शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
5
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
6
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
7
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
8
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
9
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
10
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
11
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
12
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
13
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
14
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
16
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
17
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
18
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
19
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
20
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'

मला गोळ्या घाला, पण दलितांचे रक्षण करा!

By admin | Updated: August 8, 2016 09:14 IST

कोणाला हल्ला करायचा असेल तर तो दलितांवर नव्हे तर माझ्यावर करावा. कोणाला गोळ्या घालायच्या असतील तर त्या माझ्यावर घालाव्यात.

हैदराबाद/ नवी दिल्ली: कोणाला हल्ला करायचा असेल तर तो दलितांवर नव्हे तर माझ्यावर करावा. कोणाला गोळ््या घालायच्या असतील तर त्या माझ्यावर घालाव्यात. पण गोरक्षणाच्या नावाने दलितांवर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत थांबायलाच हवेत, असा

सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिला. गोरक्षणाच्या नावाने दलितांवर अत्याचार करणारे वास्तवात गोरखधंद्यांची दुकानदारी करणारे समाजकंटक आहेत, असे म्हणून पंतप्रधानांनी शनिवारी टाऊनहॉलच्या कार्यक्रमात व्यक्त केलेला संताप ‘बेगडी’ असून त्यांना दलितांची आणि गायींची काळजी नसून हातातून जाणाऱ्या गुजरातची चिंता आहे, अशी टीका विरोधकांनी केल्यावर पंतप्रधान मोदी रविवारी त्याहूनही धारधार भाषेत हल्ला चढविला.

तेलंगणच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या मोदींनी सकाळी व दुपारी झालेल्या सरकारी कार्यक्रमांमध्ये व सायंकाळी हैदराबादमध्ये झालेल्या भाजपाच्या बैठकीत पुन्हा पुन्हा या विषयांचा उल्लेख केला आणि गायींबरोबर दलितांचे आणि वंचितांचे रक्षण करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचे निक्षुन सांगितले. दुपारी तेलंगण सरकारच्या एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारत हा विविधतेने नटेलला देश आहे.

देशाची एकता व अखंडता जपणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येकाने गोरक्षा व गोसेवा करावी, कारण गाय ही देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. पण त्याच बरोबर काही बनावट गोरक्षक देशात फूट पाडू पाहात आहेत. त्यांच्यापासून सावध राहून अशा लोकांना कडक शासन केले जायला हवे. असे झाले तरच भारत महान उंची गाठू शकेल.‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्वज्ञानाला अभिमानानेने आपले म्हणणाऱ्या आपण भारतीयांनी दलित बांधवांना सन्मानाने वागविले नाही तर जग आपल्याला माफ करणार नाही.- नरेंद्र मोदी, (पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत)गुजरातमध्ये बुडत असलेल्या भाजपाला सावरण्याचा मोदींचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधानांच्या संतापाचा राजकीय रोख समजण्यासारखा आहे. त्यांनी एक मुख्यमंत्री गमावला आहे व कदाचित ते एक राज्य गमावण्याच्या मार्गावर आहेत. पण आमची चिंता याहून मोठी आहे.-टॉम वडक्कन, प्रवक्ते, काँग्रेसपंतप्रधानांचा संताप बेगडी आहे कारण तो दलित मतांवर डोळा ठेवून व्यक्त केलेला आहे. त्यांना खरंच काळजी होती तर या समाजकंटकांवर याआधीच का कारवाई केली गेली नाही. कारवाई न करता केवळ संताप व्यक्त करणे म्हणजे या दुष्कृत्यांना पाठिंबा देणेच आहे.-वृंदा करात, नेत्या, माकपगोरक्षक नावाचा नवीनच प्रकार हल्ली पुढे आला आहे. त्यांना इतके दिवस कोणाचा आशिर्वाद होता? मोदी यापूर्वीच बोलले असते तर बरे झाले असते. परंतु आता मोदी बोलले तरी या गोरक्षकांवर काही परिणाम होईल, असे वाटत नाही.-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस