शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

गोदा कोपली!

By admin | Updated: September 27, 2016 01:53 IST

गोदावरीच्या पुराचा धोका असल्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी करीमनगर, वरंगळ आणि खम्मम जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सोमवारी सूचना दिल्या आहेत.

हैदराबाद : गोदावरीच्या पुराचा धोका असल्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी करीमनगर, वरंगळ आणि खम्मम जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सोमवारी सूचना दिल्या आहेत.वरंगळ जिल्ह्यातील रामण्णागुदम आणि खम्मम जिल्ह्यातील भद्राचलम या पूरप्रवण भागांवर बारीक लक्ष ठेवण्यात यावे. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रातील समपदस्थ अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवावा आणि संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यानुसार पावले उचलावीत, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. पूरस्थितीमुळे करीमनगर जिल्ह्यातील १ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. राव यांनी करीमनगर जिल्ह्याला भेट देऊन मध्य मण्यार धरण आणि पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. करीमनगर जिल्ह्यातील बांधकाम सुरू असलेले मध्य मण्यार धरण भरून वाहू लागले असून त्याची पाळू काही ठिकाणी फुटल्यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोदावरी आणि तिच्या उपनद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अदिलाबाद, निजामाबाद, करीमनगर, वारंगल आणि खम्मम जिल्ह्याचे पालकमंत्री, तेथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.गोदावरी नदी कोपल्यामुळे त्यांनी वारंगल जिल्हा प्रशासनाला अतिसतर्क राहण्याची सूचना केली. गोदावरीची पाणीपातळी वाढत असल्यामुळे नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांना सावध केले पाहिजे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. खम्मन जिल्ह्यातील भद्राचलम येथे नदी धोक्याच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. राजधानी हैदराबादने १९०८ नंतर प्रथमच पूरस्थिती अनुभवली. आम्ही वरंगळ आणि खम्मम जिल्ह्यात पाणीपातळीवर लक्ष ठेवून आहोत. नदीकाठावरील गावांत पोलीस ठेवले असून, गरज भासल्यास तातडीने नदीकाठावरील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. (वृत्तसंस्था)कोणत्याही स्थितीसाठी सज्ज राहामुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यात थांबून पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यासह मदत आणि पुनर्वसन कार्याची देखरेख करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सखल भागातील लोकांना वेळीच सुरक्षितस्थळी हलविले जाईल याची काळजी घ्या, असेही त्यांनी मंत्र्यांना सांगितले. ऊर्ध्व मण्यार प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे मध्य मण्यार धरण अडचणीत आले. धरणाची पाळू १३० मीटरपर्यंत फुटली आहे. तथापि, पुराचे आणखीही लोंढे आले तरी धोका नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुसळधार पाऊस आणि पुराच्या दृष्टिकोनातून कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहा आणि माणसे आणि गुरांना वाचविण्यास प्राधान्य द्या, असे आदेश राव यांनी अधिकाऱ्यांना दिले.