शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

पित्यालाच दूर सारणार?

By admin | Updated: January 7, 2017 04:44 IST

अखिलेश गटाने मात्र काँग्रेसशी समझोता करून आणि मुलायम गटाला दूर ठेवून निवडणुका लढवण्याची जोरदार तयारी चालवली आहे.

लखनऊ : समाजवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर शिवपाल यादव यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री व आपले पुतणे अखिलेश यादव यांची त्यांच्या घरी भेट घेऊन जुळवून घेण्याचे प्रयत्न शुक्रवारी सुरू केले असले तरी अखिलेश गटाने मात्र काँग्रेसशी समझोता करून आणि मुलायम गटाला दूर ठेवून निवडणुका लढवण्याची जोरदार तयारी चालवली आहे. नावे जाहीर झालेल्या उमेदवारांनी आता मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू करावा, लखनौमध्ये थांबू नये, अशा सूचना अखिलेश यांनी दिल्या आहेत.या भेटीबद्दल दोन्ही गटांनी बोलण्यास नकार दिला. मात्र मिळालेल्या माहितीनुसार आपणच पक्षाध्यक्ष राहू, उमेदवारांची निवडही आपण करू, अशा अटी अखिलेश यांनी घातल्या आहेत. त्या मान्य असतील, तरच दोन्ही गट एकत्र येतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र या दोन्ही अटी मुलायमसिंग व शिवपाल यांना मान्य नाहीत. शिवपाल हे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला तयार असले तरी मुलायमसिंग यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडावे, ही मागणीच त्यांच्या गटाला मान्य नाही. त्यामुळे संभाव्य ‘तडजोडीचे सूत्र’ म्हणून अमरसिंह यांना राजीनामा देण्यास सांगितले जाईल, अशी चर्चा आहे. आपल्यामागे संपूर्ण पक्ष आहे, असे निवडणूक आयोगाला पटवून देण्यासाठी अखिलेश गटाने पूर्ण तयारी केली आहे. मात्र अखिलेश गटाकडे २२९ पैकी २१२ विधानसभेचे तर ६८ पैकी ५६ विधान परिषदेचे सदस्य असून, २४ पैकी १६ खासदार आहेत आणि त्यांनी तशी शपथपत्रे दिली आहेत, अशी माहिती राम गोपाल यादव यांनी दिली. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपले म्हणणे पटवून देण्यासाठी ९ जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे.रामगोपाल यांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ धोरण‘सायकल’वरील दाव्यावरून मुुलायमसिंह यादव आणि अखिलेश पिता-पुत्रांत ऐन निवडणुकीच्या काळात संघर्ष निर्माण झाल्याने दोघांत समेट घडवून आणण्याचे जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे निष्ठावंत रामगोपाल यादव यांनी आता ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे, तसेच अखिलेश समर्थकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर न करण्याचाही त्यांनी निर्णय घेतला आहे. (वृत्तसंस्था)>अखिलेश-राहुल भेट होणारसमाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युतीची मोठी शक्यता आहे. अखिलेश हे राहुल गांधी यांची ९ जानेवारी रोजी भेट घेण्याची अपेक्षा असून तेव्हा निश्चित निर्णय होईल. या चर्चेत प्रियंका गांधीही सहभागी होतील. अखिलेश यांचे पारडे जड झाल्याचे दिसताच सपा व काँग्रेस यांच्यात युतीची शक्यताही निर्माण झाली आहे.