शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

अच्छे दिन वाले सरकार नापास झाले - राहुल गांधी

By admin | Updated: April 20, 2015 17:04 IST

केंद्रातील अच्छे दिनवाले सरकार नापास झाले आहे अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी लोकसभेत केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २० - मोदी सरकार हे 'सुटबूट'वाल्यांचे सरकार असून अच्छे दिनवाले सरकार नापास झाले आहे अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी लोकसभेत केली आहे. राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत मोदी सरकारवर निशाणा साधला असून मोदी सरकार हे उद्योजकांचे सरकार आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

सोमवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत भाषण केले. राहुल गांधींच्या भाषणाच्या वेळी काँग्रेसचे सर्व खासदार संसदेत उपस्थित होते. यूपीए सरकारच्या काळात शेतक-यांच्या पिकांना योग्य भाव मिळत होता. पण मोदी सरकारने शेतक-यांच्या पिकांना योग्य भाव दिला नाही असा आरोप त्यांनी केला. दोन्ही सरकारच्या काळातील तफावत मांडण्यासाठी राहुल गांधी यांनी आकडेवारी सादर करत सत्ताधा-यांची पोलखोल केली.  केंद्र सरकार शेतकरी व कामगार वर्गाकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाच्या आकडेवारीसंदर्भात पंतप्रधान व केंद्राच्या अन्य मंत्रालयांमध्ये समन्वयच नाही. म्हणून मोदींनी शेतक-यांमध्ये जाऊन त्यांचे दुःख जाणून घ्यावे असे राहुल गांधींनी म्हटले आहे. 

देशातील ६० टक्के जनता ही शेतीवर अवलंबून आहे. मोदी यांना राजकारणाची चांगली जाण आहे. मग अशा स्थितीत ते ऐवढ्या मोठ्या वर्गाला कसे दुखवू शकतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

नितीन गडकरींचे कौतुक

लोकसभेत भाषणाच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी थेट नितीन गडकरी यांचे कौतुक केले पाहिजे असे सांगत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले होते. नितीन गडकरी यांचे कौतुक केले पाहिजे, जे मनात आहे तेच बोलतात, शेतक-यांनी केंद्र सरकारवर अवलंबून राहू नये असे गडकरींनी म्हटले होते. ते योग्यच होते असा चिमटाही त्यांनी काढला.