शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
5
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
6
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
7
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
8
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
9
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
10
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
11
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
12
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
13
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
14
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
15
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
16
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
17
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
18
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
19
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
20
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

इसिसमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या चार भारतीय युवकांना सीरियात अटक

By admin | Updated: January 15, 2016 02:02 IST

इस्लामिक स्टेटच्या (इसिस) बाजूने लढण्याच्या उद्देशाने निघालेल्या चार भारतीय युवकांना सिरियात अटक करण्यात आली आहे. भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले सिरियाचे

नवी दिल्ली : इस्लामिक स्टेटच्या (इसिस) बाजूने लढण्याच्या उद्देशाने निघालेल्या चार भारतीय युवकांना सिरियात अटक करण्यात आली आहे. भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले सिरियाचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री वालिद अल मौअलेम यांनी बुधवारी ही माहिती दिली. हे चारही भारतीय युवक जॉर्डनमार्गे सिरियात घुसले होते आणि इसिसमध्ये सामील होण्याआधीच त्यांना अटक करण्यात आली, असे मौअलेम यांनी सांगितले.इसिसमध्ये सामील होण्याच्या हेतूने सिरियात आलेल्या या चारही भारतीयांना सध्या दमास्कसच्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. सिरियात येऊन या युवकांना भेटा आणि त्यांना भारतात परत आणा, असे आम्ही भारतीय अधिकाऱ्यांना सांगितले आहे. दहशतवादविरोधी आघाडीवर सहकार्य आणि गुप्तचर माहितीचे आदानप्रदान या दोन मुख्य हेतूंसाठी आपला हा भारत दौरा आहे,’ असे मौअलेम म्हणाले.किमान २३ भारतीय, ज्यांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे, इसिसमध्ये सामील झाल्याचा संशय आहे. सिरियात या चार युवकांना अटक झाल्यामुळे आता ही संख्या २७ वर पोहोचली. मौअलेम म्हणाले, ‘इराकमध्ये ३९ भारतीय इसिसच्या ताब्यात असल्याचा संशय आहे. या भारतीयांच्या सुटकेसाठी सिरिया तूर्तास तरी मदत करण्याच्या स्थितीत नाही. मला क्षमा करा. आम्ही काहीही करू शकत नाही. तुम्हाला इर्दोगान (तुर्की अध्यक्ष) यांना सांगावे लागेल.’मौअलेम यांनी सिरियातील संकटासाठी तुर्की, सौदी अरेबिया आणि कतार या देशांना जबाबदार धरले. हे देश दहशतवादी गटांना पाठिंबा देत आहेत, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला. इसिसविरुद्ध लढण्यासाठी सिरियाला लष्करी मदत केल्याबद्दल त्यांनी रशियाचे आभारही मानले. रशियाच्या लष्करी मदतीमुळेच आम्ही इसिसच्या ताब्यातील २० ठिकाणे मुक्त करू शकलो. ही मदत अशी सुरू राहिली तर त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच पाहायला मिळतील. अमेरिकेने जे १८ महिन्यांत मिळविले ते रशियाने अवघ्या तीन महिन्यांत मिळविले, असे मौअलेम म्हणाले.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासोबत झालेली चर्चा उपयुक्त ठरली. सिरियातील संकट हा आमच्या चर्चेचा विषय होता. दहशतवाद हा कुणा एका देशाचा नसतो, असे माझे मत आहे. जगात जे काही घडते आहे, त्याचा सिरियावरही परिणाम होत आहे, असे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)