शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

अच्छे दिन वाले सरकार नापास झाले - राहुल गांधी

By admin | Updated: April 20, 2015 17:04 IST

केंद्रातील अच्छे दिनवाले सरकार नापास झाले आहे अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी लोकसभेत केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २० - मोदी सरकार हे 'सुटबूट'वाल्यांचे सरकार असून अच्छे दिनवाले सरकार नापास झाले आहे अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी लोकसभेत केली आहे. राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत मोदी सरकारवर निशाणा साधला असून मोदी सरकार हे उद्योजकांचे सरकार आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

सोमवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण केले. राहुल गांधींच्या भाषणाच्या वेळी काँग्रेसचे सर्व खासदार संसदेत उपस्थित होते. यूपीए सरकारच्या काळात शेतक-यांच्या पिकांना योग्य भाव मिळत होता. पण मोदी सरकारने शेतक-यांच्या पिकांना योग्य भाव दिला नाही असा आरोप त्यांनी केला. दोन्ही सरकारच्या काळातील तफावत मांडण्यासाठी राहुल गांधी यांनी आकडेवारी सादर करत सत्ताधा-यांची पोलखोल केली.  केंद्र सरकार शेतकरी व कामगार वर्गाकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाच्या आकडेवारीसंदर्भात पंतप्रधान व केंद्राच्या अन्य मंत्रालयांमध्ये समन्वयच नाही. म्हणून मोदींनी शेतक-यांमध्ये जाऊन त्यांचे दुःख जाणून घ्यावे असे राहुल गांधींनी म्हटले आहे. 

देशातील ६० टक्के जनता ही शेतीवर अवलंबून आहे. मोदी यांना राजकारणाची चांगली जाण आहे. मग अशा स्थितीत ते ऐवढ्या मोठ्या वर्गाला कसे दुखवू शकतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

नितीन गडकरींचे कौतुक

लोकसभेत भाषणाच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी थेट नितीन गडकरी यांचे कौतुक केले पाहिजे असे सांगत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले होते. नितीन गडकरी यांचे कौतुक केले पाहिजे, जे मनात आहे तेच बोलतात, शेतक-यांनी केंद्र सरकारवर अवलंबून राहू नये असे गडकरींनी म्हटले होते. ते योग्यच होते असा चिमटाही त्यांनी काढला.