शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
2
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
3
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
4
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
5
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
6
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
7
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
8
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
9
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
10
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
11
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
12
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
13
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
14
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
15
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
16
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
17
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
18
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
19
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
20
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  

गुलाम अलींचा भारताला कायमचा अलविदा

By admin | Updated: November 4, 2015 14:11 IST

ज्येष्ठ गझलगायक गुलाम अली खान यांनी भारताला कायमचा अलविदा केला असून भारतात पुन्हा पाऊल टाकणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ४ - केवळ पाकिस्तानी नागरिक असल्याच्या कारणावरून सतत विरोध सहन करावा लागणारे ज्येष्ठ गझलगायक गुलाम अली खान यांनी भारताला कायमचा अलविदा केला असून भारतात पुन्हा पाऊल टाकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. ' भारतातील राजकीय पक्षांनी त्यांच्या फायद्यासाठी माझा वापर करून घेतल्याने मी दुखावलो आहे. मी भारतातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून यापुढे भारतात कधीच येणार नाही' असे त्यांनी म्हटले आहे. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत गुलाम अली यांनी दिल्लीतील कार्यक्रम रद्द केला होता, मात्र शिवसेनेच्या विरोधामुळेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात होते. 
गेल्या महिन्यात मुंबई व पुणे येथे गुलाम अली खान यांचा कार्यक्रम होणार होता, मात्र शिवसेनेने त्यांच्य कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवत तो उधळवून लावण्याचा इशारा दिल्यानंतर दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. महाराष्ट्र सरकार गुलाम अली यांच्या कार्यक्रमासाठी संरक्षण देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप ठेवत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुलाम अली खान यांना दिल्ली कार्यक्रमाचे आमंत्रण दिले. गुलाम अली यांनी होकार देताच ८ नोव्हेंबर रोजी त्यांची मैफिल आयोजित करण्याचे निश्चित झाले आणि त्याची तयारीही जवळपास पूर्ण झाली होती. पण गुलाम अली खान यांनी प्रकृतीचे कारण देत कार्यक्रम करण्यास अचानक नकार दिल्याने हा कार्यक्रम बारगळला.
मात्र आता गुलाम अली यांनी भविष्यात भारतात कोणताही कार्यक्रम करणार नसल्याचे जाहीर केल्याने शिवसेनेच्या सततच्या विरोधामुळे आणि देशातील गढूळ वातावरणामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.