शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
3
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
4
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
5
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
6
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
7
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
8
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
9
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
10
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
11
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
12
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
13
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
14
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
15
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
16
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
17
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
18
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
19
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
20
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव

अच्छे दिन वाले सरकार नापास झाले - राहुल गांधी

By admin | Updated: April 20, 2015 17:04 IST

केंद्रातील अच्छे दिनवाले सरकार नापास झाले आहे अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी लोकसभेत केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २० - मोदी सरकार हे 'सुटबूट'वाल्यांचे सरकार असून अच्छे दिनवाले सरकार नापास झाले आहे अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी लोकसभेत केली आहे. राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत मोदी सरकारवर निशाणा साधला असून मोदी सरकार हे उद्योजकांचे सरकार आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

सोमवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण केले. राहुल गांधींच्या भाषणाच्या वेळी काँग्रेसचे सर्व खासदार संसदेत उपस्थित होते. यूपीए सरकारच्या काळात शेतक-यांच्या पिकांना योग्य भाव मिळत होता. पण मोदी सरकारने शेतक-यांच्या पिकांना योग्य भाव दिला नाही असा आरोप त्यांनी केला. दोन्ही सरकारच्या काळातील तफावत मांडण्यासाठी राहुल गांधी यांनी आकडेवारी सादर करत सत्ताधा-यांची पोलखोल केली.  केंद्र सरकार शेतकरी व कामगार वर्गाकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाच्या आकडेवारीसंदर्भात पंतप्रधान व केंद्राच्या अन्य मंत्रालयांमध्ये समन्वयच नाही. म्हणून मोदींनी शेतक-यांमध्ये जाऊन त्यांचे दुःख जाणून घ्यावे असे राहुल गांधींनी म्हटले आहे. 

देशातील ६० टक्के जनता ही शेतीवर अवलंबून आहे. मोदी यांना राजकारणाची चांगली जाण आहे. मग अशा स्थितीत ते ऐवढ्या मोठ्या वर्गाला कसे दुखवू शकतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

नितीन गडकरींचे कौतुक

लोकसभेत भाषणाच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी थेट नितीन गडकरी यांचे कौतुक केले पाहिजे असे सांगत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले होते. नितीन गडकरी यांचे कौतुक केले पाहिजे, जे मनात आहे तेच बोलतात, शेतक-यांनी केंद्र सरकारवर अवलंबून राहू नये असे गडकरींनी म्हटले होते. ते योग्यच होते असा चिमटाही त्यांनी काढला.