शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

गोदा कोपली!

By admin | Updated: September 27, 2016 01:53 IST

गोदावरीच्या पुराचा धोका असल्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी करीमनगर, वरंगळ आणि खम्मम जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सोमवारी सूचना दिल्या आहेत.

हैदराबाद : गोदावरीच्या पुराचा धोका असल्यामुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी करीमनगर, वरंगळ आणि खम्मम जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सोमवारी सूचना दिल्या आहेत.वरंगळ जिल्ह्यातील रामण्णागुदम आणि खम्मम जिल्ह्यातील भद्राचलम या पूरप्रवण भागांवर बारीक लक्ष ठेवण्यात यावे. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रातील समपदस्थ अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवावा आणि संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यानुसार पावले उचलावीत, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. पूरस्थितीमुळे करीमनगर जिल्ह्यातील १ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. राव यांनी करीमनगर जिल्ह्याला भेट देऊन मध्य मण्यार धरण आणि पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. करीमनगर जिल्ह्यातील बांधकाम सुरू असलेले मध्य मण्यार धरण भरून वाहू लागले असून त्याची पाळू काही ठिकाणी फुटल्यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोदावरी आणि तिच्या उपनद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अदिलाबाद, निजामाबाद, करीमनगर, वारंगल आणि खम्मम जिल्ह्याचे पालकमंत्री, तेथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.गोदावरी नदी कोपल्यामुळे त्यांनी वारंगल जिल्हा प्रशासनाला अतिसतर्क राहण्याची सूचना केली. गोदावरीची पाणीपातळी वाढत असल्यामुळे नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांना सावध केले पाहिजे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. खम्मन जिल्ह्यातील भद्राचलम येथे नदी धोक्याच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. राजधानी हैदराबादने १९०८ नंतर प्रथमच पूरस्थिती अनुभवली. आम्ही वरंगळ आणि खम्मम जिल्ह्यात पाणीपातळीवर लक्ष ठेवून आहोत. नदीकाठावरील गावांत पोलीस ठेवले असून, गरज भासल्यास तातडीने नदीकाठावरील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. (वृत्तसंस्था)कोणत्याही स्थितीसाठी सज्ज राहामुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यात थांबून पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यासह मदत आणि पुनर्वसन कार्याची देखरेख करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सखल भागातील लोकांना वेळीच सुरक्षितस्थळी हलविले जाईल याची काळजी घ्या, असेही त्यांनी मंत्र्यांना सांगितले. ऊर्ध्व मण्यार प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे मध्य मण्यार धरण अडचणीत आले. धरणाची पाळू १३० मीटरपर्यंत फुटली आहे. तथापि, पुराचे आणखीही लोंढे आले तरी धोका नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुसळधार पाऊस आणि पुराच्या दृष्टिकोनातून कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहा आणि माणसे आणि गुरांना वाचविण्यास प्राधान्य द्या, असे आदेश राव यांनी अधिकाऱ्यांना दिले.