शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

गोव्यात नाताळलाही पर्यटकांची पाठ नोटाबंदीचा फटका; हॉटेलांमधील २५ टक्के खोल्या रिकाम्याच

By admin | Updated: December 23, 2016 19:57 IST

पणजी : गोव्यातील पर्यटनाला नोटाबंदीचा जबर फटका बसला असून नाताळसाठी एरव्ही पर्यटकांची गर्दी दिसते तशी या वेळी ती दिसत नसल्याने हॉटेल व्यावसायिकही हतबल झाले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी राज्याच्या किनारी भागात होणार्‍या पार्ट्यांवरही यंदा याचा परिणाम दिसणार आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार्‍या पार्ट्यांना थंडा प्रतिसाद दिसत आहे.

पणजी : गोव्यातील पर्यटनाला नोटाबंदीचा जबर फटका बसला असून नाताळसाठी एरव्ही पर्यटकांची गर्दी दिसते तशी या वेळी ती दिसत नसल्याने हॉटेल व्यावसायिकही हतबल झाले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी राज्याच्या किनारी भागात होणार्‍या पार्ट्यांवरही यंदा याचा परिणाम दिसणार आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार्‍या पार्ट्यांना थंडा प्रतिसाद दिसत आहे.
हॉटेलांमधील सरासरी २५ टक्के खोल्या रिकाम्या आहेत. किनारे, धार्मिक स्थळे तसेच पर्यटनस्थळांबरोबरच कॅसिनो आणि बाजारपेठांमध्येही पर्यटकांचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. विदेशी पर्यटकांना चलन बदलून घेण्याच्या बाबतीत मोठी समस्या निर्माण झाली आहे. मनी एक्स्चेंज आस्थापनांमध्ये डॉलर्स, पौंड किंवा अन्य विदेशी चलनाच्या बदल्यात भारतीय नोटा देण्यासाठी उपलब्ध नाहीत. विदेशी पाहुण्यांना आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डांवरच व्यवहार करावे लागत आहेत.
हॉटेल व्यावसायिक नंदन कुडचडकर यांच्याशी संपर्क साधला असता गोव्याच्या पर्यटनावर याचा मोठा परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितले. विदेशी पर्यटकांना तर सुरुवातीच्या काळात आठवड्याला केवळ १00 डॉलर्स भारतीय चलनात बदलून दिले जात असत. ५ हजार रुपयांमध्ये आठवडा कसा घालवायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अनेक विदेशी पर्यटकांनी त्यामुळे दौरे आटोपते घेऊन मायदेशी परतणे पसंत केले. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड स्वाइप करण्याची मशिन्स अजूनही अनेक आस्थापनांकडे उपलब्ध नाहीत तेथे पर्यटकांना रोखीनेच व्यवहार करावे लागतात.
टूर ॲण्ड ट्रॅव्हल असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी)चे माजी अध्यक्ष तथा गोव्यातील आघाडीचे हॉटेल व्यावसायिक राल्फ डिसोझा म्हणाले की, नोटाबंदीमुळे पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली असून १0 ते १५ टक्के खोल्या रिकाम्याच आहेत. एरव्ही या दिवसांत खोल्या फुल्ल असायच्या. यात भर म्हणून सनबर्न व सुपरसोनिक या मोठ्या पार्ट्या यंदा गोव्यात होणार नसल्याने त्याचाही परिणाम पर्यटनावर झालेला आहे. तीन तारांकित, चार तारांकित, पंचतारांकित हॉटेलांमध्ये लोक क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डांचा वापर करतात; परंतु एक किंवा दोन तारांकित हॉटेलांमध्ये अडचण येते. किनार्‍यांवरील शॅक, रेस्टॉरंटवाल्यांचा व्यवसायही मंदावला आहे. विदेशी पर्यटकांना सहलीचे निम्मे दिवस डॉलर्स किंवा अन्य चलन बदलण्यातच घालवावे लागतात. अनेकदा मनी एक्स्चेंज आस्थापनांमध्ये डॉलरसाठी कमी दर देऊन त्यांची बोळवण केली जाते.
गोव्यात एरव्ही नाताळच्या आठवडाभर अगोदर देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी उसळत असे आणि त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रकारही घडत असत; परंतु यंदा तशी गर्दी दिसत नाही. मिरामार, कळंगुट, वागातोर, हणजूण, मोरजी, मांद्रे, हरमल आदी उत्तर गोव्यातील किनार्‍यांवर तसेच कोलवा, बाणावली, बेताळभाटी आदी दक्षिणेतील किनार्‍यांवर पर्यटकांची संख्या तुलनेत कमीच दिसून येत आहे.
कॅसिनोंमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. गिर्‍हाईक नसल्याने काही कॅसिनोवाल्यांनी प्रवेश शुल्कही न भरण्याची मुभा दिलेली आहे. व्यवसायावर मोठा परिणाम झाला असल्याचे एका कॅसिनोमालकाने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. (प्रतिनिधी)
...........................................................