शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

नाशकातही टोळीयुद्ध

By admin | Updated: May 11, 2014 00:35 IST

नाशिक : डी गँग, गवळी गँग, छोटा राजन गँग, नाईक गँग, पुजारी गँग अशा गुन्हेगारी टोळ्यांच्या आपसातील गँगवारच्या बातम्या कानावर येत असत़ मुंबईतील या टोळीयुद्धाची जागा आता नाशिक शहराने घेतली की काय, अशी शंका आता नागरिकांच्या मनात उत्पन्न झाली आहे़ गेल्या वर्षभरात घडलेल्या आणि या वर्षातील गुन्हेगारी टोळक्यांच्या घडामोडींचा आढावा घेतल्यास यावर शिक्कामोर्बत होते़ शुक्रवारी घडलेल्या भीम पगारे हत्त्येमुळे तर नाशिकमधील टोळीयुद्ध चांगलेच चर्चेत आले आहे़

नाशिक : डी गँग, गवळी गँग, छोटा राजन गँग, नाईक गँग, पुजारी गँग अशा गुन्हेगारी टोळ्यांच्या आपसातील गँगवारच्या बातम्या कानावर येत असत़ मुंबईतील या टोळीयुद्धाची जागा आता नाशिक शहराने घेतली की काय, अशी शंका आता नागरिकांच्या मनात उत्पन्न झाली आहे़ गेल्या वर्षभरात घडलेल्या आणि या वर्षातील गुन्हेगारी टोळक्यांच्या घडामोडींचा आढावा घेतल्यास यावर शिक्कामोर्बत होते़ शुक्रवारी घडलेल्या भीम पगारे हत्त्येमुळे तर नाशिकमधील टोळीयुद्ध चांगलेच चर्चेत आले आहे़
७ मे २०१३ रोजी सराईत गुन्हेगार मोहन चांगले आणि दीपक सोनवणे या दोघांची हत्त्या झाली अन् नाशिकच्या टोळीयुद्धाला सुरुवात झाली, अशी चर्चा खुद्द पोलीस वर्तुळातून ऐकावयास मिळते़ पोलिसांची वक्रदृष्टी असेपर्यंत ही गुन्हेगार मंडळी सुप्तावस्थेत असतात, मात्र थोड्याच दिवसात दुर्लक्ष झाले की पुन्हा डोके वर काढतात़
गेल्या वर्षभरातील नाशिक शहरातील टोळीयुद्धाचा विचार करावयाचा झाल्यास सिडकोतील टिप्पर गँग, चांगले गँग, मल्हारखाणीतील पगारे गँग या प्रामुख्याने चर्चेत आल्या़याबरोबरच चौकाचौकांतील भाईिगरीनेही डोके वर काढले़ या भाईिगरीला अंकुश बसावा यासाठी स्थानबद्धता, तडीपारीची कारवाईदेखील पुरेशी ठरत नसल्याचे दिसून येते़ मुळात हे गुन्हेगार शहर सोडून जातच नसल्याचे पोलिसांनी पकडलेल्या तडीपारांच्या आकडेवारीवरून दिसून येते़
शहरात केवळ तडीपारच गुन्हेगारी कृत्य करतात असे नव्हे तर नाशिकरोडच्या मध्यवर्ती तुरुंगातून पॅरोलवर सुटून आलेल्यांकडून शहरात खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ खुनाच्या गुन्‘ात जामीन मिळालेल्या पंचवटीतील चौघा अ˜ल गुन्हेगारांनी सुनील कोल्हे यांचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते़ या गुन्हेगारांवर अंकुश लावण्यास पोलीस कमी पडत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे़
नाशिकच्या या टोळ्यांमधील सराईत गुन्हेगार इतके निर्ढावले आहेत की, पोलीस अधिकार्‍यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे़ १५ मार्च २०१३ रोजी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम़ एम़ गावित यांना टिप्पर गँगचा म्होरक्या समीर नासीर पठाण याने मारहाण केली़ या घटनेची पुनरावृत्ती ७ मे रोजी पुन्हा झाली़ सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत यांना मारहाण झाली़ यापूर्वी जिल्हा रुग्णालयाच्या प्रिझन वॉर्डमध्ये उपचारासाठी आलेला चांगले खून प्रकरणातील संशयित गिरीश शे˜ी याच्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या चौघांनी तेथे ड्यूटीवर असलेल्या दोन पोलिसांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला़
नाशिक शहरातील या सर्व घटनांकडे पाहता गेल्या वर्षभरातील सुप्तावस्थेत असलेल्या टोळीयुद्धाचा मध्येमध्ये भडका उडत असल्याचेच दिसून येते़ याकरिता पोलीस आयुक्त आणि त्यांच्या टीमने कोम्बिंग, ऑलआउट, नाकाबंदी हे पुन्हा सुरू करावे मात्र याचा त्रास जनसामान्यांना होणार नाही याबाबत पोलिसांनी दक्ष रहावे.(प्रतिनिधी)

--इन्फ ो--
२०१३ मध्ये गुन्हेगार व टोळक्यांकडून १४ खून
२०१३ या वर्षात घडलेल्या ३४ खुनांच्या घटनांपैकी सराईत गुन्हेगार व टोळक्यांच्या हाणामारीत एकूण १४ खून झाले आहेत़ त्यातील सर्वाधिक खून हे मे व ऑक्टोबर महिन्यात झाले़ शहरात खर्‍या अर्थाने टोळीयुद्धाला सुरुवात झाली ती सराईत गुन्हेगार मोहन चांगले, दीपक सोनवणे यांच्या खुनापासूऩ यानंतर श्रीपाद सूर्यवंशी, अशोक साळवे, विशाल चौधरी(मध्यवर्ती कारागृह), विक्रम परदेशी, संतोष धनगर, दत्ता ऊर्फ विकी प्रकाश वाघ, विपीन बाफ णा, गणेश धोत्रे, जुनेद शहा, सुनील इंगळे, सुनील कोल्हे, अब्दुल खान, ॲड़ मेधा जगताप यांचा समावेश आहे़


--इन्फ ो--
2014 मध्ये अबतक 10
विजय