शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

भूसंपादनासाठी ३ महिन्यात साडेचार हजार कोटी देणार गिरीश महाजन : मार्च २०१७ पर्यंत २७ प्रकल्प पूर्ण करणार

By admin | Updated: November 2, 2016 00:43 IST

जळगाव : राज्यातील सिंचन योजनांच्या भूसंपादनाचे कोट्यवधी रूपये अनेक वर्षात दिले गेलेले नाहीत. येत्या तीन महिन्यात यासाठी साडेचार हजार कोटींचा एकरकमी निधी उपलब्ध करून देऊन हा प्रश्न संपुष्टात आणला जाणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव : राज्यातील सिंचन योजनांच्या भूसंपादनाचे कोट्यवधी रूपये अनेक वर्षात दिले गेलेले नाहीत. येत्या तीन महिन्यात यासाठी साडेचार हजार कोटींचा एकरकमी निधी उपलब्ध करून देऊन हा प्रश्न संपुष्टात आणला जाणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राज्यसरकारला दोन वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

शेळगाव बॅरेज दोन वर्षात पूर्ण करणार
महाजन म्हणाले, येत्या काळात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सिंचाई योजनेतून साडेसहा हजार कोटींचा निधी मिळणार आहे. वाघूर प्रकल्पासाठी साडेसहाशे कोटी दिले आहेत. शेळगाव बॅरेजला टप्प्याने साडेचारशे ते पाचशे कोटी देऊन दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे.
----
दीड लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार
मागील सरकारने ४० ते ४५ हजार कोटींच्या कामांना केवळ मंजूरी दिली. त्यामुळे आता निर्णय घेताना अनेक अडचणी येत गेल्या. त्यातून आता मार्ग काढण्यात येत आहे. ७० ते ९० टक्के कामे पूर्ण झालेल्या प्रकल्पांना प्राधान्याने निधी देण्यात येत आहे. राज्यात जवळपास २७ प्रकल्प येत्या मार्च १७ पर्यंत पूर्ण होऊन दीड लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.

१५ हजार कोटींचे कर्जरोखे
सिंचन प्रकल्पांना निधी मिळावा यासाठी १५ हजार कोटी कर्ज रोख्यांच्या माध्यमातून उभारले जातील. शेतकरी आत्महत्या ज्या क्षेत्रात जास्त झाल्या, दुष्काळी स्थितीचे क्षेत्र निि›त करून तेथील योजनांना ११ हजार कोटींचा निधी मिळावा म्हणून केंद्र सरकारला योजना दिली आहे. लवकरच यासाठी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांची भेट घेऊन त्यास मंजूरी मिळविली जाईल. विविध मार्गाने ६५ ते ६८ हजार कोटींचा निधी येत्या तीन वर्षात सिंचन योजनांना उपलब्ध करून दिला जाईल, असे महाजन म्हणाले.

भूसंपादनासाठी साडेचार हजार कोटी
रोखे तसेच अन्य मार्गातून येत्या तीन महिन्यात उपलब्ध होणार्‍या निधीतून भूसंपदानाचा प्रश्न मिटविला जाणार आहे. यासाठी साडेचार हजार कोटींचा निधी एकरकमी दिले जातील असेही गिरीश महाजन यांंनी सांगितले.
-------