शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

पम्पोरमधील दशतवाद्यांबरोबरची चकमक संपली. तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

By admin | Updated: February 22, 2016 19:36 IST

पम्पोर भागामधील एका इमारतीमध्ये घुसलेल्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्करास यश आले आहे. दहशतवादी व लष्करातील ही धुमश्‍चक्री सुमारे ४८ तास सुरु होती.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २२ - श्रीनगर जम्मु राष्ट्रीय महामार्गावरील पम्पोर भागामधील एका इमारतीमध्ये घुसलेल्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्करास यश आले आहे. दहशतवादी व लष्करातील ही धुमश्‍चक्री सुमारे ४८ तास सुरु होती. घटनास्थळी शस्त्रास्त्रे व प्रचंड प्रमाणात दारुगोळा आढळल्याचे या मोहिमेशी संबंधित असलेले अधिकारी मेजर जनरल अरविंद दत्ता यांनी सांगितले आहे. 
 
इमारतीत घुसलेले दहशतवादी हे परकीय दहशतवादी होते. दहशतवादी घुसले त्यावेळी या इमारतीमध्ये अनेक नागरिक अडकले होते. तेव्हा या नागरिकांची सुरक्षित सुटका करणे हे आमचे मुख्य ध्येय होते. या पार्श्‍वभूमीवर राबविलेल्या मोहिमेमध्ये बुलेटप्रुफ गाड्या वापरुन या इमारतीमधून १२० नागरिकांची सुटका करण्यात आली. या इमारतीस अनेक खोल्या असल्याने या मोहिमेस अधिक काळ लागला, असे दत्ता यांनी सांगितले. त्याचबरोबर या मोहिमेमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांचे दत्ता यांनी पुण्यस्मरण केले. 
 
या हल्ल्यामध्ये लष्करे तैयबा ही दहशतवादी संघटना सहभागी असल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान भारतीय लष्कराचे कॅप्टन दर्जाचे दोन अधिकारी पवन कुमार व तुषार महाजन तसेच लान्स नायक ओम प्रकाश हे हुतात्मा झाले.