शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना अनुदान, पीक विमा संरक्षण हवे

By admin | Updated: February 27, 2016 01:57 IST

देशातील वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सिंचनाची क्षमता वाढविण्याबरोबरच पीक विम्याचे संरक्षण देण्यासारखे उपाय पुरेसे नसून शेतकऱ्यांना कर्जमाफी व पुरेसे अनुदान देणे

नवी दिल्ली : देशातील वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सिंचनाची क्षमता वाढविण्याबरोबरच पीक विम्याचे संरक्षण देण्यासारखे उपाय पुरेसे नसून शेतकऱ्यांना कर्जमाफी व पुरेसे अनुदान देणे गरजेचे असल्याचे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. देशातील बहुसंख्य भागात यंदा दुष्काळी स्थिती असून त्यामुळे भात, कापूस व इतर पिकांना फटका बसला आहे. त्यातच शेतीमालाला पुरेसे भाव नसल्याने बळीराजा अडचणीत आला आहे. देशातील निम्म्यापेक्षा अधिक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली असून यापूर्वीच्या सरकारांनी कर्जमाफी दिल्यानंतरही त्याच्यावरील आर्थिक संकटे कमी झालेली नाहीत. त्यामुळे गेल्या दशकात नापिकी व कर्जबाजारीपणामुळे लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्येचा टोकाचा मार्ग निवडल्याचे कृषी क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थसंकल्पात विकासदराचे लक्ष्य गाठताना अडचणीतील शेतकरी आणि दुर्बल घटकांना त्याचे फायदे करून देण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. शेतकऱ्यांना वाचवण्याचे मोठे आव्हान अर्थमंत्र्यांसमोर आहे. (लोकमत न्युज नेटवर्क)देशात २०१४ मध्ये ५,६५० शेतकरी आत्महत्यांची सरकारी दरबारी नोंद झाली. त्यातील अर्ध्याहून अधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या. मध्य प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड व कर्नाटकातही मोठ्या संख्येने आत्महत्या झाल्या. शेतकऱ्यांच्या मागण्याहवामानाचा अचूक अंदाज वर्तवावा खतांवरील अनुदान वाढवावेसर्व पिकांना राज्य सरकार पुरस्कृत विमा योजना लागू करावीदाव्यांचा निपटारा लवकर व्हावाकेंद्र सरकारने गेल्या महिन्यात पिकांच्या नुकसानीवरील भरपाईसाठी महत्त्वाकांक्षी विमा योजना जाहीर केली आहे. त्यात शेतकऱ्यांना अत्यल्प हप्ता भरावा लागेल, असे सरकारने आश्वासन दिले आहे.विम्याचे दावे लवकर निकाली निघण्यासाठी सरकारला प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल, असे ‘सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्व्हायरोन्मेंट’च्या संचालक सुनिता नारायण यांनी सांगितले.