनेही कर्नाटकमध्ये तिसरी जागा पटकाविण्यासाठी रिअल इस्टेट सम्राट के. सी. राममूर्ती यांना उमेदवारी देत कंबर कसली. हरियाणात तर काट्याची चुरस शिगेला पोहोचण्याची चिन्हे आहेत. ९० सदस्यीय विधानसभेत ४७ आमदार असलेल्या भाजपाने केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री वीरेंद्र सिंग यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे मीडिया सम्राट सुभाषचंद्र यांनी ओमप्रकाश चौटाला यांच्या आयएनएलडीचे १९, बसपा आणि अकाली दलाच्या प्रत्येकी एक, तसेच ५ अपक्षांच्या समर्थनाच्या बळावर अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. १७ आमदार असलेल्या काँग्रेसने उमेदवार उभा केला नसला, तरी ज्येष्ठ वकील आर. के. आनंद हे काँग्रेसशी निकटस्थ मानले जातात. स्वत: चौटाला यांनीही त्यांना समर्थनाचे आश्वासन दिले आहे.८१ सदस्यीय झारखंड विधानसभेत भाजपाकडे ४५ आमदार असून, केवळ एक उमेदवार निवडून आणण्याची क्षमता असताना, या पक्षाने मुख्तार अब्बास नकवी आणि महेश पोद्दार यांना उभे केले आहे. हेमंत सोरेन यांचे बंधू वसंत सोरेन यांचा पराभव हाच भाजपाचा हेतू दिसून येतो. उत्तराखंडमधील एकमेव जागेवर भाजपाला विजयाची खात्री नसतानाही, या पक्षाने काँग्रेसच्या असंतुष्ट आमदारांवर डोळा ठेवत गीता ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या प्रदीप तामता यांची अडचण वाढली आहे. त्यामुळे ११ जून रोजी निकाल जाहीर होईपर्यंत उत्तराखंडच्या आमदारांना ‘चांगले’ दिवस येतील.