शहरं
Join us  
Trending Stories
1
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
2
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
3
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
4
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
5
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
6
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
7
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
8
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
9
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
10
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
11
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
12
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
13
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
14
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
15
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
16
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
17
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
18
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
19
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
20
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही

पित्यालाच दूर सारणार?

By admin | Updated: January 7, 2017 04:44 IST

अखिलेश गटाने मात्र काँग्रेसशी समझोता करून आणि मुलायम गटाला दूर ठेवून निवडणुका लढवण्याची जोरदार तयारी चालवली आहे.

लखनऊ : समाजवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर शिवपाल यादव यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री व आपले पुतणे अखिलेश यादव यांची त्यांच्या घरी भेट घेऊन जुळवून घेण्याचे प्रयत्न शुक्रवारी सुरू केले असले तरी अखिलेश गटाने मात्र काँग्रेसशी समझोता करून आणि मुलायम गटाला दूर ठेवून निवडणुका लढवण्याची जोरदार तयारी चालवली आहे. नावे जाहीर झालेल्या उमेदवारांनी आता मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू करावा, लखनौमध्ये थांबू नये, अशा सूचना अखिलेश यांनी दिल्या आहेत.या भेटीबद्दल दोन्ही गटांनी बोलण्यास नकार दिला. मात्र मिळालेल्या माहितीनुसार आपणच पक्षाध्यक्ष राहू, उमेदवारांची निवडही आपण करू, अशा अटी अखिलेश यांनी घातल्या आहेत. त्या मान्य असतील, तरच दोन्ही गट एकत्र येतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र या दोन्ही अटी मुलायमसिंग व शिवपाल यांना मान्य नाहीत. शिवपाल हे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला तयार असले तरी मुलायमसिंग यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडावे, ही मागणीच त्यांच्या गटाला मान्य नाही. त्यामुळे संभाव्य ‘तडजोडीचे सूत्र’ म्हणून अमरसिंह यांना राजीनामा देण्यास सांगितले जाईल, अशी चर्चा आहे. आपल्यामागे संपूर्ण पक्ष आहे, असे निवडणूक आयोगाला पटवून देण्यासाठी अखिलेश गटाने पूर्ण तयारी केली आहे. मात्र अखिलेश गटाकडे २२९ पैकी २१२ विधानसभेचे तर ६८ पैकी ५६ विधान परिषदेचे सदस्य असून, २४ पैकी १६ खासदार आहेत आणि त्यांनी तशी शपथपत्रे दिली आहेत, अशी माहिती राम गोपाल यादव यांनी दिली. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपले म्हणणे पटवून देण्यासाठी ९ जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे.रामगोपाल यांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ धोरण‘सायकल’वरील दाव्यावरून मुुलायमसिंह यादव आणि अखिलेश पिता-पुत्रांत ऐन निवडणुकीच्या काळात संघर्ष निर्माण झाल्याने दोघांत समेट घडवून आणण्याचे जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे निष्ठावंत रामगोपाल यादव यांनी आता ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे, तसेच अखिलेश समर्थकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर न करण्याचाही त्यांनी निर्णय घेतला आहे. (वृत्तसंस्था)>अखिलेश-राहुल भेट होणारसमाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात युतीची मोठी शक्यता आहे. अखिलेश हे राहुल गांधी यांची ९ जानेवारी रोजी भेट घेण्याची अपेक्षा असून तेव्हा निश्चित निर्णय होईल. या चर्चेत प्रियंका गांधीही सहभागी होतील. अखिलेश यांचे पारडे जड झाल्याचे दिसताच सपा व काँग्रेस यांच्यात युतीची शक्यताही निर्माण झाली आहे.