शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

रस्ते अपघातात वडिलांचा झाला मृत्यू, १३ व्याला कुटुंबियांनी दान केले ' हेल्मेट'

By admin | Updated: March 22, 2016 09:40 IST

स्वत:च्या आप्ताला रस्ते अपघातात गमावल्यानंतर इतरांवर ही वेळ येऊ नये म्हणून एका कुटुंबाने १३व्याला 'हेल्मेट'चे दान दिल्याची घटना भोपाळमध्ये घडली.

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. २२ - स्वत:च्या आप्ताला रस्ते अपघातात गमावल्यानंतर इतरांवर ही वेळ येऊ नये म्हणून एका कुटुंबाने १३व्याला 'हेल्मेट'चे दान दिल्याची घटना भोपाळमध्ये घडली आहे. मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यात राहणा-या राजेंद्र गुप्ता (वय ४९) हे ३ मार्च रोजी गाडीवरून जात असताना अपघात झाला आणि डोक्याला गंभीर इजा होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अशी वेळ इतर कोणावरही येऊ नये म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी 'ब्राह्मण भोज' देताना त्यांना पैसे वा वस्त्र देण्याऐवजी सुरक्षिततेचा उपाय असलेल्या ' हेल्मेट'चेच दान केले. 
किराणा मालाचे दुकान चालवणारे राजेंद्र गुप्ता ३ मार्चला त्यांच्या दुचाकीवरून बाहेर जात होते, मात्र त्याचवेळी त्यांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका कारची त्यांना जोरदार धडक बसली आणि ते खाली कोसळले. या अपघातात जखमी झालेल्या गुप्ता यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि सुमारे आठवडाभर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र ते कोमात गेले आणि ८ मार्च रोजी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. 
सोमवार, २१ मार्च रोजी त्यांचा १३ वा होता, यावेळी ' ब्राह्मण भोज' देण्याची पद्धत असते. त्यामध्ये मृत व्यक्तीचे आवडते पदार्थ वा वास्तू दान केल्या जातात. मात्र गुप्ता कुटुंबियांनी असे न करता बाह्मणांना ३५ हेल्मेट्स दान केnr.
' जर त्या दिवशी माझ्या वडिलांनी हेल्मेट घातले असते तर आज त्यांचा जीव वाचला असता. आमच्यावर जशी वेळ तशी इतर कोणावरही येऊ नये अशी आमची इच्छा आहे, त्यामुळेच आम्ही या लोकांना हेल्मेट वाटण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचे आयुष्य तरी थोड्याफार प्रमाणात सुरक्षित राहील' असे गुप्ता यांचा मोठा मुलगा विवेक याने स्पष्ट केले.