शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

पंतप्रधान मोदी हे भारताला मिळालेले 'गॉड्स गिफ्ट' - व्यंकय्या नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2016 09:00 IST

पंतप्रधान मोदी म्हणजे भारताला मिळालेली दैवी देणगी (गिफ्ट) आहे, अशा शब्दांत केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडूंनी मोदींचे कौतुक केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यानंतर केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करत ' मोदी म्हणजे भारताला मिळालेली दैवी देणगी (गिफ्ट) आहे' असे म्हटले आहे. एवढचं नव्हे तर ' मोदी हे गरिबांचे तारणहार आहेत' असेही ते म्हणाले. दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नायडू बोलत होते. 
' आज जगभरात भारताची एक ओळख बनली असून भारतीयांना सन्मान मिळत आहे, त्यामागचे कारण आहेत पंतप्रधान मोदी...! त्यांना प्रत्येक क्षेत्रात अडचणींचा, आव्हानांचा सामना करावा लागला आहे, पण त्यांनी सर्वांशी लढा दिला आणि ते पुढे जात राहिले. मोदी जगभरातील लोकप्रिय नेत्यांपैकी एक असून ते भारताला समृद्ध आणि मजबूत राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहेत' असे नायडू यांनी नमूद केले.
नायडू यांच्या या विधानाबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी नकार दिला. ' मी व्यंकय्याजींचे भाषण ऐकले नाही, त्यामुळे ते काय बोलले हे मला माहीत नाही' असे राजनाथ सिंग यांनी म्हटले. 
दरम्यान यापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोदींचे कौतुक करत त्यांना 'गॉड्स गिफ्ट' म्हटले होते. पंतप्रधान मोदींकडे देशासाठी अनेक चांगल्या योजना असून त्यांची योग्यरितीने अमलबजावणी करण्याची दांडगी इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे. ते जगात जिथे कुठेही जातात, तेथील लोक मोदी, मोदी असा त्यांच्या नावाचा गजर करतात. मोदी म्हणजे देवाने भारताला दिलेली भेट आहे. २०२२ पर्यंत ते भारताला विश्वगुरू बनवतील' असा विश्वासही चौहान यांनी व्यक्त केला होता.