शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

गोदा कोपली!

By admin | Updated: September 27, 2016 01:53 IST

गोदावरीच्या पुराचा धोका असल्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी करीमनगर, वरंगळ आणि खम्मम जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सोमवारी सूचना दिल्या आहेत.

हैदराबाद : गोदावरीच्या पुराचा धोका असल्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी करीमनगर, वरंगळ आणि खम्मम जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सोमवारी सूचना दिल्या आहेत.वरंगळ जिल्ह्यातील रामण्णागुदम आणि खम्मम जिल्ह्यातील भद्राचलम या पूरप्रवण भागांवर बारीक लक्ष ठेवण्यात यावे. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रातील समपदस्थ अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवावा आणि संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यानुसार पावले उचलावीत, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. पूरस्थितीमुळे करीमनगर जिल्ह्यातील १ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. राव यांनी करीमनगर जिल्ह्याला भेट देऊन मध्य मण्यार धरण आणि पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. करीमनगर जिल्ह्यातील बांधकाम सुरू असलेले मध्य मण्यार धरण भरून वाहू लागले असून त्याची पाळू काही ठिकाणी फुटल्यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोदावरी आणि तिच्या उपनद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अदिलाबाद, निजामाबाद, करीमनगर, वारंगल आणि खम्मम जिल्ह्याचे पालकमंत्री, तेथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.गोदावरी नदी कोपल्यामुळे त्यांनी वारंगल जिल्हा प्रशासनाला अतिसतर्क राहण्याची सूचना केली. गोदावरीची पाणीपातळी वाढत असल्यामुळे नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांना सावध केले पाहिजे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. खम्मन जिल्ह्यातील भद्राचलम येथे नदी धोक्याच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. राजधानी हैदराबादने १९०८ नंतर प्रथमच पूरस्थिती अनुभवली. आम्ही वरंगळ आणि खम्मम जिल्ह्यात पाणीपातळीवर लक्ष ठेवून आहोत. नदीकाठावरील गावांत पोलीस ठेवले असून, गरज भासल्यास तातडीने नदीकाठावरील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. (वृत्तसंस्था)कोणत्याही स्थितीसाठी सज्ज राहामुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यात थांबून पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यासह मदत आणि पुनर्वसन कार्याची देखरेख करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सखल भागातील लोकांना वेळीच सुरक्षितस्थळी हलविले जाईल याची काळजी घ्या, असेही त्यांनी मंत्र्यांना सांगितले. ऊर्ध्व मण्यार प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे मध्य मण्यार धरण अडचणीत आले. धरणाची पाळू १३० मीटरपर्यंत फुटली आहे. तथापि, पुराचे आणखीही लोंढे आले तरी धोका नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुसळधार पाऊस आणि पुराच्या दृष्टिकोनातून कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहा आणि माणसे आणि गुरांना वाचविण्यास प्राधान्य द्या, असे आदेश राव यांनी अधिकाऱ्यांना दिले.