शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 07:15 IST

विधि क्षेत्रातलं करिअर की पंतप्रधानांबरोबर काम करायचं असा पेच निर्माण झाला, त्यामध्ये मी चांगलाच अडकलो. इतकी चांगली संधी देणा-या व्यक्तीला निर्णय कळवणं आजिबात सोपं नव्हतं.

- सलमान खुर्शिद(माजी केंद्रीय परराष्ट्र मंत्री)विधि क्षेत्रातलं करिअर की पंतप्रधानांबरोबर काम करायचं असा पेच निर्माण झाला, त्यामध्ये मी चांगलाच अडकलो. इतकी चांगली संधी देणा-या व्यक्तीला निर्णय कळवणं आजिबात सोपं नव्हतं. अनेक तास बसून मी लहानसं निवेदन तयार केलं आणि पंतप्रधानांची वेळ मागितली. प्रत्यक्ष भेटीत त्यांना मी नक्की काय सांगितलं हे आता आठवत नाही पण तेव्हाही त्या एकदम विवेकी आणि समजूतदारपणे ऐकणाºया व्यक्ती होत्या हे लक्षात आहे. मी इतक्या मोठ्या काळानंतर निर्णय घेतल्याचं त्यांना आश्चर्य वाटलं होतं हे मला नंतर अर्जुन सेनगुप्तांनी सांगितलं. 'या तरुण पोरांना बंधनात ठेवता येऊ शकत नाही' असं इंदिराजी त्यांना म्हणाल्या होत्या.१९६०आणि ७० च्या दशकातील नेहरूवादी राजकारणाच्या मूल्यांनी माझ्या पिढीतल्या सर्वांच्या आयुष्याला स्पर्श केला होता. पहिले पंतप्रधान पं. नेहरू व इंदिरा गांधी यांचं असणं सहज होतं. माझे आजोबा डॉ. झाकिर हुसेन बिहारचे राज्यपाल असताना पाटण्यातील राजभवनामध्येत्यांना भेटण्यासाठी नेहरूंबरोबर इंदिराजीही आल्या होत्या. त्या वेळेस मी त्यांना पाहिलं. नेहरू मुलांचे आकर्षण होते. माझे आजोबा साठच्या दशकात उपराष्ट्रपती होऊन दिल्लीमध्ये आले. तेव्हा आम्ही त्यांच्या बंगल्यात जात असू, पं. नेहरू गंभीर आजारी होते ती सकाळ मला आठवते. दुपारी आजोबा जेवणासाठी घरी आले तेव्हा त्यांना मी माझ्या आईशी बोलताना ऐकलं. पं. नेहरूंना वाचवण्यासाठी अशक्य वाटणारे आॅपरेशन करावे का, असं डॉक्टरांनी विचारलं होतं. सर्वांच्या जवळ असणारी व्यक्ती अशी दूर जाणं दु:खदायक होतं. सर्व दु:खं पचवणाºया माझ्या आजोबांनाही त्या वेळेस मोडून पडलेलं मी पाहिलं.वडिलांनंतर त्यांची जागा इंदिराजींनी घ्यावी अशी अनेकांची इच्छा होती. पण त्या लगेचच पंतप्रधान झाल्या नाहीत. मात्र ताश्कंदमध्ये लालबहादूर शास्त्रींचे निधन झाल्यानंतर त्या पंतप्रधान झाल्या. माझ्या आजोबांना भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी त्यांनी पंतप्रधानपद पणाला लावलं आणि त्यानंतर या मोठ्या निर्णयात त्यांना मिळालेल्या यशामुळे भारतीय राजकारणाची दिशाच बदलून गेली.मी सेंट स्टीफन्स कॉलेजात शिकत असताना महात्मा गांधींचे निकटवर्तीय बीबी अ‍ॅमतस सलाम यांनी १९७१ च्या निवडणुकीमध्ये प्रचाराची विनंती केली. कॉलेज संपलं की मी व माझे दोन मित्र गाडी घेऊन त्यांच्या प्रचारासाठी जात असू. दहा दिवसांनंतर आम्हाला इंदिराजी व त्यांच्या कुटुंबीयांबरोबर जेवणाची संधी मिळाली.आॅक्सफर्डच्या ट्रिनिटी कॉलेजात अध्यापन करताना मला इंदिराजींचा ओएसडी म्हणून काम करण्याची संधी आली. आॅक्सफर्डमध्ये डॉ. अर्जुन सेनगुप्ता मला चायनिज जेवायला घेऊन जात व भारताबद्दल गप्पा मारत असत. ते पंतप्रधान कार्यालयामध्ये डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांना आर्थिक विषयांवर मदतीसाठी गेले.त्यानंतर काहीच काळाने मला पंतप्रधान कार्यालयातून संधी देऊ करणारा फोन आला. ही आॅफर मी नाकारू शकत नव्हतोच. मी साऊथ ब्लॉकमध्ये काम सुरू केल्यानंतर परराष्ट्र व्यवहार सांभाळणारे राणा आणि पंतप्रधानांच्या सामाजिक विषयांच्या सचिव उषा भगत यांच्या जवळ राहून काम करता आलं. न्यायाधीशांच्या नेमणुकांबाबत फाइल्सकडे लक्ष देणे व पंतप्रधानांच्या आंतरराष्ट्रीय भाषणांचे लेखन हे माझे काम होते. गरज पडल्यावर वायूसेनेच्या पंतप्रधानांसाठी असणाºया विमानातून प्रवासही करावा लागे. पंतप्रधानांच्या महत्त्वाच्या बैठका असल्या की त्याचे टिपण काढणे व नोंद ठेवणे हेही काम असे. सनदी नोकरशाहीचं प्रशिक्षण नसल्यामुळे आणि थेट विद्यापीठातून आल्यामुळे यातील बहुतांश गोष्टी मलाच शिकाव्या लागल्या होत्या. मात्र त्या शिकण्याची व इंदिराजींबरोबर काम करण्याची संधी मिळाली, हे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे होते.

(शब्दांकन - ओंकार करंबेळकर)

टॅग्स :Indira Gandhi Birth Centenary Yearइंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष