शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

‘एनएसजी’साठीची घाई अनावश्यक !

By admin | Updated: June 26, 2016 02:17 IST

अणुपुरवठादार देशांच्या गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी केंद्र सरकारने केलेले प्रयत्न ही ‘अनावश्यक घाई’ होती आणि ‘चुकीच्या सल्ल्यावर’ ते करण्यात आले, असे मत प्रमुख वैज्ञानिक

हैदराबाद : अणुपुरवठादार देशांच्या गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी केंद्र सरकारने केलेले प्रयत्न ही ‘अनावश्यक घाई’ होती आणि ‘चुकीच्या सल्ल्यावर’ ते करण्यात आले, असे मत प्रमुख वैज्ञानिक आणि अणुऊर्जा आयोगाचे (एईसी) सदस्य एम. आर. श्रीनिवासन यांनी व्यक्त केले आहे.एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, याबाबत सरकारने अणुऊर्जा आयोगाकडून सल्ला घेतला असता तर आम्ही अशी घाई करू नका, असा सल्ला दिला असता. एईसी अणुऊर्जा विभाग ‘डीएई’च्या अखत्यारीत आहे. ‘एईसी’ देशात अणुऊर्जाविषयक घडामोडी पाहतो.श्रीनिवासन हे ‘एईसी’चे माजी प्रमुख आहेत. ते म्हणाले की, एनएसजी सदस्यत्वाने भारताच्या अणुव्यापारावर कोणताही परिणाम होत नाही, कारण भारताने अणुभट्ट्या आणि युरेनियमच्या पुरवठ्यासाठी अन्य देशांशी करार केलेलेच आहेत. असे असताना भारताने ‘एनएसजी’ सदस्यत्वाचा मोठा मुद्दा केला. ही केवळ ‘अनावश्यक’ बाब होती. २००८ साली मिळालेल्या सवलतीमुळे आम्ही पूर्वीच अणुसंपन्न देशांशी अणुव्यापार करण्यासाठी सक्षम झालो आहोत. आम्ही अणुभट्ट्यांसाठी पूर्वीच रशिया, फ्रान्स आणि अमेरिकेसोबत करार केले आहेत; शिवाय युरेनियमच्या पुरवठ्यासाठी कझाकिस्तान, कॅनडा, आॅस्ट्रेलिया यांच्याशी करार केला आहे. ‘एनएसजी’ची स्थापना १९७४ साली झाली. त्यात प्रवेशासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला ‘अनावश्यक’ होता.श्रीनिवासन यांना पद्मभूषण या प्रतिष्ठित नागरी किताबाने सन्मानित करण्यात आले आहे. ते म्हणाले की, एनएसजीचे सदस्यत्व न मिळाल्याने भारताच्या अणुकार्यक्रमावर प्रतिकूल परिणाम होणार नाही. भारताकडे अणुभट्ट्यांचे डिझाईन आणि निर्मिती, इंधनाचे उत्पादन, प्रक्रिया याबाबत स्वत:ची क्षमता आहे. (वृत्तसंस्था)भारताच्या प्रतिष्ठेला ‘धक्का’ व्यावहारिक विचार करता एनएसजीची सदस्यता न मिळाल्याने भारतावर काहीही परिणाम होणार नाही. आम्हाला पूर्वीच सवलत मिळाली आहे. महत्त्वाचे देश आणि युरेनियमचा पुरवठा करणाऱ्या देशांशी आम्ही पूर्वीपासूनच सहकार्य घेत आहोत. असे असताना अशी ‘फजिती’ करून घेण्याची मुळीच गरज नव्हती. दुर्दैवाने या घटनेमुळे भारताच्या प्रतिष्ठेला ‘धक्का’ बसला. सरकारने अणुऊर्जा आयोगाशी संपर्क साधला असता तर त्यांना असे प्रयत्न करू नका, असा सल्ला दिला असता. पण दुर्दैवाने आमच्याकडे हे प्रकरण आलेच नाही. ते परराष्ट्र मंत्रालयाचे प्रकरण बनले.