शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 07:15 IST

विधि क्षेत्रातलं करिअर की पंतप्रधानांबरोबर काम करायचं असा पेच निर्माण झाला, त्यामध्ये मी चांगलाच अडकलो. इतकी चांगली संधी देणा-या व्यक्तीला निर्णय कळवणं आजिबात सोपं नव्हतं.

- सलमान खुर्शिद(माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री)विधि क्षेत्रातलं करिअर की पंतप्रधानांबरोबर काम करायचं असा पेच निर्माण झाला, त्यामध्ये मी चांगलाच अडकलो. इतकी चांगली संधी देणा-या व्यक्तीला निर्णय कळवणं आजिबात सोपं नव्हतं. अनेक तास बसून मी लहानसं निवेदन तयार केलं आणि पंतप्रधानांची वेळ मागितली. प्रत्यक्ष भेटीत त्यांना मी नक्की काय सांगितलं हे आता आठवत नाही पण तेव्हाही त्या एकदम विवेकी आणि समजूतदारपणे ऐकणाºया व्यक्ती होत्या हे लक्षात आहे. मी इतक्या मोठ्या काळानंतर निर्णय घेतल्याचं त्यांना आश्चर्य वाटलं होतं हे मला नंतर अर्जुन सेनगुप्तांनी सांगितलं. 'या तरुण पोरांना बंधनात ठेवता येऊ शकत नाही' असं इंदिराजी त्यांना म्हणाल्या होत्या.१९६०आणि ७० च्या दशकातील नेहरूवादी राजकारणाच्या मूल्यांनी माझ्या पिढीतल्या सर्वांच्या आयुष्याला स्पर्श केला होता. पहिले पंतप्रधान पं. नेहरू व इंदिरा गांधी यांचं असणं सहज होतं. माझे आजोबा डॉ. झाकिर हुसेन बिहारचे राज्यपाल असताना पाटण्यातील राजभवनामध्येत्यांना भेटण्यासाठी नेहरूंबरोबर इंदिराजीही आल्या होत्या. त्या वेळेस मी त्यांना पाहिलं. नेहरू मुलांचे आकर्षण होते. माझे आजोबा साठच्या दशकात उपराष्ट्रपती होऊन दिल्लीमध्ये आले. तेव्हा आम्ही त्यांच्या बंगल्यात जात असू, पं. नेहरू गंभीर आजारी होते ती सकाळ मला आठवते. दुपारी आजोबा जेवणासाठी घरी आले तेव्हा त्यांना मी माझ्या आईशी बोलताना ऐकलं. पं. नेहरूंना वाचवण्यासाठी अशक्य वाटणारे आॅपरेशन करावे का, असं डॉक्टरांनी विचारलं होतं. सर्वांच्या जवळ असणारी व्यक्ती अशी दूर जाणं दु:खदायक होतं. सर्व दु:खं पचवणाºया माझ्या आजोबांनाही त्या वेळेस मोडून पडलेलं मी पाहिलं.वडिलांनंतर त्यांची जागा इंदिराजींनी घ्यावी अशी अनेकांची इच्छा होती. पण त्या लगेचच पंतप्रधान झाल्या नाहीत. मात्र ताश्कंदमध्ये लालबहादूर शास्त्रींचे निधन झाल्यानंतर त्या पंतप्रधान झाल्या. माझ्या आजोबांना भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी त्यांनी पंतप्रधानपद पणाला लावलं आणि त्यानंतर या मोठ्या निर्णयात त्यांना मिळालेल्या यशामुळे भारतीय राजकारणाची दिशाच बदलून गेली.मी सेंट स्टीफन्स कॉलेजात शिकत असताना महात्मा गांधींचे निकटवर्तीय बीबी अ‍ॅमतस सलाम यांनी १९७१ च्या निवडणुकीमध्ये प्रचाराची विनंती केली. कॉलेज संपलं की मी व माझे दोन मित्र गाडी घेऊन त्यांच्या प्रचारासाठी जात असू. दहा दिवसांनंतर आम्हाला इंदिराजी व त्यांच्या कुटुंबीयांबरोबर जेवणाची संधी मिळाली.आॅक्सफर्डच्या ट्रिनिटी कॉलेजात अध्यापन करताना मला इंदिराजींचा ओएसडी म्हणून काम करण्याची संधी आली. आॅक्सफर्डमध्ये डॉ. अर्जुन सेनगुप्ता मला चायनिज जेवायला घेऊन जात व भारताबद्दल गप्पा मारत असत. ते पंतप्रधान कार्यालयामध्ये डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांना आर्थिक विषयांवर मदतीसाठी गेले.त्यानंतर काहीच काळाने मला पंतप्रधान कार्यालयातून संधी देऊ करणारा फोन आला. ही आॅफर मी नाकारू शकत नव्हतोच. मी साऊथ ब्लॉकमध्ये काम सुरू केल्यानंतर परराष्ट्र व्यवहार सांभाळणारे राणा आणि पंतप्रधानांच्या सामाजिक विषयांच्या सचिव उषा भगत यांच्या जवळ राहून काम करता आलं. न्यायाधीशांच्या नेमणुकांबाबत फाइल्सकडे लक्ष देणे व पंतप्रधानांच्या आंतरराष्ट्रीय भाषणांचे लेखन हे माझे काम होते. गरज पडल्यावर वायूसेनेच्या पंतप्रधानांसाठी असणाºया विमानातून प्रवासही करावा लागे. पंतप्रधानांच्या महत्त्वाच्या बैठका असल्या की त्याचे टिपण काढणे व नोंद ठेवणे हेही काम असे. सनदी नोकरशाहीचं प्रशिक्षण नसल्यामुळे आणि थेट विद्यापीठातून आल्यामुळे यातील बहुतांश गोष्टी मलाच शिकाव्या लागल्या होत्या. मात्र त्या शिकण्याची व इंदिराजींबरोबर काम करण्याची संधी मिळाली, हे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे होते.

(शब्दांकन - ओंकार करंबेळकर)

टॅग्स :Indira Gandhi Birth Centenary Yearइंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष