शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

विजय मल्ल्यांना अखेरचे समन्स

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ‘युनायटेड स्पिरीट’चे माजी चेअरमन विजय मल्ल्या यांना शनिवारी तिसरे आणि शेवटचे समन्स पाठवून ९ एप्रिलपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

- डिप्पी वांकाणी,  मुंबईअंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ‘युनायटेड स्पिरीट’चे माजी चेअरमन विजय मल्ल्या यांना शनिवारी तिसरे आणि शेवटचे समन्स पाठवून ९ एप्रिलपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. मल्ल्या यांना पाठविलेले हे शेवटचे समन्स आहे. ते ९ एप्रिलपर्यंत हजर न झाल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. मल्ल्यांना यापूर्वी दोन वेळा समन्स बजावण्यात आले होते. दुसऱ्या समन्समध्ये त्यांना २ एप्रिल रोजी ‘ईडी’च्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ते आलेच नाहीत. त्यांनी हजर होण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी लेखी मागणी शुक्रवारी ईडीकडे केली. ‘आपण आपल्या कर्जपुरवठादारांना चार हजार कोटी रुपयांच्या परतफेडीचा प्रस्ताव दिला असून सर्वोच्च न्यायालयात ७ एप्रिल रोजी त्याबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे हजर होण्याची मुदत मे महिन्यापर्यंत वाढवावी,’ असे मल्ल्यांनी म्हटले असल्याचे समजते.‘आम्ही त्यांना पाठविलेले हे शेवटचे समन्स आहे. आम्ही हजर होण्याची मुदत मेपर्यंत वाढवून देऊच शकत नाही. या वेळी ते हजर झाले नाहीत, तर आम्ही न्यायालयाला त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याची विनंती करू’, असे ईडीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मल्ल्या आलेच नाहीत तर त्यांना आणण्याचे इतरही पर्याय उपलब्ध आहेत. भारताचा ब्रिटनसोबत १९९३ पासून प्रत्यार्पण करार आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्रालयामार्फत प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू करता येऊ शकते.