शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

पम्पोरमधील दशतवाद्यांबरोबरची चकमक संपली. तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

By admin | Updated: February 22, 2016 19:36 IST

पम्पोर भागामधील एका इमारतीमध्ये घुसलेल्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्करास यश आले आहे. दहशतवादी व लष्करातील ही धुमश्‍चक्री सुमारे ४८ तास सुरु होती.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २२ - श्रीनगर जम्मु राष्ट्रीय महामार्गावरील पम्पोर भागामधील एका इमारतीमध्ये घुसलेल्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्करास यश आले आहे. दहशतवादी व लष्करातील ही धुमश्‍चक्री सुमारे ४८ तास सुरु होती. घटनास्थळी शस्त्रास्त्रे व प्रचंड प्रमाणात दारुगोळा आढळल्याचे या मोहिमेशी संबंधित असलेले अधिकारी मेजर जनरल अरविंद दत्ता यांनी सांगितले आहे. 
 
इमारतीत घुसलेले दहशतवादी हे परकीय दहशतवादी होते. दहशतवादी घुसले त्यावेळी या इमारतीमध्ये अनेक नागरिक अडकले होते. तेव्हा या नागरिकांची सुरक्षित सुटका करणे हे आमचे मुख्य ध्येय होते. या पार्श्‍वभूमीवर राबविलेल्या मोहिमेमध्ये बुलेटप्रुफ गाड्या वापरुन या इमारतीमधून १२० नागरिकांची सुटका करण्यात आली. या इमारतीस अनेक खोल्या असल्याने या मोहिमेस अधिक काळ लागला, असे दत्ता यांनी सांगितले. त्याचबरोबर या मोहिमेमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांचे दत्ता यांनी पुण्यस्मरण केले. 
 
या हल्ल्यामध्ये लष्करे तैयबा ही दहशतवादी संघटना सहभागी असल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान भारतीय लष्कराचे कॅप्टन दर्जाचे दोन अधिकारी पवन कुमार व तुषार महाजन तसेच लान्स नायक ओम प्रकाश हे हुतात्मा झाले.